शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

माणुसकीची भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

पूर चिपळुणात आला असला तरी आपल्या माणसांच्या मदतीला जिल्हावासीय तसेच मुंबई व अन्य जिल्ह्यातील संस्था, लोकांनी मदतीचा हात पुढे ...

पूर चिपळुणात आला असला तरी आपल्या माणसांच्या मदतीला जिल्हावासीय तसेच मुंबई व अन्य जिल्ह्यातील संस्था, लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक संस्था स्वत:हून पूरग्रस्तांसाठी साहित्य वितरीत करत आहेत.

चिपळूण शहर व परिसरातील गावांत पुरामुळे झालेले नुकसान प्रचंड आहे. येथील नागरिकांना उभे करण्याची आवश्यकता आहे. घरात साठवलेले साहित्य वाया गेले असल्याने कित्येकांना ही नासधूस पाहून अश्रू अनावर होत आहेत. घरातील साचलेला चिखल साफ करण्यासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी गरजेचे आहे. कित्येकांच्या अंगावरील वस्त्र वगळता वर्षानुवर्षे काबाडकष्ट करून जमवलेला संसार पुरामुळे नष्ट झाला आहे. पूरग्रस्तांचे दु:ख मोठे आहे शिवाय जवळून पाहिलेल्या मृत्यूमुळे अजूनही काही मंडळी तणावाखाली आहेत. घर, दुकाने असोत किंवा कार्यालये सर्वत्र साफसफाईला सुरूवात झाली असली तरी एक-एक गोष्टीचे झालेले नुकसान त्यांच्यासाठी वेदनादायी ठरत आहे. शहर व परिसरात संस्था, व्यक्ती, प्रशासन मदतीला पोहोचले असले तरी ग्रामीण भागातील टोकाला असलेल्या पूरग्रस्तांना मदत मिळाली का, याचाही आढावा घेणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. काही संस्था स्वत:हून त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. अनेक संस्थांनी साहित्य, वस्तूरूपी मदत सुरू केली असली तरी कित्येक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी टीम तयार करून पूरग्रस्तांच्या घरातील, गावातील चिखल साफ करण्यासाठी मदत केली जात आहेत. याठिकाणी कुठेही जात-पात-धर्म आडवा आलेला नाही. केवळ ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वत:हून मदतीची तयारी दर्शवत आहेत, हे विशेष. इतकेच नव्हे तर पुरामुळे विजेवरील उपकरणे, पाण्याची वाहिनी, पंप, कपाटे, फर्निचर, काैलारू घरे, घराचे दरवाजे, खिडक्या तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यासाठी वायरमन, सुतार, प्लंबर यांचीसुध्दा आवश्यकता आहे. त्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. वाहन दुरुस्तीसाठी मेकॅनिकल असोसिएशनतर्फे तयारी दर्शविली आहे.

पूरग्रस्तांबाबत प्रत्येकालाच आपुलकी असल्याने त्यांना उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपापल्यापरीने मदत कशी करता येईल, याचाच विचार सुरू आहे. शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा झालेली नसली तरी माणुसकीचा वर्षाव मात्र सुरू आहे.