शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

Parshuram Ghat: परशुराम घाटात वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:47 IST

घाटात जागोजागी केलेल्या खोदाईमुळे दरडीचा धोका असल्याने अनेक जण भयभीत झाले होते.

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एकाच वेळी अनेक अवजड वाहने आल्याने व त्यातच चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने बुधवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक ठप्प झाली. वाहतूक नियंत्रक विभागाचे पोलीस नसल्याने संपूर्ण घाट वाहनांनी व्यापला. त्यातच घाटात जागोजागी केलेल्या खोदाईमुळे दरडीचा धोका असल्याने अनेक जण भयभीत झाले होते.परशुराम घाटात चौपदरीकरणांतर्गत संरक्षक भिंत उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत दीडशे मीटरहून अधिक संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र संरक्षक भिंती सोबतच डोंगराच्या बाजूने खोदाई व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी रस्त्यालगतच मोठमोठे दगड व भरावाचे माती ठेवले आहे. त्यामुळे या घाटातून एकेरी वाहतूक करणे शक्य आहे. तरी देखील दोन्ही बाजूने अवजड वाहने सोडले जात असल्याने अनेकदा या घाटात वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत.अशातच बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून तब्बल दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. यामध्ये अवजड वाहनांचे एसटी व कंपन्यांच्या बस देखील अडकून पडल्या होत्या. परशुराम मंदिर फाटा ते सवतसडा धबधब्यापर्यंत संपूर्ण घाट वाहनांनी व्यापून गेला होता. त्यानंतर पीर लोटे येथील वाहतूक विभागाचे पोलीस तेथे दाखल झाले. त्यानंतर काही वाहनांची त्यातून सुटका झाली. मात्र त्यानंतरही अनेक वाहने अडकून पडले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी