शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ईडीची भीती दाखविल्याने उद्धव ठाकरे भाजपला घाबरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:52 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती घातली असल्याने ते भाजपला घाबरत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दापोली येथे बोलताना केली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने दापोलीत आलेल्या अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली.

ठळक मुद्देईडीची भीती दाखविल्याने उद्धव ठाकरे भाजपला घाबरतातदापोलीतील शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हे यांचा आरोप

दापोली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती घातली असल्याने ते भाजपला घाबरत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दापोली येथे बोलताना केली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने दापोलीत आलेल्या अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली.शिवस्वराज्य यात्रेनिमित्त दापोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेने सुरू केलेली जनआशीर्वाद यात्रा कधी सुरू झाली व कधी संपली ते कुणालाही कळले नाही. सरकारकडून सर्वांचा गेल्या पाच वर्षात सर्व पातळ्यांवर अपेक्षाभंग झालेला आहे. या पाच वर्षात तब्बल १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर १ लाख ४४ हजार युवक बेरोजगार झाले आहेत. कायदा व सुरक्षेचा प्रश्न सुरक्षेचाबोजवारा उडालेला आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा ही सर्वसामान्यांना आपली यात्रा वाटत आहे. रस्तोरस्ती आमचे होणारे स्वागत ही आमच्या विजयाची नांदी असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.ज्यावेळी गुजरात येथे सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला. पण शिवसेनेला महाराष्ट्रात शिवरायांचे स्मारक उभारता आलेले नाही, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कृषी सन्मान योजना सुरू करण्यात आली. या सन्मान योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला का, असे आदित्य ठाकरे राज्यात विचारत फिरत आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही हे त्यांच्या लक्षात आले तरी शिवसेना गप्प का?

महाराष्ट्र शासनाने महाराजांचे किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला. यावेळी शिवसेनेचे मंत्री गप्प का बसले? याचा अर्थ महाराजांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावलेला आहे, असा आरोप त्यांनी केला.या सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेसमवेत महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार संजय कदम, सरचिटणीस अमोल मिटकरी, तालुकाध्यक्ष जयंत जालगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेनेने किती उद्योग उभारले?शिवसेनेने कोकणासाठी काय दिले येथे किती उद्योग उभारले, कितीजणांना नोकऱ्या दिल्या असे प्रश्न डॉ. कोल्हे यांनी विचारले. शिवसेनेने केवळ भावनिक आवाहने करून येथे मते मिळवली, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेRatnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस