शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

uddhav thackeray : 'केंद्राकडूनही मदत मिळतेय, पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांसोबत माझं बोलणं झालंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 15:48 IST

uddhav thackeray : महापुरात उध्वस्त झालेल्या चिपळूणची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज आले होते. रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या हेलिपॅडवर उतरुन ते चिपळूणला दोन दोन ठिकाणी पाहणी करुन आढावा बैठकीसाठी जात होते

ठळक मुद्देमहापुरात उध्वस्त झालेल्या चिपळूणची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज आले होते. रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या हेलिपॅडवर उतरुन ते चिपळूणला दोन दोन ठिकाणी पाहणी करुन आढावा बैठकीसाठी जात होते

रत्नागिरी/चिपळूण - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूण भागाला आज भेट दिली. येथील महापूरात आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झालेल्या वापाऱ्यांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या. आपलं काय नुकसान झालंय ते आपण पाहिले आहे. आपण चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी येथील व्यापाऱ्यांना दिला. यावेळी, व्यापाऱ्यांनी तीव्र शब्दात मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता, तुमच्याचकडून आम्हाला अपेक्षा आहेत, तुम्हीचं आमचे मायाबाप आहात, अशा शब्दात अनेकांनी मागणी केली. यावेळी, केंद्राकडूनही मदत मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महापुरात उध्वस्त झालेल्या चिपळूणची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज आले होते. रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या हेलिपॅडवर उतरुन ते चिपळूणला दोन दोन ठिकाणी पाहणी करुन आढावा बैठकीसाठी जात होते. मात्र, वाटेतच पानगल्ली येथे जमलेल्या व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना थांबवले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तेथे थांबून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागले. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या. पाणी आयत्यावेळी सोडण्यात आल्याने कमी वेळातच पुराचे प्रमाण वाढले. संबंधित अशा लोकांवर कारवाई व्हावी, ही मागणी व्यापाऱ्यांनी केली. त्यास, मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली असून चिपळूण पुन्हा उभे करण्याचा विश्वास व्यापाऱ्यांना दिला आहे. 

केंद्राकडून मिळतेय मदत, पंतप्रधानांशी झालं बोलणं 

केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात घोषणा करण्यात येईल. मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचना देखील मी प्रशासनाला केल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, केंद्राकडूनदेखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल. केंद्र सरकारकडून आपणास व्यवस्थित मदत मिळत आहे. माझे पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणं झालं आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणChief Ministerमुख्यमंत्रीprime ministerपंतप्रधानfloodपूर