शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चक्रीवादळाने सारं काही हिरावलं, तरी कॉफीच्या शेतीनं सावरलं; दापोलीतील शेतकऱ्याची यशस्वी गाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 17:53 IST

कोकणातील लाल मातीत किफायतशीर पीक

शिवाजी गोरेदापोली : अवकाळी पाऊस, चक्रीवादळे या नैसर्गिक आपत्तीने कोकण किनारपट्टीवरील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. चक्रीवादळामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले, पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र यातही दापोलीतील प्रगतशील शेतकऱ्याला कॉफी पिकाने सावरलं. उदय जोशी असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. चक्रीवादळाने सारं  काही हिरावलं, तरीही कॉफी पिकाने सावरलं, असे उदय जोशी यांनी सांगितले.कोकणातील लाल मातीत सर्वसाधारण जमिनीत सुद्धा कॉफी शेती अतिशय किफायतशीर होऊ शकते. या पिकावर कोणतेही चक्रीवादळाचा परिणाम होत नसून हे पीक शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असल्याचे उदय जोशी यांनी सांगितले.जोशी यांनी कॉफी लागवड सहा वर्षापूर्वी केली होती. केरळ राज्यातून दोन बिया आणून त्यांनी कॉफीची लागवड केली होती. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून आज त्यांच्याकडे १४० ते १६० कॉपीची झाडे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे निसर्ग वादळात आंबा, काजू, नारळ, सुपारी, व अनेक जंगली झाडांना फटका बसला. काही झाडे उन्मळून पडली तर काही झाडांचं उत्पन्न घटलं. मात्र, त्याही परिस्थिती कॉफी चे झाडे तग धरून होती. या झाडावर कोणताही परिणाम झाला नाही.कॉफीला मोठी मागणीकॉफीच्या ६ वर्षाच्या झाडापासून सुमारे साडेतीन किलो कॉफी मिळत आहे , ओली कॉफी १४० ते १५० किलो प्रमाणे विकली जात आहे . काही लोक कॉफी बनवण्यासाठी विकत घेतात तसेच काही शेतकरी तर लागवडीसाठी बियाणे म्हणून विकत घेतात. त्यामुळे चांगलाच फायदा होतो. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झाली असल्याने प्रोसेसिंग करिता गावातील शेतकरी कॉफीच्या बिया विकत घेत आहे.कोकणातील लाल मातीत किफायतशीर पीककोकणातील लाल मातीत किफायतशीर पीक म्हणून शेतकऱ्याने या पिकाचा विचार करायला हरकत नाही. तसेच कोकणातील वातावरणात हे पीक अतिशय उत्तम प्रकारे येऊ शकतं. त्याचा शेतकऱ्यांना खास फायदा होऊ शकतो. बागायती शेतीला पर्याय म्हणून कॉफी चा पर्याय उपलब्ध आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी