शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

कुळांच्या जमिनीत भ्रष्टाचार करणाऱ्या वाटदच्या कोतवालाची बदली, रत्नागिरीचे तहसीलदारांनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 12:16 IST

काेतवालाची जयगड येथे बदली करण्याचे आदेश

रत्नागिरी : वाटद (ता. रत्नागिरी) येथील कोतवाल दीपक लक्ष्मण गमरे यांनी कुळांच्या एकरात नव्हे, काही हेक्टरात जमिनीत भ्रष्टाचार केला आहे. याबाबत त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पाच अर्जदारांसह ३० लोकांच्या सह्या असलेल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे करण्यात आली होती. याबाबत रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी वाटद येथील शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला असून, पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच काेतवालाची जयगड येथे बदली करण्याचे आदेश दिले आहेत.कोतवालांना गावातील जमिनीसंदर्भात अधिकार, अभिलेख, कागदपत्रे सहज उपलब्ध होतात. गावामध्ये कोणत्या कुळाची कुठे वहिवाट आहे; अनेक वेळा प्रत्यक्ष जागेवर कुळाची वहिवाट असूनही त्यांचे नाव सातबाऱ्यावर नमूद करण्याचे राहिलेले असते, याची माहिती कार्यालयातून शोधून त्या ठिकाणी कूळ लावण्यास अर्ज दाखल करून उच्च महसुली अधिकाऱ्यांच्या मदतीने या जमिनी बळकाविण्याचे काम गमरे हे करतात. तसेच या कुळांबाबत माहिती घेण्यास कोणी आल्यास त्यांना जाणीवपूर्वक उलट-सुलट कारणे देऊन त्यांची दिशाभूल करतात, असे आरोप या निवेदनात करण्यात आले होते.अर्जदार हे शेतकरी असून, ते पूर्वापार या जमिनीत भातशेती, नाचणी, काजू, आंबा ही वडिलोपार्जित पारंपरिक शेती करीत आहेत. या ठिकाणी वहिवाट दाखविण्याचा काेतवाल गमरेचा काहीही संबंध नसतानाही त्यांनी येथे जाणीवपूर्वक वहिवाट दाखविली आहे. तक्रारींवर काही सुनावण्या झाल्या असून, पहिला आदेश शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे.तक्रारदार यांचा हक्क अंशत: मंजूर करण्यात आला आहे. तसेच २००५ ला सेवेत दाखल झाल्यानंतर कूळ कायद्याने ज्या मालमत्ता प्राप्त केलेले आहेत. त्या प्राप्त करण्यापूर्वी किंवा विक्री करून घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारे सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतल्याचे दिसत नाही. याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील १९ व ३ नुसार उल्लंघन केल्याचे दिसत असल्याने कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार जाधव यांनी दिले आहेत. तसेच वाटद या गावात त्यांचे हितसंबंध तयार झालेले असल्याने १९५९ मधील तरतुदीनुसार त्यांची बदली जयगडला केली आहे. ७० ब खाली केलेल्या दाव्यांच्या सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी