शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

उद्धवसेनेचे कोकणातील एकमेव नेते भास्कर जाधव यांचे निवृत्तीचे संकेत, कार्यकर्ते संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:14 IST

'ती' खंत अजूनही मनात कायम राहिली

चिपळूण (जि.रत्नागिरी) : उद्धवसेनेचे कोकणातील एकमेव नेते आमदार भास्कर जाधव यांनी नुकतेच राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. मात्र, पक्षाच्या पडत्या काळात विरोधकांवर तुटून पडणाऱ्या या नेत्याच्या संभाव्य निवृत्तीने उद्धवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.गेली ३५ ते ४० वर्षे आमदार भास्कर जाधव हे सक्रिय राजकारणात आहेत. आता राजकारणात थांबावेसे वाटते, अशी भूमिका त्यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडली. त्यांचे हे विधान पक्षांतर्गत नाराजीतून आले आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षांतर्गत आपले विरोधक, विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव जाहीर करण्यास झालेला उशीर, नाव जाहीर झाल्यानंतरही त्याला होत असलेला विलंब याबाबत त्यांनी या आधीही नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत आमदार जाधव यांनी ‘थांबण्या’चा मुद्दा काढल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

'ती' खंत अजूनही मनात कायम राहिली

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांना मंत्रिपद मिळण्याची आशा होती. मात्र, मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याची खंत आजही त्यांच्या मनात आहे. त्यांनी ती बोलूनही दाखविली आहे.

भास्कर जाधव यांचे स्पष्टीकरण

  • मी नाराज असल्याच्या बातम्यांना काही अर्थ नाही. माझ्या मनात नसलेल्या गोष्टींवर मी खुलासा करत नाही.
  • पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात मी भाषण केलं, त्यात कुठेही नाराजीचा लवलेश दिसला का? मी कशाला नाराज होईन?
  • मी आधी कृती करतो, मग बोलतो. यावेळीही मी स्वतःहून पुढे येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी घेतली आहे. ही माझी निष्ठा आणि पक्षनिष्ठा दर्शविणारी कृती आहे.
  • सहा वेळा निवडून आल्यानंतर थांबावे, हे माझे वैयक्तिक मत आहे, पण अजूनही माझ्यात संघर्ष करण्याची ताकद आहे.