शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सरकार विरोधात शिक्षण अधिकार भंगचा गुन्हा दाखल करू, लक्ष्मण माने यांचा थेट इशारा

By संदीप बांद्रे | Updated: March 15, 2025 20:17 IST

संविधानाने बहुजानांना मुलभूत अधिकारातून शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांनाही नोकऱ्या दिल्या.

चिपळूण : संविधानाने बहुजानांना मुलभूत अधिकारातून शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांनाही नोकऱ्या दिल्या. असे असताना खासगीकरणातून देशासह राज्यातील सरकार बहुजनांच्या हातातून हा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेत आहे. 20 रोजी महाड येथे होत असलेल्या समता परिषदेद्वारे याविरोधात लढा उभा केला जाणार असून जिल्हा परिषद शाळा बंदचा घाट घालणाऱ्या सरकार विरोधात गावोगावी शिक्षण अधिकाराचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ‘उपरा' कार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.    ते पुढे म्हणाले की, बहुजानांची मुले शिक्षण घेत असलेल्या राज्यातील 67 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. खासगीकरणामुळे शिक्षण महाग होत आहे. यामुळे शेतकरी बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील खासगीकरण हे घटनाबाह्य आहे. संविधानाने शिक्षण हा मुलभूत अधिकार दिला आहे. शिक्षणाप्रमाणे नोकऱ्यादेखील चिंतेची बाब बनली असून खासगीकरणामुळे नोकऱ्यांमधील राखीव जागा संपुष्टात आल्या आहेत. रिक्त जागा सरकाराकडून भरल्या जात नाहीत. जर का नोकऱ्यांमध्ये खासगीकरण होत असेल, तर कोणताही भेदभाव न करता त्या कर्मचाऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारने पगार दिला पाहिजे, पुरेशा सुविधा देखील सरकारने दिल्या पाहिजेत.    सरकारकडून बहुजनांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात बहुजनाच्या न्याय हक्कासाठी लढा उभारला जाणार आहे. त्याकरता 20 रोजी महाड येथे क्रांती दिनी समता परिषद घेतली जाणार आहे. यातूनही सरकारने याविषयी दखल न घेतल्यास सरकार विरोधात शिक्षण अधिकाराचा भंग केल्याचा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करु, न्यायालयात आम्ही दाद मागू, हे महाराष्ट्रात पहिले असेल, असेही त्यांनी नमूद केले.