शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

पोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:20 IST

संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृतांची नावे आहेत.

ठळक मुद्देपोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यूसंगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील घटना, दोघांचेही मृतदेह हाती

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृतांची नावे आहेत.सुजय आणि अमित हे दोघेही शनिवारी दुपारी १२ वाजता आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन बाहेर निघून गेले. यानंतर ते संध्याकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा शोध सुरु झाला. ते पोहायला गेले असावेत, अशी शंका आल्याने त्यादृष्टिने काहींनी शोध सुरू केला. त्यानुसार आंगवली बावनदी पात्रातील विठाबाई - कासार कोळवण पुलाजवळ नदीशेजारी त्यांची दुचाकी व काही वस्तू आढळल्या. त्यानंतर नदीत शोधमोहीम सुरु करण्यात आली. रविवारी सकाळपर्यंत त्यांचा काहीही पत्ता न लागल्याने याची माहिती देवरुख पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर मासे पकडणाऱ्या घोरपी बांधवांना शोधासाठी बोलावण्यात आले. त्यांनी पहिला मृतदेह ११. ३० वाजता शोधून काढला. याच वेळी देवरुखमधील राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीचे गणेश जंगम, अण्णा बेर्डे, राजा गायकवाड, दिलीप गुरव, चंद्रकांत भोसले, विशाल तळेकर, सिध्दू वेल्हाळ, निरंजन बेर्डे, प्रवीण परकर, वरद जंगम, पराग लिंबूकर, दीपक गेल्ये तेथे आले. त्यांनीही शोधकार्यासाठी मदत केली. दुपारी दीडच्या सुमाराला दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. हातीव व कासारकोळवणमधील ग्रामस्थांनीही शोधकार्यात मदत केली.दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल व्ही. डी. मावळणकर हे करत आहेत.लॉकडाऊमुळे गावीयातील अमित माईन याचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला होता. तो मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कामाला होता. लॉकडाऊनमुळे तो गावी आला होता. या क्षेत्रात त्याला नाव कमवायचे होते. तर सुजय हा कामासाठी दोन दिवसांनी मुंबईत जाणार होता. मोठी नोकरी करून तोही आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करणार होता. या घटनेने दोघांची स्वप्न अधुरी राहिली आहेत.दोघे बालंबाल वाचलेया घटनेत मृत झालेले दोघे आणि त्यांचे दोन भाऊही त्यांच्या सोबत पोहायला जाणार होते. मात्र, या दोघांना घाई लागल्याने ते पुढे निघून गेले. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच ते दोघे भाऊ तिथे पोहोचले. मात्र, फक्त दुचाकी दिसत होती. अमित आणि सुजयचा पत्ता नसल्याने त्यांना संशय आला. याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली त्यानंतर शोधमोहीम सुरु झाली. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी