शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चिपळुणात पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकरवर मदार, उन्हाची दाहकता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 19:07 IST

तिवरे धरण फुटल्यानंतर अद्याप त्याच्या दुरुस्तीला सुरुवात नाही

संदीप बांद्रेचिपळूण : उन्हाची दाहकता अधिकच वाढत चालली आहे. परिणामी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ६ गावे आणि ८ वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. त्यामुळे या गावांना २ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नळपाणी पुरवठा योजनांच्या उद्भव विहिरीतील पाणीसाठा कमी झाल्याने विहिरी कोरड्या पडतात. परिणामी संबंधित गावांना टँकरमधून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. सर्वप्रथम टंचाईचा तडाखा हा उंच डोंगरावर वसलेल्या धनगरवाड्यांना बसतो आहे.धनगरवाड्यांसाठी पाणी योजना राबवल्या असल्या तरी तेथील पाणीसाठा कमी होत असल्याने टंचाईची झळ बसत आहे. सध्या तालुक्यातील अडरे, अनारी, टेरव, कोंडमळा, सावर्डे, गुढे या ६ गावांतील ८ वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागतो आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून पाणी पुरवठ्यासाठी शासकीय टँकर उपलब्ध नाहीत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना २ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.दसपटी विभागातील तिवरे धरण फुटल्यानंतर अद्याप त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. यावर्षी पावसाळ्यापूर्वी धरण दुरुस्ती होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे सावर्डेसाठी असलेल्या धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. परिणामी येथील काही वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. रामपूर तांबी धरणाला गळती लागल्याने गेल्या काही वर्षातील या धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांनाही टंचाईचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.पाणी टंचाईवर कायमचा तोडगा निघण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावोगावी कोट्यवधी खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजना राबवल्या जात आहेत. या पाणी योजनांच्या पूर्तीनंतर टंचाईला आळा बसण्याची आशा आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी