शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

गाव तेथे क्‍वारंटाईन सेंटर उभारावे : अविनाश लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारावे व जिथे क्वारंटाईन सेंटर आहेत तिथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करावा, ...

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारावे व जिथे क्वारंटाईन सेंटर आहेत तिथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करावा, अशा आशयाचे पत्र नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व राजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेते अविनाश लाड यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून उपयोगात आणल्यास रुग्णसंख्या कमी करता येऊ शकते व रुग्ण गावातच राहिल्याने घरचा जेवणाचा डबा, घरचेच बेड असल्याने कमी खर्चात जास्त रुग्ण बरे होतील, अशी उपाययोजना करणे काळाची गरज आहे. गावातील प्रतिष्ठित लोकांनी हे मनावर घेतल्यास सहजशक्‍य आहे. गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत शिपाई यांना शासकीय आदेश देऊन त्यांना जबाबदारी देण्यात यावी. असे केल्यास ग्रामीण भागातील परिस्थितीत लवकर सुधारणा होईल. तसेच जिथे क्वारंटाईन सेंटर आहेत तिथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करावा. जेणेकरून मृत्यूचा दर कमी होईल, अशा आशयाचे पत्र काॅंग्रेस नेते अविनाश लाड यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे. तसेच सदरचे पत्र रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनाही सादर केले आहे.