शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रत्नागिरीतील पानवलकर यांचा प्रयोग, प्लास्टिक वगळता कचऱ्यापासून केले टनभर खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 4:35 PM

रत्नागिरी येथील डॉ. मुकुंद पानवलकर यांनी आपल्या बागेतच कंपोस्ट खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला असून, यातून वर्षभरात सुमारे टनभर खत निर्माण होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील मुकुंद पानवलकर यांचा प्रयोग कचऱ्यापासून केले टनभर खतप्लास्टिक वगळता सर्व कचरा

शोभना कांबळेरत्नागिरी : येथील डॉ. मुकुंद पानवलकर यांनी आपल्या बागेतच कंपोस्ट खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला असून, यातून वर्षभरात सुमारे टनभर खत निर्माण होत आहे. विशेष म्हणजे डॉ. पानवलकर हे गेल्या सहा वर्षांपासून प्लास्टिक वगळून सर्वप्रकारच्या कचऱ्यापासून खताची निर्मिती करीत आहेत.लहानपणापासूनच बागकामाची आवड असलेल्या डॉ. पानवलकर यांनी आपल्या घराभोवती बाग तयार केली असून, त्यात विविध प्रकारची फुलझाडे तसेच काही फळझाडेही लावली आहेत. यामध्ये काही विदेशातील दुर्मीळ फुलांचाही समावेश आहे. या बागेला बाहेरून माती किंवा खत न आणता, ते स्वत:च तयार करीत आहेत.

या सेंद्रीय खताच्या निर्मितीसाठी घरातील कचरा, भाज्यांचे टाकाऊ अवशेष, देठ, पडलेली पाने-फुले, फळांची नको असलेली साले, याचबरोबर वापरलेली चहा पावडर, अंड्याची टरफले, गवत, कागदाचे तुकडे, पुठ्ठे अगदी निर्माल्य आदी वस्तूंचा समावेश त्यांच्या खत निर्मितीत आहे.

नगर परिषदेच्या घंटागाडीतून फक्त प्लास्टिकचा कचराच आम्ही देतो, असे डॉ. पानवलकर सांगतात. खत तयार करण्यासाठी अगदी फुटलेली बादली वा कुंडीचाही वापर ते करतात.आता स्वतंत्र खत निर्मितीसाठी त्यांनी सुमारे तीन फूट उंचीच्या लोखंडी जाळीचा पिंजरा करून घेतला आहे. त्याभोवती नायलॉनची जाळी शिवून घेतली आहे. यात हा सर्व कचरा टाकला जातो. खत तयार होण्यास सुमारे दीड - दोन महिन्यांचा कालावधी लागतो.

घरासभोवताली असलेल्या बागेला हे खत वर्षभर पुरते. पानवलकर दाम्पत्याला प्रवासाची प्रचंड आवड असल्याने देश - विदेशातील विविध प्रकारची फुले, फळे यांची रोपे त्यांच्या बागेत दिसून येतात. एवढेच नव्हे तर डॉ. पानवलकर त्यापासून नव्या रोपांची निर्मितीही करतात.वाढदिवसाचे औचित्य साधून किंवा भेट म्हणून ही रोपे देताना त्यांना विलक्षण आनंद होतो. या रोपांची किंमत बाहेर २०० ते ५०० रूपयांपर्यंत असल्याचे ते सांगतात.गुलाबाची आवड असलेल्या पानवलकर दाम्पत्याच्या या बागेत २५ प्रकारच्या गुलाबांची १०० रोपे लावलेली आहेत. आपल्याकडे विदेशातील रोपे जगत नाहीत, असा समज आहे. मात्र, पानवलकर दाम्पत्याने हा समजही खोटा ठरवला आहे.

या बागेत विविध प्रकारची जास्वंद, गुलाब, सदाफुली, जरबेरा बरोबरच अ‍ॅडेनिअम, आर्किडेझ, युफोर्बिया, पेन्टास, इम्पेशन्स, डान्सिंग डॉल आदी परदेशी फुलेही बहरलेली आहेत.त्याचबरोबर घराच्या आवारात १५ नारळाची झाडे त्याचबरोबर फणस, सोनकेळी, लाल केळी, आवळा, लिंब, रायआवळा, पेरू, पेर, अंजीर, ड्रॅगनफ्रूट, विलायती काजू, अननस, बोन्साय चिकू आदी झाडे या दोघांनी स्वत: आपल्याकडील कामगाराला मदतीला घेऊन लावलेली आहेत.बागेत नवीन रोप लावताना त्यासाठी मातीचा वापर करायलाच हवा, असे नाही. डॉ. पानवलकर आपल्या बागेत रोपे लावण्यासाठी नारळापासून तयार केलेले कोको पीठ (ते सध्या केरळहून मागवतात) वापरतात. त्यात नारळाच्या सोडणांचे तुकडे टाकतात. यातूनही चांगल्या प्रकारची रोपे येत असल्याचे डॉ. पानवलकर सांगतात.परसदारी केली बागरत्नागिरीतील ८३ वर्षीय डॉ. पानवलकर तसेच त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता या दोघांनाही बागेत काम करण्याची आवड आहे. स्मिता पानवलकर यांनीही परसदारी छोटीशी बाग केली असून, त्यात विविध फुलांबरोबरच विविध फळबाज्या, पालेभाज्या, शेंगभाज्या केल्या आहेत. त्यामुळे भाज्या घरच्या घरीच उपलब्ध होतात. त्यांच्या बागेतही त्या सेंद्रीय खताची निर्मिती करीत आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPlastic banप्लॅस्टिक बंदी