शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा; उदय सामंतांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 18:33 IST

Uday Samant On Maratha Reservation: मराठा आरक्षणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा घेण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार तो विषय घेतला जाणार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

Uday Samant On Maratha Reservation: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. यातच मराठा आरक्षणावरून नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. यातच हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा कधी येणार, याबाबत राजकीय वर्तुळात कयास बांधले जात होते. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात मी ज्यावेळी मनोज जरांगे यांना भेटलो होतो, त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात चर्चा होईल असे आश्वासन दिले होते. मनोज जरांगे यांनी जी पहिली मागणी केली होती, ती आम्ही पूर्ण केली आहे. त्याच्यावर काम सुरू असून, निजामकालीन ज्या काही नोंदी सापडत आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा

हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात चर्चा होणार आहे. मराठा समाजाच्या, आरक्षणाच्या निमित्ताने ही चर्चा होणार आहे. या चर्चेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अनेक गोष्टी सांगतील. इम्पिरिकल डेटा गोळा करून, आयोगाला सांगून, जमा झालेला इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात मांडून मराठा समाज कसा मागासलेला आहे हे आम्ही सिद्ध करणार आहोत. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारा आरक्षण आम्ही देणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उदय सामंत यांनी उत्तर दिले. आदित्य ठाकरे यांना काय वाटते यापेक्षा मुंबईकरांना काय वाटते हे महत्वाचे आहे. मुंबईची स्वच्छता करण्यासाठी आजपर्यंत कधीही कोणता मुख्यमंत्री रस्त्यावर उतरला नसल्याची लोकांची प्रतिक्रिया आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्याने कॉंक्रिटीकरणाचा निर्णय घेतला नाही, कोणताही मुख्यमंत्री नाल्यात उतरून सफाई कशी झाली हे पाहत नाही. त्यामुळे ज्यांनी कधी नाल्यात उतरून सफाई केली नाही, कधी रस्त्यावर येऊन स्वच्छता केली नाही त्यांना याचे महत्व कळणार नाही. मुंबईकरांनी कालच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMaratha Reservationमराठा आरक्षणUday Samantउदय सामंत