शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

स्वखर्चाने ५७ ग्रामपंचायती उभारणार  गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:32 IST

स्वउत्पन्न असलेल्या जिल्ह्यातील मोठ्या ५७ ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे गावातच सेंद्रिय खत निर्मिती होऊन

ठळक मुद्देसांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनातून प्रकल्प-- गावातच सेंद्रिय खत मिळणार - शेतकरी, बागायत करणार सेंद्रिय खताचा वापर - सरपंच, ग्रामसेवकांना खास प्रशिक्षण

रत्नागिरी : स्वउत्पन्न असलेल्या जिल्ह्यातील मोठ्या ५७ ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे गावातच सेंद्रिय खत निर्मिती होऊन त्याचा फायदा तेथील शेतकºयांना होणार आहे. 

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे.  जिल्ह्यात स्वच्छतेवर भर देत असतानाच ग्रामीण भागातील जीवन  रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून कचºयाचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. 

 घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ५७ ग्रामपंचायतींमध्ये  गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत असून त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे़  त्यासाठी गावातील कचरा एकत्रित करुन हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत़ याबाबतचे प्रशिक्षणही या निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह गटविकास अधिकारी , विस्तार अधिकारी यांना देण्यात आलेले आहे,  त्यासाठी त्यांना कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायत आणि सातारा तालुक्यातील नागठाणे ग्रामपंचायत येथे दौराही आयोजित करण्यात आला होता़  त्या निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या स्वनिधीतून हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत़ त्यादृष्टीने सरपंचांना प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे़  

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांच्या माध्यमातून गांडूळ प्रकल्पांबाबत गावातील ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. या प्रकल्पाला ग्रामसभांमध्येही  उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याने जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षामार्फत पुढील काळात अवश्यक असणारी तांत्रिक माहितीही देण्यात येणार आहे. या गांडूळ प्रकल्पांमुळे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील शेतकरी, बागायतदारांना सेंद्रिय खत उपलब्ध होऊन त्याच्या वापराने मोठा फायदा होणार आहे. 

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन माध्यमातून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येणाºया ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे.

तालुका ग्रामपंचायतींची संख्या

मंडणगड  १

दापोली  ५

खेड ११

चिपळूण १०

गुहागर  ४

संगमेश्वर  ९

रत्नागिरी  १०

लांजा  २

राजापूर  ५

एकूण ५७

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी