शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:20 IST

संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृतांची नावे आहेत.

ठळक मुद्देपोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यूसंगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील घटना, दोघांचेही मृतदेह हाती

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृतांची नावे आहेत.सुजय आणि अमित हे दोघेही शनिवारी दुपारी १२ वाजता आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन बाहेर निघून गेले. यानंतर ते संध्याकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा शोध सुरु झाला. ते पोहायला गेले असावेत, अशी शंका आल्याने त्यादृष्टिने काहींनी शोध सुरू केला. त्यानुसार आंगवली बावनदी पात्रातील विठाबाई - कासार कोळवण पुलाजवळ नदीशेजारी त्यांची दुचाकी व काही वस्तू आढळल्या. त्यानंतर नदीत शोधमोहीम सुरु करण्यात आली. रविवारी सकाळपर्यंत त्यांचा काहीही पत्ता न लागल्याने याची माहिती देवरुख पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर मासे पकडणाऱ्या घोरपी बांधवांना शोधासाठी बोलावण्यात आले. त्यांनी पहिला मृतदेह ११. ३० वाजता शोधून काढला. याच वेळी देवरुखमधील राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीचे गणेश जंगम, अण्णा बेर्डे, राजा गायकवाड, दिलीप गुरव, चंद्रकांत भोसले, विशाल तळेकर, सिध्दू वेल्हाळ, निरंजन बेर्डे, प्रवीण परकर, वरद जंगम, पराग लिंबूकर, दीपक गेल्ये तेथे आले. त्यांनीही शोधकार्यासाठी मदत केली. दुपारी दीडच्या सुमाराला दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. हातीव व कासारकोळवणमधील ग्रामस्थांनीही शोधकार्यात मदत केली.दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल व्ही. डी. मावळणकर हे करत आहेत.लॉकडाऊमुळे गावीयातील अमित माईन याचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला होता. तो मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कामाला होता. लॉकडाऊनमुळे तो गावी आला होता. या क्षेत्रात त्याला नाव कमवायचे होते. तर सुजय हा कामासाठी दोन दिवसांनी मुंबईत जाणार होता. मोठी नोकरी करून तोही आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करणार होता. या घटनेने दोघांची स्वप्न अधुरी राहिली आहेत.दोघे बालंबाल वाचलेया घटनेत मृत झालेले दोघे आणि त्यांचे दोन भाऊही त्यांच्या सोबत पोहायला जाणार होते. मात्र, या दोघांना घाई लागल्याने ते पुढे निघून गेले. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच ते दोघे भाऊ तिथे पोहोचले. मात्र, फक्त दुचाकी दिसत होती. अमित आणि सुजयचा पत्ता नसल्याने त्यांना संशय आला. याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली त्यानंतर शोधमोहीम सुरु झाली. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी