शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यात वीज पडून तिघे तर विजेच्या धक्क्याने चारजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 17:49 IST

Rain Ratnagiri : मान्सूनपूर्व पाऊस अधूनमधून पडू लागला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६.६९ मिलीमीटर तर एकूण ६०.२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, सोमवारी जिल्ह्यात वीज पडून तिघे जखमी झाले आहेत तर विजेच्या धक्क्याने चार जणांना दुखापत झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात वीज पडून तिघे तर विजेच्या धक्क्याने चारजण जखमी२४ तासात सरासरी ६.६९ मिलीमीटर तर एकूण ६०.२० मिलीमीटर पावसाची नोंद

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पाऊस अधूनमधून पडू लागला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६.६९ मिलीमीटर तर एकूण ६०.२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, सोमवारी जिल्ह्यात वीज पडून तिघे जखमी झाले आहेत तर विजेच्या धक्क्याने चार जणांना दुखापत झाली आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाकडून जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे सोमवारी झालेले नुकसान असे, दापोली तालुक्यात नानटे येथील ३ व्यक्तींना विजेचा झटका लागून किरकोळ जखमी झाले आहेत.

चिपळूण तालुक्यात पेंढांबे येथील मनिषा कदम यांच्या घरावर वीज पडून साक्षी कदम (वय १५), सावरी सुभाष गमरे (वय १५ ), विजय गमरे (वय ३०) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना जवळीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे देवरुख येथील दीपक आत्माराम शिंदे विजेचा झटका लागून किरकोळ जखमी झाले आहेत. डिंगणी येथे वीज पडल्याने पिठाच्या गिरणीची मोटार व इतर साहित्य जळून खाक झाले असून अंशत: १० हजाराचे नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी कळविले आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी