राजापुरात ४,१०० लोकांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:23+5:302021-07-02T04:22:23+5:30
राजापूर : शहरातील तब्बल ४,१०० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, ५ जूनपासून नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रभागनिहाय लसीकरण ...

राजापुरात ४,१०० लोकांना लसीकरण
राजापूर : शहरातील तब्बल ४,१०० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, ५ जूनपासून नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेत सुमारे १,०५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात सध्या कोरोनाचे २३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.
मोफत रोपे वाटप
देवरुख : पांगरी ग्रामपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांनी प्रदूषणाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी वृक्षलागवड, वृक्ष संवर्धनाची धडक मोहीम हाती घेतली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात प्रत्येक कुटुंबाला रोपांचे मोफत वाटप करून संवर्धनाची जबाबदारी संबंधितांवर सोपविण्यात आली आहे.
पूल वाहतुकीसाठी खुला
रत्नागिरी : रत्नागिरी कोस्ट गार्डने विमानतळाचे काम हाती घेतल्यानंतर या परिसरातून जाणारा रस्ता आणि पाण्याची पाइपलाइन मुंबई उपकेंद्राच्या समोरून वळविण्यात आली. तसेच त्या ठिाकाणचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
फगरवठार येथील रस्ता सुरळीत
रत्नागिरी : शहरातील खालचा फगरवठार येथे तीव्र उतारावर आंब्याचे झाड पडल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला होता. तसेच महावितरणचेही मोठे नुकसान झाले. उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांच्या प्रयत्नाने हे आंब्याचे झाड हटविण्यात आल्याने रस्ता सुरळीत सुरू झाला.
मिरकरवाडा येथील कार्यालयाची दुरवस्था
रत्नागिरी : शहरातील मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मिरकरवाडा येथील कार्यालय पूर्णपणे जीर्ण झाले आहे. ते कधीही कोसळू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याकडे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी मच्छीमारांकडून पुढे येत आहे.
पेन्शनची कामे रखडली
राजापूर : तालुक्यातील वाटूळ येथील पोस्ट कार्यालयातील इंटरनेट सुविधा गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने या कार्यालयाचा कारभार ठप्प झाला आहे. यामुळे लाेकांच्या ठेवी भरणे, काढणे, संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन व पोस्टातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची कामे रखडरली आहेत.
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
राजापूर : तालुक्यात रुग्णवाहिकांची कमतरता असताना बंद पडणाऱ्या रुग्णवाहिका दुरुस्तीकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. राजापूर तालुका आरोग्य विभागाची रुग्णवाहिका नादुरुस्त झाली असल्याने पांगरे येथे बेवारस स्थितीत अनेक दिवस ठेवण्यात आलेली आहे.