शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जावे लागते ढोपरभर पाण्यातून, पूल बांधण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:43 IST

एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच, आजही ग्रामीण भागात अनेक महत्त्वाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत.

असगाेली : गुहागर तालुक्यातील वरवेली तेलीवाडीतील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी नेताना नदीतील ढोपरभर पाण्यातून प्रवास करून न्यावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. या नदीवर पूल बांधण्याची मागणी करूनही आजवर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने माणसाच्या मरणानंतरही त्याचा प्रवास खडतरच असल्याचे दिसत आहे.एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच, आजही ग्रामीण भागात अनेक महत्त्वाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. या सोयी-सुविधांकडे शासन व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना आता मरणानंतरही  हाल भोगावे लागत आहेत, मृत्यूनंतर तरी शासन आम्हाला सुखाने मरण देईल का, असा प्रश्न केला जात आहे. गुहागर तालुक्यातील वरवेली-तेलीवाडी येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात कंबरभर पाण्यातून नदी ओलांडून स्मशानभूमीकडे जावे लागत आहे. या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसून प्रेतयात्रा नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.ग्रामीण भागात स्मशानभूमीचा विकास करणे हे दूरच राहिले आहे. विजेची समस्या, अडचणीच्या पायवाटा तसेच भर पावसात नदी-ओढ्यातून कंबरभर पाण्यातून चाललेली प्रेतयात्रा तसेच दगड-धोंड्यातून चाललेला प्रवास ही अवस्था वरवेली तेलीवाडीतील ग्रामस्थांची आहे.वरवेली तेलीवाडीच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना दगड-गोटे तुडवीत, नादुरुस्त रस्त्यावरून, जंगल भागातून अंत्ययात्रा न्यावी लागत आहे. वरवेली तेलीवाडीच्या स्मशानभूमीलगत असणाऱ्या नदीवर पूल बांधून मिळावा, अशी मागणी केली जात आहे.स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पायवाटा तसेच रस्ते त्याची शासन दप्तरी नोंद नाही. याठिकाणी असणाऱ्या नदीवर पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, शासकीय नियमांचे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रेत नेताना नदी ओढ्यातून जावे लागत आहे. ग्रामस्थांच्या या व्यथेकडे लाेकप्रतिनिधी, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी