शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राजापुरातील दोन विनापरवाना कातभट्ट्या वनविभागाकडून सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:31 IST

खैर तोडीवरही निर्बंध

राजापूर : विनापरवाना सुरू असलेल्या दोन कातभट्ट्या राजापूर वनविभागाने सील केल्या आहेत. कातभट्टी व्यवसायाबाबत शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा वनविभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती राजापूर वनविभागाकडून देण्यात आली.पर्यावरणाला धोका होऊ नये यासाठी कातभट्टी व कात उद्योगाबाबत शासनाने प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कातभट्टी व्यावसायिकांवर कठोर निर्बंध आणले आहेत. जिल्हा वनविभागाने सर्वच कातभट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत.राजापूर तालुक्यात एकूण चार कातभट्ट्या होत्या. यापैकी दोन कातभट्ट्या गेली काही वर्षे बंद आहेत. राजापूर शहरानजीक उन्हाळे येथे पन्हळेकर हर्बल प्रॉडक्ट्स व मठखुर्द येथे परब कातउद्योग समूह अशा दोन कातभट्ट्या सुरू होत्या. राजापूर वनविभागाने ऑक्टोबर २०२४ मध्ये या दोन्ही कातभट्ट्यांवर छापा टाकून सुमारे १,४४० किलो इतके कातद्रव्य जप्त केले होते.विनापरवाना कातभट्टी चालविल्याप्रकरणी या दोन्ही कातउद्योगाच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले.

आता वनविभागाने ६ व ७ फेब्रुवारी रोजी या दोन्ही कातभट्ट्यांवर प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित मालकांच्या समक्ष त्या सील केल्या आहेत.

खैर तोडीवरही निर्बंधखैराच्या झाडावर प्रक्रिया करून त्यापासून कात बनवला जातो. वर्षानुवर्षे जिल्ह्यात हे व्यवसाय सुरू आहेत. त्यातही चिपळूण तालुक्यात खैर लागवड आणि कातभट्ट्यांचे प्रमाण अधिक आहे. वनविभागाने तेथेही अनेक ठिकाणी छापे टाकून कातभट्ट्या बंद केल्या आहेत. पर्यावरणाच्या मुद्यावरुन खैर तोडीवर निर्बंध आहेत. ते कात भट्ट्यांसाठीच तोडले जात असल्याने अशा भट्ट्यांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरforest departmentवनविभाग