शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

थर्डी फर्स्टसाठी पर्यटकांना लागले कोकणचे वेध; गणपतीपुळे, वेळणेश्वरला विशेष पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 17:47 IST

पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटकांची पसंती असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील निवासस्थानांचे आरक्षण ७५ ते ८० टक्के झाले आहे.

रत्नागिरी : डिसेंबर महिना सुरू होताच, आता पर्यटकांना कोकणचे वेध लागले आहेत. हळूहळू थंडीला सुरुवात झाल्याने या आल्हाददायी वातावरणात भटकंती करण्यासाठी पर्यटकांची तयारी सुरू झाली आहे. आठ डिसेंबरपासून पर्यटक जिल्ह्यात येण्यास सुरुवात होत आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटकांची पसंती असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील निवासस्थानांचे आरक्षण ७५ ते ८० टक्के झाले आहे.कोकणात थंडीच्या हंगामात पर्यटनाला बहर येतो. कोरोना काळात दोन वर्षे पर्यटन पूर्णपणे थांबले होते. गेल्या डिसेंबरपासून कोरोना कमी झाल्याने पुन्हा हळूहळू पर्यटन वाढू लागले आहे. गेल्या वर्षभरात पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मे महिन्याप्रमाणेच यंदा हिवाळी पर्यटनासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.शाळा - महाविद्यालयातील मुलांच्या प्रथम सत्रातील परीक्षाही आता आटोपल्या आहेत. त्यामुळे  थंडीच्या ‘हेल्दी सीझन’मध्ये पर्यटक जिल्ह्यातील नयनरम्य पर्यटन स्थळांकडे येण्यासाठी उत्सुक आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांकडे पर्यटकांची पावले आताच वळली आहेत. त्याचप्रमाणे गुहागर येथील वेळणेश्वरला पर्यटकांची अधिक पसंती असते. त्या दोन्ही ठिकाणच्या एमटीडीसीच्या निवासस्थानांचे आरक्षण वाढू लागले आहे. ८ डिसेंबरपासून अगदी ५ जानेवारीपर्यंत गणपतीपुळे येथील आरक्षण आताच ७५ ते ८० टक्के झाले आहे. त्याचबरोबर वेळणेश्वरचेही आरक्षण होऊ लागले आहे.रत्नागिरीतील सागरकिनाऱ्यांचे पर्यटकांना विशेष आकर्षण असल्याने गणपतीपुळे, पावस ठिकाणी येणारे पर्यटक सागर किनाऱ्यांकडेही मोठ्या प्रमाणावर वळतात. त्यामुळे आता हळूहळू रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढण्यास सुरुवात होणार आहे. सध्या वातावरण अधिकच आल्हाददायी असल्याने नाताळच्या सुटीसाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात दीर्घ काळ राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. पर्यटकांना विविध प्रकारच्या सुविधा देण्यासाठी विविध पर्यटन व्यावसायिकही पुढे सरसावले आहेत.पर्यटकांसाठी एमटीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यात २५६ निवास न्याहरी योजनेचे लाभार्थी सेवा देत आहेत. या व्यवसायात येण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा एमटीडीसीकडून देण्यात आली आहेत. एमटीडीसीची सर्व निवासस्थाने पर्यटकांसाठी सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.  खासगी व्यावसायिकांनीही त्यासाठी जय्यत तयारी केली आहे.संस्कृती उलगडणारपर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने ‘महाभ्रमण’ ही नावीन्यपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून त्या त्या भागातील संस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृती आदींची ओळख पर्यटकांना करून देणे, हा मुख्य उद्देश आहे. याद्वारे जिल्ह्यातही कृषी पर्यटन, निसर्गरम्य स्थळांचे आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी पर्यटन व्यावसायिक करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. एमटीडीसीच्या गणपतीपुळे येथील निवासस्थानाचे आरक्षण ८ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीसाठी आताच ७५ ते ८० टक्के झाले आहे. हा कालावधी १५ जानेवारीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यंदाचा हिवाळी पर्यटनाचा हंगामही हाऊसफुल्ल जाईल. - संजय ढेकणे, व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (कोकण विभाग)

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNew Yearनववर्ष