शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील सर्वच निवडणुकांना महायुतीने सामोरे जाऊ - मंत्री उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: July 22, 2023 18:51 IST

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली शिवसेनेची बैठक

रत्नागिरी : राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीचे सरकार आहे. जिल्ह्यातही यापुढेल प्रत्येक निवडणूक महायुतीने लढवली जाईल आणि जिल्हा परिषद, नगर परिषदांवर महायुतीलाच विजय मिळेल, असे राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी रत्नागिरीमध्ये शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीला आमदार योगेश कदम, उपनेते सदानंद चव्हाण, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित आणि उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अरुण कदम, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, राजन शेट्ये, प्रकाश साळवी, राजेश मुकादम, सुभाष कळेकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, बाबू म्हाप, प्रमोद पवार, अशपाक हाजू यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सामंत म्हणाले की, आगामी निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता सर्वच निवडणुका शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा महायुतीनेच लढवल्या जातील. त्या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीच विजयी होईल. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.तीन पक्षांमध्ये उमेदवार निवड कशी होणार, यावर बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल त्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल, एवढेच सूत्र नक्की आहे. बाकी निर्णय योग्य वेळे घेऊ.

समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्याततीनही पक्षांच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात हाेईल. महायुती म्हणून कशा पद्धतीने समन्वय ठेवत पुढे जायचे आहे, ते या बैठकीत निश्चित केले जाणार आहे. आधी ६० आणि ४० असे सूत्र वापरण्याचे ठरले होते. आता तीन पक्ष असल्याने त्यात बदल होईल आणि राज्य पातळीनुसार सूत्र निश्चित केले जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना