शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

रत्नागिरीतील सर्वच निवडणुकांना महायुतीने सामोरे जाऊ - मंत्री उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: July 22, 2023 18:51 IST

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली शिवसेनेची बैठक

रत्नागिरी : राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीचे सरकार आहे. जिल्ह्यातही यापुढेल प्रत्येक निवडणूक महायुतीने लढवली जाईल आणि जिल्हा परिषद, नगर परिषदांवर महायुतीलाच विजय मिळेल, असे राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी रत्नागिरीमध्ये शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीला आमदार योगेश कदम, उपनेते सदानंद चव्हाण, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित आणि उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अरुण कदम, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, राजन शेट्ये, प्रकाश साळवी, राजेश मुकादम, सुभाष कळेकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, बाबू म्हाप, प्रमोद पवार, अशपाक हाजू यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सामंत म्हणाले की, आगामी निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता सर्वच निवडणुका शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा महायुतीनेच लढवल्या जातील. त्या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीच विजयी होईल. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.तीन पक्षांमध्ये उमेदवार निवड कशी होणार, यावर बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल त्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल, एवढेच सूत्र नक्की आहे. बाकी निर्णय योग्य वेळे घेऊ.

समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्याततीनही पक्षांच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात हाेईल. महायुती म्हणून कशा पद्धतीने समन्वय ठेवत पुढे जायचे आहे, ते या बैठकीत निश्चित केले जाणार आहे. आधी ६० आणि ४० असे सूत्र वापरण्याचे ठरले होते. आता तीन पक्ष असल्याने त्यात बदल होईल आणि राज्य पातळीनुसार सूत्र निश्चित केले जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना