शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

चिपळूण शहरातील तळ्यांमधील पाणीपातळी खालावली, मे अखेरीस आणखीन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:47 IST

पावसाळ्याच्या दिवसात तुडुंब भरणाऱ्या शहरातील तळ्यांमधील पाण्याची पातळी सध्या कडक उन्हामुळे कमालीची खालावली आहे. त्यामुळे या तळ्यातील पाण्यावर अवलंबून असणारे पशु-पक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, गतवर्षी शहरातील रामतीर्थ तलावाचा गाळ काढल्यामुळे या तलावातील पाण्याच्या पातळीत फारशी घट झालेली नाही.

ठळक मुद्देपशु-पक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न तलावांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या शहरात मोजकीच तळी शिल्लक

चिपळूण : पावसाळ्याच्या दिवसात तुडुंब भरणाऱ्या शहरातील तळ्यांमधील पाण्याची पातळी सध्या कडक उन्हामुळे कमालीची खालावली आहे. त्यामुळे या तळ्यातील पाण्यावर अवलंबून असणारे पशु-पक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, गतवर्षी शहरातील रामतीर्थ तलावाचा गाळ काढल्यामुळे या तलावातील पाण्याच्या पातळीत फारशी घट झालेली नाही.यापूर्वी तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या चिपळुणात आता केवळ मोजकीच तळी शिल्लक राहिली आहेत. शहरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले रामतीर्थ, विरेश्वर व नारायण तलाव एवढे मोजकेच तलाव आता अस्तित्वात आहेत.

यामधील विरेश्वर तलावाची पाण्याची पातळी खालावली असून, तळाचा भाग दिसू लागला आहे. नारायण तलावाचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी त्याच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत तलावातील गाळ काढण्यात आल्याने येथील पाण्याची पातळी टिकून आहे.रामतीर्थ तलावाचाही गेल्यावर्षी गाळ काढण्यात आल्याने येथेही पाणीपातळीत फारशी घट झालेली नाही. त्यामुळे शहरातील शंकरवाडी, पवारआळी, मार्कंडी परिसरातील जनावरांना या तलावातील पाण्याचा आधार मिळत आहे. मात्र, मे महिन्याच्या उत्तरार्धात येथील पाण्याच्या पातळीतही घट होण्याची चिन्हे आहेत.

तालुक्यात तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावत असतानाच शहरातील तळ्यांमधील पाण्याच्या पातळीत घट होऊ लागल्यामुळे या पाण्यावर अवलंबून असणारे पशुपक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी