शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

चाकरमान्यांच्या येण्याने गावकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 14:34 IST

गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावाला येऊ लागले आहेत. त्यामुळे आधीच कोरोनाची संख्या दोन हजारपेक्षा अधिक वाढल्याने गणेशोत्सवात ती अधिक वाढण्याच्या शंकेने आता गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देचाकरमान्यांच्या येण्याने गावकरी धास्तावलेजिल्हा प्रशसनात ताळमेळ नाही

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावाला येऊ लागले आहेत. त्यामुळे आधीच कोरोनाची संख्या दोन हजारपेक्षा अधिक वाढल्याने गणेशोत्सवात ती अधिक वाढण्याच्या शंकेने आता गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच येणाऱ्यांच्या विलगीकरणाचा कालावधी १० दिवस की १४ दिवस, याबाबतचा संभ्रम अधिक वाढला आहे.

गणेशोत्सवासाठी गावाला येण्याचा चाकरमान्यांचा निर्धार कायम आहे. काही ई-पास घेऊन कोकणात दाखलही झाले आहेत.

१४ दिवसांचे विलगीकरण गृहीत धरून गणेशोत्सवाचा निखळ आनंद घेण्याच्या दृष्टीने १३ जुलैपासूनच काही मुंबईकर गावात दाखल झाले आहेत. तर बाकीचे ई - पासची प्रतीक्षा करीत आहेत.काहींच्या ई -पासला विलंब होऊ लागल्याने त्यांचा जीवही टांगणीला लागला आहे.

गणेशोत्सवासाठी येणाºयांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्यास त्यांना १४ दिवसांचे संस्थात्मक तसेच घरी विलगीकरण करण्यात येईल, तर लक्षणे नसणाऱ्यंचे थेट घरी १४ दिवस विलगीकरण करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने आधीच जाहीर केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनीही सोशल मीडियावरून ई -पासशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट करताना १४ दिवसांचे विलगीकरणही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, रत्नागिरीचे पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी १२ आॅगस्टपूर्वी येणाºयांसाठी १० दिवसांचे विलगीकरण आणि एस. टी.तून येणाºयांना ४८ तास आधी स्वत:ची आरोग्य तपासणी करून घ्यावी लागेल, अशी घोषणा केल्याने पुन्हा विलगीकरणाचा कालावधी नेमका किती? असा संभ्रम निर्माण झाला होता.

त्यातच आरोग्य विभागाच्या मते कोरोना लक्षणे असल्यास १० दिवसांचे रुग्णालय स्तरावर विलगीकरण, त्यानंतर घरी ७ दिवसांचे विलगीकरण म्हणजे विलगीकरण कालावधी एकूण १७ दिवसांचा असल्याने संभ्रमात अधिकच वाढ झाली होती.

या सगळ्या गदारोळात चाकरमानी गावातही दाखल होऊ लागल्याने गावकºयांची भीती वाढली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढणार, या भयाने काही गावांनी चाकमान्यांनी १४ दिवस विलगीकरणाचा नियम पाळलाच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती.

चाकरमान्यांना ई - पासबाबत अनेक अडचणी येत आहेत. वेळेत पास मिळत नसल्याने त्यांच्याही मनात धाकधूक आहे.ताळमेळ नाहीचाकरमान्यांच्या विलगीकरण कालावधीवरून जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री यांच्यात कुठलाच मेळ नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच १४ दिवसांचेच विलगीकरण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मात्र, रत्नागिरीचे पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी मंगळवारी हा कालावधी १० दिवसांचा असल्याचे जाहीर केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनानेही आपली भूमिका बदलत १० दिवसांच्या विलगीकरणावर शिक्कामोर्तब केले आहे. 

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवkonkanकोकणRatnagiriरत्नागिरी