शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

रत्नागिरीतील सर्वच निवडणुकांना महायुतीने सामोरे जाऊ - मंत्री उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: July 22, 2023 18:51 IST

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली शिवसेनेची बैठक

रत्नागिरी : राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीचे सरकार आहे. जिल्ह्यातही यापुढेल प्रत्येक निवडणूक महायुतीने लढवली जाईल आणि जिल्हा परिषद, नगर परिषदांवर महायुतीलाच विजय मिळेल, असे राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी रत्नागिरीमध्ये शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीला आमदार योगेश कदम, उपनेते सदानंद चव्हाण, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित आणि उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अरुण कदम, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, राजन शेट्ये, प्रकाश साळवी, राजेश मुकादम, सुभाष कळेकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, बाबू म्हाप, प्रमोद पवार, अशपाक हाजू यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सामंत म्हणाले की, आगामी निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता सर्वच निवडणुका शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा महायुतीनेच लढवल्या जातील. त्या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीच विजयी होईल. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.तीन पक्षांमध्ये उमेदवार निवड कशी होणार, यावर बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल त्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल, एवढेच सूत्र नक्की आहे. बाकी निर्णय योग्य वेळे घेऊ.

समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्याततीनही पक्षांच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात हाेईल. महायुती म्हणून कशा पद्धतीने समन्वय ठेवत पुढे जायचे आहे, ते या बैठकीत निश्चित केले जाणार आहे. आधी ६० आणि ४० असे सूत्र वापरण्याचे ठरले होते. आता तीन पक्ष असल्याने त्यात बदल होईल आणि राज्य पातळीनुसार सूत्र निश्चित केले जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना