शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

कंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:40 IST

तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, नुकतेच याविषयी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना एका पत्राद्वारे या कुटुंंबियांनी कळविले आहे.

ठळक मुद्देकंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराणपाणी व विजेचा तुटवडा, कुटुंबियांपुढे प्रश्न

संदीप बांद्रे चिपळूण : तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, नुकतेच याविषयी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना एका पत्राद्वारे या कुटुंंबियांनी कळविले आहे.अवघ्या चिपळूणवासियांचे हृदय पिळवटून टाकणारी घटना तिवरे येथे जुलै महिन्यात घडली. या घटनेत एकूण २२ जणांचा बळी गेला. या धक्क्यातून हळूहळू तिवरेवासीय सावरत असताना त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा कायम आहे. एकूण ४५ कुटुंबियांचे पुनर्वसन अलोरे येथील शासकीय जागेत करण्याचा प्रस्ताव आहे.

याबाबतची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. तूर्तास येथील १० कुटुंबियांचे पुनर्वसन तिवरे येथेच कंटेनरमध्ये केले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक व शासनाकडून प्रत्येकी पाच असे एकूण १० कंटेनर उपलब्ध करून दिल्यानंतर प्रत्येक कंटेनरमध्ये एका कुटुंबाची व्यवस्था करण्यात आली आहे.उघड्या माळरानावर तापताहेत कंटेनरसुरुवातीला धरणाच्या वरील बाजूस असलेल्या जागेत कंटेनर ठेवण्यात येणार होते; मात्र तेथे डोंगराला भेगा गेल्याने गावातीलच उघड्या माळरानावर हे दहाही कंटेनर ठेवण्यात आले आहेत. आॅक्टोबर हिटमुळे तापमान वाढले असल्याने त्याची झळ कंटेनरमधील कुटुंबियांना बसू लागली आहे.

दिवसभरात कंटेनर तापत असल्याने आतमध्ये अंगाची लाहीलाही होते. पंखा लावूनही काहीच उपयोग होत नाही. त्यातच कंटेनरबाहेर पडावे तर उन्हाचे चटके आणि रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होत आहे. स्वच्छतागृहाचे सांडपाणी व मलमूत्रही उघड्यावर सोडलेले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.एकाच मीटरवर सर्वांना वीज पुरवठायेथील दहाही कंटेनरना एकाच मीटरवरुन वीजपुरवठा करण्यात आला आहे. घरगुती जोडणी पद्धतीने हा वीजपुरवठा केला असल्याने अनेकदा हा पुरवठा अपुरा ठरतो. त्यातच परिसरात पथदीप नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत.झरे आटण्याच्या मार्गावरधरण फुटीमुळे तिवरेतील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या गावातील पाणीयोजना पूर्णत: ठप्प झाली असून, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांनी पुरवलेल्या पाण्याच्या टाक्याही आता पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत पुनर्वसित कुटुंबियांसाठी झऱ्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत शिल्लक आहे; मात्र तोही आता हळूहळू आटू लागल्याने येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.दोन महिन्यात कोणी फिरकलेच नाहीतगणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी म्हणजेच ३० आॅगस्ट रोजी घाईघाईत १० कुटुंबियांची कंटेनरमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली. तेव्हापासून बळीराम चव्हाण, तुकाराम कनावजे, तानाजी चव्हाण, नारायण गायकवाड, कृष्णा कातुरडे, सखाराम तांबट, भगवान धाडवे, राधिका चव्हाण, लक्ष्मी चव्हाण व माधव धाडवे यांचे कुटुंबीय या कंटेनरमध्ये राहात आहेत. त्यानंतर आजतागायत कोणताही प्रशासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी येथे फिरकलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांतर्फे तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे; त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 

कंटेनरमधील पर्यायी व्यवस्था ही तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात आली होती; मात्र आता दोन महिने होऊनही येथेच राहावे लागत आहे. कंटेनरमधील रहिवास गरम्यामुळे नकोसा झाला असून, शासनाने याची वेळीच दखल घ्यावी.- नारायण गायकवाड, ज्येष्ठ ग्रामस्थ, तिवरे

घाईघाईत बसवण्यात आलेल्या कंटेनरची रचना चुकीच्या पद्धतीने झाली असल्याने वाढत्या उष्म्याचा त्रास होत आहे. शिवाय कंटेनरची लेव्हल योग्य पद्धतीची नसल्याने आतमध्ये असलेल्या स्वच्छतागृहातील पाणी तेथेच साचून राहाते.- बळीराम चव्हाण, तिवरे

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी