शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

स्वच्छता व्यवस्थापनात रत्नागिरीसह जिल्ह्यातील तीन बसस्थानके चमकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:04 IST

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान; कुडाळला तृतीय क्रमांक

रत्नागिरी : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने मुंबई प्रादेशिक स्तरावर अग्रस्थान मिळवले आहे. विभागातील बसस्थानकांनी स्वच्छता आणि व्यवस्थापनातील आपली क्षमता सिद्ध केली आहे. रत्नागिरीचे मध्यवर्ती बसस्थानक (अ वर्ग), पाली (ब वर्ग), आणि माखजन (क वर्ग) या बसस्थानकांनी आपापल्या गटात चमकदार कामगिरी केली आहे.जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अभियानाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्रैमासिक सर्वेक्षण अहवालात बसस्थानकाची स्वच्छता, प्रशासन, व्यवस्थापन आणि हरित उपक्रम अशा विविध निकषांवर आधारित गुणांकन केले गेले. सर्वेक्षणानुसार ‘अ’ वर्गवारीत रत्नागिरी (नवीन) मध्यवर्ती बसस्थानकाने ८९ गुण मिळवून सर्वाधिक आघाडी घेतली.यामध्ये बसस्थानक व प्रसाधनगृहासाठी ३० पैकी २९ गुण, बसस्थानक व्यवस्थापनासाठी ५० पैकी ४४ गुण आणि हरित बसस्थानकासाठी ३० पैकी १६ गुण मिळाले. या कामगिरीमुळे रत्नागिरीने प्रथम क्रमांक मिळवला, तर बोईसरने ८३ गुण मिळवून द्वितीय आणि कुडाळने ७४ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.  ‘ब’ वर्गवारीत पाली बसस्थानकाने ८४ गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. मुंबईतील दादर बसस्थानकाने ८५ गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर ‘क’ वर्गवारीत माखजन बसस्थानकाने ७४ गुण मिळवले. या वर्गवारीतील परळ बसस्थानकाने (मुंबई) ८९ गुण मिळवून प्रथम स्थान मिळवले, नालासोपारा (पालघर) बसस्थानकाने ७६ गुण मिळवून द्वितीय आणि माखजन (संगमेश्वर) बसस्थानकाने ७४ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.  हा निकाल पहिल्या त्रैमासिक सर्वेक्षणानंतर जाहीर करण्यात आला. एकूण चारवेळा सर्वेक्षण होणार असून, नंतर जे बसस्थानक स्वच्छ आणि सुंदर या निकषांमध्ये बसेल, त्याला बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.