शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पर्यटन झालं, पण पुण्यात पाऊल ठेवेपर्यंत धाकधूक, श्रीनगरला गेलेल्या रत्नागिरीच्या कुलकर्णी दाम्पत्याचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:34 IST

शोभना कांबळे रत्नागिरी : जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. मात्र, परतीच्या प्रवासात ...

शोभना कांबळेरत्नागिरी : जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. मात्र, परतीच्या प्रवासात विमानतळावरच पहलगाम येथील बैसरन खोरे परिसरात झालेल्या दहशतवादी जीवघेण्या हल्ल्याची बातमी कळली आणि त्यानंतर सर्व प्रवास सुखाचा झाला तरीही पुण्याच्या भूमीवर पाय ठेवेपर्यंत धाकधूक कायम होती, अशा शब्दात रत्नागिरीतील अभ्युदय नगर भागातील रहिवासी पद्मजा कुलकर्णी यांनी आपला अनुभव सांगितला. बुधवारी सकाळी पुण्यात आल्यानंतर त्यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.पद्मजा कुलकर्णी आणि त्यांचे पती नंदकुमार कुलकर्णी पुण्यातील त्यांच्या नातेवाईकांसोबत श्रीनगर येथे पर्यटनासाठी गेले होते. पुण्यातील ट्रॅव्हल्समधून एकूण ३२ जण यात सहभागी होते. रत्नागिरीतून कुलकर्णी दाम्पत्य आणि पद्मजा कुलकर्णी यांचे पुण्यातील तीन बंधू आणि त्यांच्या पत्नी असे साळसकर परिवारातील सहा मिळून एकूण आठ जण १६ एप्रिल रोजी श्रीनगरला पोहोचले. येथील विविध स्थळे पाहून ही सर्व मंडळी रविवार, २० रोजी पहलगामला गेली होती. मात्र, यावेळी काहीच गडबड दिसत नव्हती. सर्वत्र शांत होते. याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कमांडोही होते. त्यामुळे भीतीचा लवलेशही नव्हता. पहलगाम येथील बैसरन पाॅईंट पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक जात असतात. सोमवारी गुलमर्ग पाहून झाल्यावर मंगळवारी दुपारी पुन्हा परतीच्या प्रवासासाठी श्रीनगर येथे विमानतळावर दाखल झालो. जाताना दिल्ली मार्गे विमानाने प्रवास होता तर येताना चंडीगड मार्गे यावे लागणार होते. दुपारी अगदी जेवतानाही पहलगाम हल्ल्याविषयी काहीच माहीत नव्हते. मात्र, श्रीनगर विमानतळावर आल्यावर पहलगाम हल्ल्याची बातमी कळली, त्यात २८ जण गेल्याचे कळले आणि मग आपण घरी सुखरूप पाेहोचू ना? या भीतीने अस्वस्थ केले, असे पद्मजा कुलकर्णी सांगतात.त्यानंतर चंडीगड येथे उतरेपर्यंत त्यांना आपल्या घरच्यांशी कुठल्याही तऱ्हेचा संपर्क होत नव्हता. मात्र, चंडीगड विमानतळावर पोहोचल्यानंतर घरच्यांचे फोन खणाणू लागले. नातेवाईकांनी त्यांचे आवाज ऐकल्यावर आणि सर्व सुखरूप आहेत, हे कळल्यावर हायसे वाटले. अखेर चंडीगडहून पुण्यात रात्री १ वाजता ही सर्व मंडळी पोहोचली आणि घरी सुखरूप आणल्याबद्दल सर्वांनीच ईश्वराचे आभार मानले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन