शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

चिपळूण शहरातील तळ्यांमधील पाणीपातळी खालावली, मे अखेरीस आणखीन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:47 IST

पावसाळ्याच्या दिवसात तुडुंब भरणाऱ्या शहरातील तळ्यांमधील पाण्याची पातळी सध्या कडक उन्हामुळे कमालीची खालावली आहे. त्यामुळे या तळ्यातील पाण्यावर अवलंबून असणारे पशु-पक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, गतवर्षी शहरातील रामतीर्थ तलावाचा गाळ काढल्यामुळे या तलावातील पाण्याच्या पातळीत फारशी घट झालेली नाही.

ठळक मुद्देपशु-पक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न तलावांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या शहरात मोजकीच तळी शिल्लक

चिपळूण : पावसाळ्याच्या दिवसात तुडुंब भरणाऱ्या शहरातील तळ्यांमधील पाण्याची पातळी सध्या कडक उन्हामुळे कमालीची खालावली आहे. त्यामुळे या तळ्यातील पाण्यावर अवलंबून असणारे पशु-पक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, गतवर्षी शहरातील रामतीर्थ तलावाचा गाळ काढल्यामुळे या तलावातील पाण्याच्या पातळीत फारशी घट झालेली नाही.यापूर्वी तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या चिपळुणात आता केवळ मोजकीच तळी शिल्लक राहिली आहेत. शहरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले रामतीर्थ, विरेश्वर व नारायण तलाव एवढे मोजकेच तलाव आता अस्तित्वात आहेत.

यामधील विरेश्वर तलावाची पाण्याची पातळी खालावली असून, तळाचा भाग दिसू लागला आहे. नारायण तलावाचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी त्याच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत तलावातील गाळ काढण्यात आल्याने येथील पाण्याची पातळी टिकून आहे.रामतीर्थ तलावाचाही गेल्यावर्षी गाळ काढण्यात आल्याने येथेही पाणीपातळीत फारशी घट झालेली नाही. त्यामुळे शहरातील शंकरवाडी, पवारआळी, मार्कंडी परिसरातील जनावरांना या तलावातील पाण्याचा आधार मिळत आहे. मात्र, मे महिन्याच्या उत्तरार्धात येथील पाण्याच्या पातळीतही घट होण्याची चिन्हे आहेत.

तालुक्यात तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावत असतानाच शहरातील तळ्यांमधील पाण्याच्या पातळीत घट होऊ लागल्यामुळे या पाण्यावर अवलंबून असणारे पशुपक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी