शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

हवामानातील बदलामुळे हापूसवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव, फवारणी वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 12:25 IST

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी ...

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. हवामानातील बदलाचा अंदाज घेत दर १० ते १५ दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. कीटकनाशके महागडी असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.देशातीलच नव्हे तर परदेशी नागरिकांना भुरळ घातलेल्या आंबा पिकावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. फयान वादळानंतर जिल्ह्यातील आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसत असून, बागायतदारांची आणि पर्यायाने जिल्ह्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवली. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच आंब्याला मोहोर सुरू झाला. अवकाळी पावसामुळे मोहोरावर परिणाम झाला. काही ठिकाणी मोहोर खराब झाला. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मोहोर मात्र टिकून आहे.

पहिल्या मोहोराचा आंबा पाच ते दहा टक्केच शिल्लक राहिला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सर्वत्र मोहोर चांगला आला आहे. काही ठिकाणी फळधारणा अद्याप व्हायची आहे, तर काही ठिकाणी कणी, तर काही ठिकाणी सुपारी एवढा आंबा झाडावर आहे. हा आंबा मार्चमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यांपूर्वी तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, बागायतदारांनी योग्य उपाययोजना केल्याने तुडतुडा आटोक्यात आणण्यात यश आले होते; परंतु तुडतुड्याचा प्रादुर्भाव वारंवार होत असल्याने शेतकऱ्यांना आटोक्यात आणणे अवघड बनले आहे. वास्तविक प्रत्येक फवारणीत २० ते २५ दिवसांचा फरक असणे आवश्यक आहे. मात्र, कीटकनाशकांचा प्रभाव पडत नसल्याने १० ते १५ दिवसाने फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे.पावसाळी ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य कीडरोगाचा प्रभाव वाढला होता, त्यासाठी उपाययोजना करून कीडरोगावर नियंत्रण आणले आहे; परंतु ढगाळ हवामान, थंडी यामुळे आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. थ्रीप्स आटोक्यात आणण्यासाठी बागायतदारांना महागड्या कीटकनाशकांचा वापर करावा लागत आहे. बाजारात महागडी कीटकनाशके असली तरी थ्रीप्स वेळीच नियंत्रणात येणे गरजेचे आहे. आंब्यावरील कीडरोग, तुडतुडा, थ्रीप्स नियंत्रणासाठी वापराव्या लागणाऱ्या कीटकनाशकांच्या किमती अधिक आहेत. त्यामुळे बागायतदारांसाठी आंबा पीक खर्चिक बनले आहे.

आंबा लागवड क्षेत्र - ६६ हजार ४३३ हेक्टरउत्पादन - एक ते सव्वा लाख टनदरवर्षीची उलाढाल - ७०० ते ८०० कोटी

यावर्षी फुलोरा चांगला असल्याने सध्या तरी समाधानकारक चित्र आहे. आंबा पिकासाठी नीचांक तापमान व अवकाळी पाऊस मात्र धोकादायक ठरणार आहे. सध्या चित्र समाधानकारक असले तरी प्रत्यक्ष फेब्रुवारीत आंब्याचे प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होणार आहे. हवामानातील बदलाचा अंदाज घेत तुडतुडा, कीडरोग, थ्रीप्सपासून रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागत आहेत. - आनंद देसाई, बागायतदार.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान