शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात आढळली मानवाचे अस्तित्व दाखविणारी हत्यारे, रत्नागिरीतील संशोधन केंद्रात जतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 13:33 IST

हत्यारे मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग कालखंडातील असण्याची शक्यता

रत्नागिरी : रत्नागिरीत सुरू करण्यात आलेल्या कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राच्या माध्यमातून संशोधनात्मक काम सुरू आहे. या संशाेधनात्मक कामातून रत्नागिरी, राजापूर, मालवण या तालुक्यांमध्ये दगडी हत्यारे सापडली आहेत. ही हत्यारे मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग म्हणजेच साधारणपणे इसवी सन पूर्व ४० ते १० हजार या कालखंडातील असावीत, असा अंदाज आहे. हा मानवाच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा पुरावा आहे.भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकाराने आयआयटीएम प्रवर्तक, आयआयटी (मद्रास) आणि निसर्गयात्री संस्था (रत्नागिरी) यांच्यातर्फे संचलित कोकणातील कातळशिल्प संशोधन हा राष्ट्रीय प्रकल्प सुरू आहे. अभ्यास, संशोधन करताना सापडलेली दगडी हत्यारे ही कोकणातील मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात खूप मोठी आणि महत्त्वपूर्ण आहेत. तसेच, दक्षिण कोकणात कातळशिल्प रचनांचा कालखंड निश्चित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पुरावे आहेत.

कातळशिल्प संशोधनातील एक मुख्य भाग म्हणजे कातळशिल्प परिसरात पुरातत्त्वीय सर्वेक्षण आहे. या सुरू असलेल्या संशोधनात्मक कामामध्ये पुरातत्त्व अभ्यासक ऋत्विज आपटे, सुधीर रिसबूड व धनंजय मराठे यांच्यासह कातळशिल्प संशोधन प्रकल्पावर कार्यरत संशोधक दिव्यांश कुमार सिन्हा, रघुनाथ बोकिल, मधुसूदन राव, स्नेहा धबडगाव, रेणुका जोशी, तार्किक खातू यांचा समावेश आहे.१८ ते २० लाख वर्षांपूर्वी मानवाने दगडांचा वापर हत्यारे म्हणून सुरू केला. अनुभवानुसार त्याने दगडांना आकार देऊन सहज बाळगता येतील अशी उपयुक्त हत्यारे बनवली. काळानुरूप दगडी हत्यारांमध्ये झालेल्या बदलानुसार त्यांचे आकार, पद्धती, निर्मितीचे तंत्र यानुसार त्यांचे कालखंड ठरवले जातात. कोकणातील दगडी हत्यारे येथे मानवी वस्ती अंदाजे किती वर्षांपासून अस्तित्वात होती याचा पुरावा आहे.

आढळलेली हत्यारेतासणी (Scrapers), सूक्ष्म पाती (Micro Blades), गाभे (Cores), प्रीपेड कोर (Prepared Cores), छिलके (Flakes) यांचा समावेश आहे. दगडी हत्यारांचे आकार, बनवण्याची पद्धती यावरून ही दगडी हत्यारे मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग या कालखंडातील असल्याचे पुढे आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण