शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ईडीची भीती दाखविल्याने उद्धव ठाकरे भाजपला घाबरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:52 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती घातली असल्याने ते भाजपला घाबरत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दापोली येथे बोलताना केली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने दापोलीत आलेल्या अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली.

ठळक मुद्देईडीची भीती दाखविल्याने उद्धव ठाकरे भाजपला घाबरतातदापोलीतील शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हे यांचा आरोप

दापोली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती घातली असल्याने ते भाजपला घाबरत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दापोली येथे बोलताना केली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने दापोलीत आलेल्या अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली.शिवस्वराज्य यात्रेनिमित्त दापोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेने सुरू केलेली जनआशीर्वाद यात्रा कधी सुरू झाली व कधी संपली ते कुणालाही कळले नाही. सरकारकडून सर्वांचा गेल्या पाच वर्षात सर्व पातळ्यांवर अपेक्षाभंग झालेला आहे. या पाच वर्षात तब्बल १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर १ लाख ४४ हजार युवक बेरोजगार झाले आहेत. कायदा व सुरक्षेचा प्रश्न सुरक्षेचाबोजवारा उडालेला आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा ही सर्वसामान्यांना आपली यात्रा वाटत आहे. रस्तोरस्ती आमचे होणारे स्वागत ही आमच्या विजयाची नांदी असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.ज्यावेळी गुजरात येथे सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला. पण शिवसेनेला महाराष्ट्रात शिवरायांचे स्मारक उभारता आलेले नाही, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कृषी सन्मान योजना सुरू करण्यात आली. या सन्मान योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला का, असे आदित्य ठाकरे राज्यात विचारत फिरत आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही हे त्यांच्या लक्षात आले तरी शिवसेना गप्प का?

महाराष्ट्र शासनाने महाराजांचे किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला. यावेळी शिवसेनेचे मंत्री गप्प का बसले? याचा अर्थ महाराजांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावलेला आहे, असा आरोप त्यांनी केला.या सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेसमवेत महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार संजय कदम, सरचिटणीस अमोल मिटकरी, तालुकाध्यक्ष जयंत जालगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेनेने किती उद्योग उभारले?शिवसेनेने कोकणासाठी काय दिले येथे किती उद्योग उभारले, कितीजणांना नोकऱ्या दिल्या असे प्रश्न डॉ. कोल्हे यांनी विचारले. शिवसेनेने केवळ भावनिक आवाहने करून येथे मते मिळवली, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेRatnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस