शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

हवामानाची माहिती आता अधिक अचूक मिळणार, रत्नागिरी जिल्ह्यात ६५ ‘स्वयंचलित हवामान केंद्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:45 IST

हवामानविषयक विविध घटकांची दैनंदिन अचूक माहिती गोळा करण्यासाठी मंडलस्तरावर ‘स्वयंचलित हवामान केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून, स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

ठळक मुद्दे‘स्वयंचलित हवामान केंद्र’ उभारण्याचे शंभर टक्के काम पूर्ण हवामान केंद्र उभारण्यामध्ये रत्नागिरी कोकण विभागात प्रथम

मेहरून नाकाडे 

रत्नागिरी : हवामानविषयक विविध घटकांची दैनंदिन अचूक माहिती गोळा करण्यासाठी मंडलस्तरावर ‘स्वयंचलित हवामान केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून, स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे.हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०१२ साली प्रायोगिक तत्त्वावर जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत सरासरीपेक्षा कमी अधिक पाऊस, पावसाचा खंड, सोसाट्याचा वारा, गारपीट, सापेक्ष आर्द्रता या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते. जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेत दरवर्षी सहभागी होतात.

हवामानातील बदल व घटकांची माहिती खासगी केंद्रांकडून घेण्यात येत होती. याआधीची चुकीच्या ठिकाणी हवामान केंद्र उभारल्यामुळे हवामानाची अचूक माहिती उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते.

दरवर्षी हजारो रूपये विम्याची रक्कम भरूनसुध्दा हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनसुध्दा हवामान केंद्राच्या चुकीच्या माहितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असे. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीमुळेच शासनाने प्रत्येक महसूल मंडलस्तरावर हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला शिवाय कामाची पूर्तता वेगाने करण्यात आली आहे.स्वयंचलित हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळणार आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना दोन दिवस आधीच शेतकऱ्यांना मिळेल. या केंद्रामुळे तापमान, पर्जन्यमान, हवेची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा या वातावरणातील आधारित पीक विमा योजनाविषयक सल्ला, संशोधन आणि इतर कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे.

१२ किलोमीटर परिसरातील अचूक हवामानाची नोंद दर दहा मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. नोंदवलेली माहिती सर्व्हरला दर एका तासाने पाठविली जाणार आहे. त्यामुळे संकलित होणारी माहिती कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ व कृषी विभागाला प्राप्त होणार आहे.सार्वजनिक खासगी भागिदारीतून ‘बांधा-मालक व्हा- चालवा’ या तत्त्वावर अंमलबजावणी करण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेची निवड केली आहे. संस्थेतर्फे ‘स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार असून, त्यानंतर पुढील सात वर्षे स्वखर्चाने हवामान केंद्र चालविण्यात येणार आहे. शिवाय शासनाला मोफत हवामानविषयक माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.जिल्ह्यात आंबा, काजू पिकासाठी फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे. हवामानावर आधारित असलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. हवामानातील बदलाचा परिणाम पिकावर होत असल्याने हवामानातील बदल याबाबतची अचूक माहिती मिळणार आहे. चुकीच्या माहितीमुळे शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून होणारी फसवणूक टळेल, शिवाय आर्थिक नुकसानदेखील होणार नाही.शंभर टक्के काम : रत्नागिरी कोकणात प्रथमजिल्ह्यात ६५ महसूल मंडले असून, ६१ मंडलांसाठी जागा सुरूवातीलाच निश्चित करण्यात आली होती. महसूल, कृषी विभाग, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेकडील जागा आहेत. मात्र, चार जागांचा प्रश्न उद्भवला होता. त्यामध्ये राजापूरमधील कोंड्येतर्फ सौंदळ, रत्नागिरीतील पावस मंडल, खेडमध्ये धामणंद, संगमेश्वरातील कोंडगाव येथील मंडलांचा जागेचा प्रश्न जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यात आल्याने जिल्ह्यात ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी