शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकरवर मदार, उन्हाची दाहकता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 19:07 IST

तिवरे धरण फुटल्यानंतर अद्याप त्याच्या दुरुस्तीला सुरुवात नाही

संदीप बांद्रेचिपळूण : उन्हाची दाहकता अधिकच वाढत चालली आहे. परिणामी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ६ गावे आणि ८ वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. त्यामुळे या गावांना २ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नळपाणी पुरवठा योजनांच्या उद्भव विहिरीतील पाणीसाठा कमी झाल्याने विहिरी कोरड्या पडतात. परिणामी संबंधित गावांना टँकरमधून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. सर्वप्रथम टंचाईचा तडाखा हा उंच डोंगरावर वसलेल्या धनगरवाड्यांना बसतो आहे.धनगरवाड्यांसाठी पाणी योजना राबवल्या असल्या तरी तेथील पाणीसाठा कमी होत असल्याने टंचाईची झळ बसत आहे. सध्या तालुक्यातील अडरे, अनारी, टेरव, कोंडमळा, सावर्डे, गुढे या ६ गावांतील ८ वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागतो आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून पाणी पुरवठ्यासाठी शासकीय टँकर उपलब्ध नाहीत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना २ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.दसपटी विभागातील तिवरे धरण फुटल्यानंतर अद्याप त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. यावर्षी पावसाळ्यापूर्वी धरण दुरुस्ती होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे सावर्डेसाठी असलेल्या धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. परिणामी येथील काही वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. रामपूर तांबी धरणाला गळती लागल्याने गेल्या काही वर्षातील या धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांनाही टंचाईचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.पाणी टंचाईवर कायमचा तोडगा निघण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावोगावी कोट्यवधी खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजना राबवल्या जात आहेत. या पाणी योजनांच्या पूर्तीनंतर टंचाईला आळा बसण्याची आशा आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी