शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

रत्नागिरी जिल्ह्यातील धरणे प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई

By मनोज मुळ्ये | Updated: May 23, 2024 17:18 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रे असून, त्याठिकाणी अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई करण्यात येत आहे, अशी सूचना ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रे असून, त्याठिकाणी अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई करण्यात येत आहे, अशी सूचना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांनी दिली आहे. त्याचबराेबर नागरिकांनी नियम पाळून खबरदारी बाळगावी व सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सर्व धरणांचे जलाशय, नदीपात्र या ठिकाणी पाण्याची खोली, साचलेला गाळ इत्यादीमुळे पाण्यात उतरल्यास दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे सर्वच जलाशय, तलाव, नदी, नदीतील पाणीसाठे याठिकाणी नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव जाऊ नये. स्थानिक नदीपात्रालगतच्या स्थानिकांनी पर्यटकांना, बाहेरील नागरिकांना पर्यटन, करमणूक इ. कारणास्तव पाण्यात उतरण्यास मनाई करावी व संभाव्य दुर्घटनांबाबत सूचित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या नदी नाल्यांवर एकूण ४६ लघुपाटबंधारे प्रकल्प व ३ मध्यम प्रकल्प धरणे बांधण्यात आली आहेत. त्यामध्ये नियमितपणे पाणीसाठा करण्यात येत आहे. या धरणांव्यतिरिक्त मृद व जलसंधारण खात्यामार्फतही अनेक स्थानिक नाल्यांवर लहान-लहान धरणे बांधण्यात येऊन, त्यामध्ये पाणीसाठा करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी व बावनदी या नद्यांना पावसाळी हंगामात पूर येतो. या कालावधीत वरच्या भागातील धरणांमुळे अथवा झऱ्यांमुळे त्या प्रवाहित राहतात. प्रवाहामध्ये असल्याने नदीपात्रातच स्थानिक पाणीसाठे तयार होतात. त्यामुळे धरणाच्या जलाशयात अथवा नदीपात्रात पोहणे, जलक्रीडा, पर्यटन, करमणूक इ. सारख्या कारणास्तव नागरिकांनी, लहान मुले अनावधानाने गेल्याने दुर्घटना घडल्या आहेत. त्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. त्याठिकाणी अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई आहे. तसेच नदीपात्रात, काठावर अथवा जलाशयात ज्या शेतकऱ्यांचे पंपमोटर इ. साधने आहेत ती त्यांनी आताच काढून घ्यावीत, अशी सूचनाही गणेश सलगर यांनी केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणtourismपर्यटन