शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

रघुवीर घाटातील प्रवास ठरताेय हृदयाचे ठाेके चुकविणाराच, रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांना जाेडणारा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:29 IST

घाटात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेट्स मोडलेल्या अवस्थेत आहेत.

हर्षल शिराेडकरखेड : रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांना जोडणारा घाट म्हणजे रघुवीर घाट. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील २० ते  २५ गावांना भौगोलिकदृष्ट्या खेड शहर व तालुक्यात सहजपणे जोडणारा रघुवीर घाट १२ किलाेमीटर लांबीचा आहे. समुद्र सपाटीपासून ७६० मीटर उंचीवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कांदाट खोऱ्याला खेड तालुक्याला जोडणारा हा घाटातील प्रवास म्हणजे हृदयाचे ठोके चुकविणाराच असताे.सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या १२ किलाेमीटरच्या रघुवीर घाटात घडत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हा मार्ग वाहतुकीला धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या काही वर्षांत रघुवीर घाट पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले असून, तीनही मोसमात याठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. खेड आगारातून खेड-उचाट-अकल्पे एसटी बस सुरू असून, खासगी वाहनांची सेवाही सुरू आहे. कोकण व सातारा जिल्हा एकत्र आणणारा हा घाट दळणवळणाच्या दृष्टीने सुरक्षित असणे गरजेचे आहे.खोपी, शिंदी, वळवण, बामणोलीमार्गे तापोळ्याकडून फेरीबोटीने पर्यटकांना महाबळेश्वरला जाता येते. याकरिता हा एक चांगला मार्ग आहे. घाटात पावसाळ्यात अनेकवेळा रस्त्यावर दरड येते. गेली दोन-तीन वर्षे या घाटामध्ये एसटी बसेस अडकून पडल्या आहेत.यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घाटातील अवघड वळणावर दोन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.  २०११ मध्ये पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे हा घाट तब्बल चार दिवस बंद होता. या घाटाचा प्रस्ताव १९९० मध्ये तयार करून १९९३ मध्ये हा घाट सुरू करण्यात आला. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या कांदाटी खोऱ्यातील गावांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. घाटात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेट्स मोडलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यात बांधकाम विभागाने दरड कोसळल्यास रस्ता पूर्ववत करण्यासाठी खोपी येथे जेसीबी उपलब्ध असताे. वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रघुवीर घाटात रस्त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे.

वनखात्याची जमीनरत्नागिरी-सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारे दोन रस्ते खेड तालुक्याच्या हद्दीतून पुढे जातात. रघुवीर घाटमार्गे सातारा आणि हातलोट घाटमार्गे सातारा असे हे दोन मार्ग आहेत. परंतु, या दोन्ही रस्त्यांवर वनखात्याची जमीन आहे. यापूर्वी वनखात्याने परवानगी दिली असती तर हे दोन्ही मार्ग सातारा जिल्ह्याला कधीच जोडले गेले असते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSatara areaसातारा परिसर