शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:20 IST

संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृतांची नावे आहेत.

ठळक मुद्देपोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यूसंगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील घटना, दोघांचेही मृतदेह हाती

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृतांची नावे आहेत.सुजय आणि अमित हे दोघेही शनिवारी दुपारी १२ वाजता आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन बाहेर निघून गेले. यानंतर ते संध्याकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा शोध सुरु झाला. ते पोहायला गेले असावेत, अशी शंका आल्याने त्यादृष्टिने काहींनी शोध सुरू केला. त्यानुसार आंगवली बावनदी पात्रातील विठाबाई - कासार कोळवण पुलाजवळ नदीशेजारी त्यांची दुचाकी व काही वस्तू आढळल्या. त्यानंतर नदीत शोधमोहीम सुरु करण्यात आली. रविवारी सकाळपर्यंत त्यांचा काहीही पत्ता न लागल्याने याची माहिती देवरुख पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर मासे पकडणाऱ्या घोरपी बांधवांना शोधासाठी बोलावण्यात आले. त्यांनी पहिला मृतदेह ११. ३० वाजता शोधून काढला. याच वेळी देवरुखमधील राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीचे गणेश जंगम, अण्णा बेर्डे, राजा गायकवाड, दिलीप गुरव, चंद्रकांत भोसले, विशाल तळेकर, सिध्दू वेल्हाळ, निरंजन बेर्डे, प्रवीण परकर, वरद जंगम, पराग लिंबूकर, दीपक गेल्ये तेथे आले. त्यांनीही शोधकार्यासाठी मदत केली. दुपारी दीडच्या सुमाराला दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. हातीव व कासारकोळवणमधील ग्रामस्थांनीही शोधकार्यात मदत केली.दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल व्ही. डी. मावळणकर हे करत आहेत.लॉकडाऊमुळे गावीयातील अमित माईन याचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला होता. तो मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कामाला होता. लॉकडाऊनमुळे तो गावी आला होता. या क्षेत्रात त्याला नाव कमवायचे होते. तर सुजय हा कामासाठी दोन दिवसांनी मुंबईत जाणार होता. मोठी नोकरी करून तोही आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करणार होता. या घटनेने दोघांची स्वप्न अधुरी राहिली आहेत.दोघे बालंबाल वाचलेया घटनेत मृत झालेले दोघे आणि त्यांचे दोन भाऊही त्यांच्या सोबत पोहायला जाणार होते. मात्र, या दोघांना घाई लागल्याने ते पुढे निघून गेले. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच ते दोघे भाऊ तिथे पोहोचले. मात्र, फक्त दुचाकी दिसत होती. अमित आणि सुजयचा पत्ता नसल्याने त्यांना संशय आला. याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली त्यानंतर शोधमोहीम सुरु झाली. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी