शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 18:17 IST

परशुराम घाटात मंगळवारी (16 जुलै) पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देपरशुराम घाटात मंगळवारी (16 जुलै) पुन्हा एकदा दरड कोसळली आहे.दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

चिपळूण - परशुराम घाटात मंगळवारी (16 जुलै) पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसाचा रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. सोमवारी चिपळूण शहराची बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आज परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प आहे. 

सोमवारी दापोली-खेड हा मार्ग बंद झाला तर मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सकाळी  7.10 वाजताच गाठल्याने सकाळी 9.30 वाजल्यापासून रस्ता वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच रत्नागिरी-गुहागर भातगाव मार्गे वाहतूक बंद झाली होती. रस्त्यावर मोठे दगड व दरड कोसळल्याने तसेच पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद  झाला होता. गुहागर-भातगाव-रत्नागिरी मार्ग मेढे तर्फे फुणगुस येथे मोठी दगड व दरड कोसळल्याने तसेच रस्ता वाहून गेल्याने मार्ग बंद झाला. 

पावसाचा जोर वाढताच महामार्गासह शहरातील खड्ड्यांची संख्या आणि आकारही वाढत असल्याचे समीकरण दरवर्षी पहायला मिळते. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. पनवेल परिसरातील मुंबई-गोवा महामार्गावर तारा, पळस्पे फाटा, ओएनजीसी परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने उसळत आहेत. त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच चारचाकी वाहनांचेही नुकसान होत आहे.

कोकणवासियांसाठी मुंबई-गोवा महामार्ग महत्त्वाचा मार्ग आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महामार्गाची बरीच कामे पूर्ण झाली आहेत. तसेच रुंदीकरणाचे कामही वेगात सुरू आहे. मात्र कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने पावसाच्या सुरुवातीलाच महामार्ग खड्डेमय झाला आहे. सध्याच्या घडीला कर्नाळा, आपटा फाटा, तारा गाव आदी ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली पहायला मिळते. खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा वेग आपोआपच मंदावतो. गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. त्यातच हा मार्ग खड्डेमय असल्यास अपघात होऊन कोंडीत आणखी भर पडते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची त्वरित डागडुजी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :MumbaiमुंबईgoaगोवाTrafficवाहतूक कोंडीRainपाऊस