शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

आंब्यावर थ्रीप्सचे संकट, उत्पादन धोक्यात; संशोधन होत नसल्याने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 18:16 IST

बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या समस्या, कीडरोग याबाबत संशोधन होत नसल्याने नाराजी

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत असल्याने आंबा पीक उत्पादन खालावले आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा काहीच भागात आहे. अन्य भागात शेवटच्या टप्प्यातील आंबा आहे. मात्र, त्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव अधिक आहे. प्रतिबंधात्मक कीटकनाशक फवारणी करूनही थ्रीप्स आटोक्यात येत नसल्याने आंबा उत्पादन धोक्यात आले आहे.यावर्षी पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. त्यामुळे ८० टक्के झाडांना पालवी होती. दहा टक्के झाडांना मोहर होता तर दहा टक्के झाडे मोहोराशिवाय होती. दरवर्षीप्रमाणे थंडीचे प्रमाण कमी राहिले. अवकाळी पाऊस, तीव्र उष्मा यामुळे यावर्षी दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात मोहर झालाच नाही. पहिल्या टप्प्यातील मोहराचा आंबा सध्या बाजारात आहे. मात्र, हा आंबा जिल्ह्यातील काही भागांतीलच आहे, अन्यत्र झाडे रिकामी असलेली निदर्शनास येत आहेत. जानेवारी / फेब्रुवारीतील थंडीमुळे काही ठिकाणी मोहर प्रक्रिया झाली. मात्र, ढगाळ हवामान, तीव्र उष्मा एकूणच विचित्र हवामानामुळे मोहराला फळधारणा झाली; परंतु गळ अधिक झाली. त्यातच तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव अधिक राहिला. यासाठी बागायतदार वारंवार कीटकनाशक फवारणी करत असून, अद्याप थ्रीप्सचे संकट आटोक्यात येत नसल्याने पिकाचे नुकसान होत आहे.आंबा उत्पादन निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडले आहे. काही मोजक्याच बागायतदारांकडे आंबा असला तरी बहुतांश बागायदार मात्र, आंबा नसल्याने आर्थिक गणिते सुटणार कशी, या धास्तीत सापडली आहेत. थ्रीप्समुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा धोक्यात आला असून बागायतदार धास्तावले आहेत. याबाबत कृषी विभाग व शासकीय यंत्रणांकडून पंचनामे करून आंबा नुकसान जाहीर करण्याची मागणी जिल्ह्यातील बागायतदार व शेतकरी संघटनांद्वारे करण्यात आली आहे.

बागायतदारांची तक्रारअधिकृत विक्रेत्यांकडील महागडी कीटकनाशके फवारणीसाठी वापरली जात आहेत; परंतु थ्रीप्स आटोक्यात येत नसल्याने कीटकनाशके भेसळ आहेत, दर्जेदार नसल्याने फुलकिडे नियंत्रणासाठी अपयशी ठरत आहेत, अशी तक्रार बागायदार करीत आहेत.

संशाेधन नाहीचजिल्ह्यात कोकण कृषी विद्यापीठ आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या समस्या, कीडरोग याबाबत संशोधन होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान