शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदलामुळे हापूसवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव, फवारणी वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 12:25 IST

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी ...

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. हवामानातील बदलाचा अंदाज घेत दर १० ते १५ दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. कीटकनाशके महागडी असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.देशातीलच नव्हे तर परदेशी नागरिकांना भुरळ घातलेल्या आंबा पिकावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. फयान वादळानंतर जिल्ह्यातील आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसत असून, बागायतदारांची आणि पर्यायाने जिल्ह्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवली. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच आंब्याला मोहोर सुरू झाला. अवकाळी पावसामुळे मोहोरावर परिणाम झाला. काही ठिकाणी मोहोर खराब झाला. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मोहोर मात्र टिकून आहे.

पहिल्या मोहोराचा आंबा पाच ते दहा टक्केच शिल्लक राहिला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सर्वत्र मोहोर चांगला आला आहे. काही ठिकाणी फळधारणा अद्याप व्हायची आहे, तर काही ठिकाणी कणी, तर काही ठिकाणी सुपारी एवढा आंबा झाडावर आहे. हा आंबा मार्चमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यांपूर्वी तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, बागायतदारांनी योग्य उपाययोजना केल्याने तुडतुडा आटोक्यात आणण्यात यश आले होते; परंतु तुडतुड्याचा प्रादुर्भाव वारंवार होत असल्याने शेतकऱ्यांना आटोक्यात आणणे अवघड बनले आहे. वास्तविक प्रत्येक फवारणीत २० ते २५ दिवसांचा फरक असणे आवश्यक आहे. मात्र, कीटकनाशकांचा प्रभाव पडत नसल्याने १० ते १५ दिवसाने फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे.पावसाळी ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य कीडरोगाचा प्रभाव वाढला होता, त्यासाठी उपाययोजना करून कीडरोगावर नियंत्रण आणले आहे; परंतु ढगाळ हवामान, थंडी यामुळे आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. थ्रीप्स आटोक्यात आणण्यासाठी बागायतदारांना महागड्या कीटकनाशकांचा वापर करावा लागत आहे. बाजारात महागडी कीटकनाशके असली तरी थ्रीप्स वेळीच नियंत्रणात येणे गरजेचे आहे. आंब्यावरील कीडरोग, तुडतुडा, थ्रीप्स नियंत्रणासाठी वापराव्या लागणाऱ्या कीटकनाशकांच्या किमती अधिक आहेत. त्यामुळे बागायतदारांसाठी आंबा पीक खर्चिक बनले आहे.

आंबा लागवड क्षेत्र - ६६ हजार ४३३ हेक्टरउत्पादन - एक ते सव्वा लाख टनदरवर्षीची उलाढाल - ७०० ते ८०० कोटी

यावर्षी फुलोरा चांगला असल्याने सध्या तरी समाधानकारक चित्र आहे. आंबा पिकासाठी नीचांक तापमान व अवकाळी पाऊस मात्र धोकादायक ठरणार आहे. सध्या चित्र समाधानकारक असले तरी प्रत्यक्ष फेब्रुवारीत आंब्याचे प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होणार आहे. हवामानातील बदलाचा अंदाज घेत तुडतुडा, कीडरोग, थ्रीप्सपासून रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागत आहेत. - आनंद देसाई, बागायतदार.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान