शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:40 IST

तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, नुकतेच याविषयी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना एका पत्राद्वारे या कुटुंंबियांनी कळविले आहे.

ठळक मुद्देकंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराणपाणी व विजेचा तुटवडा, कुटुंबियांपुढे प्रश्न

संदीप बांद्रे चिपळूण : तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, नुकतेच याविषयी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना एका पत्राद्वारे या कुटुंंबियांनी कळविले आहे.अवघ्या चिपळूणवासियांचे हृदय पिळवटून टाकणारी घटना तिवरे येथे जुलै महिन्यात घडली. या घटनेत एकूण २२ जणांचा बळी गेला. या धक्क्यातून हळूहळू तिवरेवासीय सावरत असताना त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा कायम आहे. एकूण ४५ कुटुंबियांचे पुनर्वसन अलोरे येथील शासकीय जागेत करण्याचा प्रस्ताव आहे.

याबाबतची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. तूर्तास येथील १० कुटुंबियांचे पुनर्वसन तिवरे येथेच कंटेनरमध्ये केले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक व शासनाकडून प्रत्येकी पाच असे एकूण १० कंटेनर उपलब्ध करून दिल्यानंतर प्रत्येक कंटेनरमध्ये एका कुटुंबाची व्यवस्था करण्यात आली आहे.उघड्या माळरानावर तापताहेत कंटेनरसुरुवातीला धरणाच्या वरील बाजूस असलेल्या जागेत कंटेनर ठेवण्यात येणार होते; मात्र तेथे डोंगराला भेगा गेल्याने गावातीलच उघड्या माळरानावर हे दहाही कंटेनर ठेवण्यात आले आहेत. आॅक्टोबर हिटमुळे तापमान वाढले असल्याने त्याची झळ कंटेनरमधील कुटुंबियांना बसू लागली आहे.

दिवसभरात कंटेनर तापत असल्याने आतमध्ये अंगाची लाहीलाही होते. पंखा लावूनही काहीच उपयोग होत नाही. त्यातच कंटेनरबाहेर पडावे तर उन्हाचे चटके आणि रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होत आहे. स्वच्छतागृहाचे सांडपाणी व मलमूत्रही उघड्यावर सोडलेले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.एकाच मीटरवर सर्वांना वीज पुरवठायेथील दहाही कंटेनरना एकाच मीटरवरुन वीजपुरवठा करण्यात आला आहे. घरगुती जोडणी पद्धतीने हा वीजपुरवठा केला असल्याने अनेकदा हा पुरवठा अपुरा ठरतो. त्यातच परिसरात पथदीप नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत.झरे आटण्याच्या मार्गावरधरण फुटीमुळे तिवरेतील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या गावातील पाणीयोजना पूर्णत: ठप्प झाली असून, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांनी पुरवलेल्या पाण्याच्या टाक्याही आता पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत पुनर्वसित कुटुंबियांसाठी झऱ्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत शिल्लक आहे; मात्र तोही आता हळूहळू आटू लागल्याने येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.दोन महिन्यात कोणी फिरकलेच नाहीतगणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी म्हणजेच ३० आॅगस्ट रोजी घाईघाईत १० कुटुंबियांची कंटेनरमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली. तेव्हापासून बळीराम चव्हाण, तुकाराम कनावजे, तानाजी चव्हाण, नारायण गायकवाड, कृष्णा कातुरडे, सखाराम तांबट, भगवान धाडवे, राधिका चव्हाण, लक्ष्मी चव्हाण व माधव धाडवे यांचे कुटुंबीय या कंटेनरमध्ये राहात आहेत. त्यानंतर आजतागायत कोणताही प्रशासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी येथे फिरकलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांतर्फे तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे; त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 

कंटेनरमधील पर्यायी व्यवस्था ही तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात आली होती; मात्र आता दोन महिने होऊनही येथेच राहावे लागत आहे. कंटेनरमधील रहिवास गरम्यामुळे नकोसा झाला असून, शासनाने याची वेळीच दखल घ्यावी.- नारायण गायकवाड, ज्येष्ठ ग्रामस्थ, तिवरे

घाईघाईत बसवण्यात आलेल्या कंटेनरची रचना चुकीच्या पद्धतीने झाली असल्याने वाढत्या उष्म्याचा त्रास होत आहे. शिवाय कंटेनरची लेव्हल योग्य पद्धतीची नसल्याने आतमध्ये असलेल्या स्वच्छतागृहातील पाणी तेथेच साचून राहाते.- बळीराम चव्हाण, तिवरे

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी