शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

पर्यटन झालं, पण पुण्यात पाऊल ठेवेपर्यंत धाकधूक, श्रीनगरला गेलेल्या रत्नागिरीच्या कुलकर्णी दाम्पत्याचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:34 IST

शोभना कांबळे रत्नागिरी : जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. मात्र, परतीच्या प्रवासात ...

शोभना कांबळेरत्नागिरी : जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. मात्र, परतीच्या प्रवासात विमानतळावरच पहलगाम येथील बैसरन खोरे परिसरात झालेल्या दहशतवादी जीवघेण्या हल्ल्याची बातमी कळली आणि त्यानंतर सर्व प्रवास सुखाचा झाला तरीही पुण्याच्या भूमीवर पाय ठेवेपर्यंत धाकधूक कायम होती, अशा शब्दात रत्नागिरीतील अभ्युदय नगर भागातील रहिवासी पद्मजा कुलकर्णी यांनी आपला अनुभव सांगितला. बुधवारी सकाळी पुण्यात आल्यानंतर त्यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.पद्मजा कुलकर्णी आणि त्यांचे पती नंदकुमार कुलकर्णी पुण्यातील त्यांच्या नातेवाईकांसोबत श्रीनगर येथे पर्यटनासाठी गेले होते. पुण्यातील ट्रॅव्हल्समधून एकूण ३२ जण यात सहभागी होते. रत्नागिरीतून कुलकर्णी दाम्पत्य आणि पद्मजा कुलकर्णी यांचे पुण्यातील तीन बंधू आणि त्यांच्या पत्नी असे साळसकर परिवारातील सहा मिळून एकूण आठ जण १६ एप्रिल रोजी श्रीनगरला पोहोचले. येथील विविध स्थळे पाहून ही सर्व मंडळी रविवार, २० रोजी पहलगामला गेली होती. मात्र, यावेळी काहीच गडबड दिसत नव्हती. सर्वत्र शांत होते. याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कमांडोही होते. त्यामुळे भीतीचा लवलेशही नव्हता. पहलगाम येथील बैसरन पाॅईंट पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक जात असतात. सोमवारी गुलमर्ग पाहून झाल्यावर मंगळवारी दुपारी पुन्हा परतीच्या प्रवासासाठी श्रीनगर येथे विमानतळावर दाखल झालो. जाताना दिल्ली मार्गे विमानाने प्रवास होता तर येताना चंडीगड मार्गे यावे लागणार होते. दुपारी अगदी जेवतानाही पहलगाम हल्ल्याविषयी काहीच माहीत नव्हते. मात्र, श्रीनगर विमानतळावर आल्यावर पहलगाम हल्ल्याची बातमी कळली, त्यात २८ जण गेल्याचे कळले आणि मग आपण घरी सुखरूप पाेहोचू ना? या भीतीने अस्वस्थ केले, असे पद्मजा कुलकर्णी सांगतात.त्यानंतर चंडीगड येथे उतरेपर्यंत त्यांना आपल्या घरच्यांशी कुठल्याही तऱ्हेचा संपर्क होत नव्हता. मात्र, चंडीगड विमानतळावर पोहोचल्यानंतर घरच्यांचे फोन खणाणू लागले. नातेवाईकांनी त्यांचे आवाज ऐकल्यावर आणि सर्व सुखरूप आहेत, हे कळल्यावर हायसे वाटले. अखेर चंडीगडहून पुण्यात रात्री १ वाजता ही सर्व मंडळी पोहोचली आणि घरी सुखरूप आणल्याबद्दल सर्वांनीच ईश्वराचे आभार मानले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन