शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

चिपळुणात पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकरवर मदार, उन्हाची दाहकता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 19:07 IST

तिवरे धरण फुटल्यानंतर अद्याप त्याच्या दुरुस्तीला सुरुवात नाही

संदीप बांद्रेचिपळूण : उन्हाची दाहकता अधिकच वाढत चालली आहे. परिणामी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ६ गावे आणि ८ वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. त्यामुळे या गावांना २ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नळपाणी पुरवठा योजनांच्या उद्भव विहिरीतील पाणीसाठा कमी झाल्याने विहिरी कोरड्या पडतात. परिणामी संबंधित गावांना टँकरमधून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. सर्वप्रथम टंचाईचा तडाखा हा उंच डोंगरावर वसलेल्या धनगरवाड्यांना बसतो आहे.धनगरवाड्यांसाठी पाणी योजना राबवल्या असल्या तरी तेथील पाणीसाठा कमी होत असल्याने टंचाईची झळ बसत आहे. सध्या तालुक्यातील अडरे, अनारी, टेरव, कोंडमळा, सावर्डे, गुढे या ६ गावांतील ८ वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागतो आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून पाणी पुरवठ्यासाठी शासकीय टँकर उपलब्ध नाहीत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना २ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.दसपटी विभागातील तिवरे धरण फुटल्यानंतर अद्याप त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. यावर्षी पावसाळ्यापूर्वी धरण दुरुस्ती होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे सावर्डेसाठी असलेल्या धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. परिणामी येथील काही वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. रामपूर तांबी धरणाला गळती लागल्याने गेल्या काही वर्षातील या धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांनाही टंचाईचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.पाणी टंचाईवर कायमचा तोडगा निघण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावोगावी कोट्यवधी खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजना राबवल्या जात आहेत. या पाणी योजनांच्या पूर्तीनंतर टंचाईला आळा बसण्याची आशा आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी