शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

स्वखर्चाने ५७ ग्रामपंचायती उभारणार  गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:32 IST

स्वउत्पन्न असलेल्या जिल्ह्यातील मोठ्या ५७ ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे गावातच सेंद्रिय खत निर्मिती होऊन

ठळक मुद्देसांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनातून प्रकल्प-- गावातच सेंद्रिय खत मिळणार - शेतकरी, बागायत करणार सेंद्रिय खताचा वापर - सरपंच, ग्रामसेवकांना खास प्रशिक्षण

रत्नागिरी : स्वउत्पन्न असलेल्या जिल्ह्यातील मोठ्या ५७ ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे गावातच सेंद्रिय खत निर्मिती होऊन त्याचा फायदा तेथील शेतकºयांना होणार आहे. 

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे.  जिल्ह्यात स्वच्छतेवर भर देत असतानाच ग्रामीण भागातील जीवन  रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून कचºयाचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. 

 घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ५७ ग्रामपंचायतींमध्ये  गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत असून त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे़  त्यासाठी गावातील कचरा एकत्रित करुन हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत़ याबाबतचे प्रशिक्षणही या निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह गटविकास अधिकारी , विस्तार अधिकारी यांना देण्यात आलेले आहे,  त्यासाठी त्यांना कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायत आणि सातारा तालुक्यातील नागठाणे ग्रामपंचायत येथे दौराही आयोजित करण्यात आला होता़  त्या निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या स्वनिधीतून हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत़ त्यादृष्टीने सरपंचांना प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे़  

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांच्या माध्यमातून गांडूळ प्रकल्पांबाबत गावातील ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. या प्रकल्पाला ग्रामसभांमध्येही  उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याने जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षामार्फत पुढील काळात अवश्यक असणारी तांत्रिक माहितीही देण्यात येणार आहे. या गांडूळ प्रकल्पांमुळे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील शेतकरी, बागायतदारांना सेंद्रिय खत उपलब्ध होऊन त्याच्या वापराने मोठा फायदा होणार आहे. 

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन माध्यमातून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येणाºया ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे.

तालुका ग्रामपंचायतींची संख्या

मंडणगड  १

दापोली  ५

खेड ११

चिपळूण १०

गुहागर  ४

संगमेश्वर  ९

रत्नागिरी  १०

लांजा  २

राजापूर  ५

एकूण ५७

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी