शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा; उदय सामंतांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 18:33 IST

Uday Samant On Maratha Reservation: मराठा आरक्षणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा घेण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार तो विषय घेतला जाणार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

Uday Samant On Maratha Reservation: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. यातच मराठा आरक्षणावरून नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. यातच हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा कधी येणार, याबाबत राजकीय वर्तुळात कयास बांधले जात होते. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात मी ज्यावेळी मनोज जरांगे यांना भेटलो होतो, त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात चर्चा होईल असे आश्वासन दिले होते. मनोज जरांगे यांनी जी पहिली मागणी केली होती, ती आम्ही पूर्ण केली आहे. त्याच्यावर काम सुरू असून, निजामकालीन ज्या काही नोंदी सापडत आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा

हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात चर्चा होणार आहे. मराठा समाजाच्या, आरक्षणाच्या निमित्ताने ही चर्चा होणार आहे. या चर्चेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अनेक गोष्टी सांगतील. इम्पिरिकल डेटा गोळा करून, आयोगाला सांगून, जमा झालेला इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात मांडून मराठा समाज कसा मागासलेला आहे हे आम्ही सिद्ध करणार आहोत. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारा आरक्षण आम्ही देणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उदय सामंत यांनी उत्तर दिले. आदित्य ठाकरे यांना काय वाटते यापेक्षा मुंबईकरांना काय वाटते हे महत्वाचे आहे. मुंबईची स्वच्छता करण्यासाठी आजपर्यंत कधीही कोणता मुख्यमंत्री रस्त्यावर उतरला नसल्याची लोकांची प्रतिक्रिया आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्याने कॉंक्रिटीकरणाचा निर्णय घेतला नाही, कोणताही मुख्यमंत्री नाल्यात उतरून सफाई कशी झाली हे पाहत नाही. त्यामुळे ज्यांनी कधी नाल्यात उतरून सफाई केली नाही, कधी रस्त्यावर येऊन स्वच्छता केली नाही त्यांना याचे महत्व कळणार नाही. मुंबईकरांनी कालच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMaratha Reservationमराठा आरक्षणUday Samantउदय सामंत