शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरकार विरोधात शिक्षण अधिकार भंगचा गुन्हा दाखल करू, लक्ष्मण माने यांचा थेट इशारा

By संदीप बांद्रे | Updated: March 15, 2025 20:17 IST

संविधानाने बहुजानांना मुलभूत अधिकारातून शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांनाही नोकऱ्या दिल्या.

चिपळूण : संविधानाने बहुजानांना मुलभूत अधिकारातून शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांनाही नोकऱ्या दिल्या. असे असताना खासगीकरणातून देशासह राज्यातील सरकार बहुजनांच्या हातातून हा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेत आहे. 20 रोजी महाड येथे होत असलेल्या समता परिषदेद्वारे याविरोधात लढा उभा केला जाणार असून जिल्हा परिषद शाळा बंदचा घाट घालणाऱ्या सरकार विरोधात गावोगावी शिक्षण अधिकाराचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ‘उपरा' कार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.    ते पुढे म्हणाले की, बहुजानांची मुले शिक्षण घेत असलेल्या राज्यातील 67 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. खासगीकरणामुळे शिक्षण महाग होत आहे. यामुळे शेतकरी बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील खासगीकरण हे घटनाबाह्य आहे. संविधानाने शिक्षण हा मुलभूत अधिकार दिला आहे. शिक्षणाप्रमाणे नोकऱ्यादेखील चिंतेची बाब बनली असून खासगीकरणामुळे नोकऱ्यांमधील राखीव जागा संपुष्टात आल्या आहेत. रिक्त जागा सरकाराकडून भरल्या जात नाहीत. जर का नोकऱ्यांमध्ये खासगीकरण होत असेल, तर कोणताही भेदभाव न करता त्या कर्मचाऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारने पगार दिला पाहिजे, पुरेशा सुविधा देखील सरकारने दिल्या पाहिजेत.    सरकारकडून बहुजनांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात बहुजनाच्या न्याय हक्कासाठी लढा उभारला जाणार आहे. त्याकरता 20 रोजी महाड येथे क्रांती दिनी समता परिषद घेतली जाणार आहे. यातूनही सरकारने याविषयी दखल न घेतल्यास सरकार विरोधात शिक्षण अधिकाराचा भंग केल्याचा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करु, न्यायालयात आम्ही दाद मागू, हे महाराष्ट्रात पहिले असेल, असेही त्यांनी नमूद केले.