शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आंब्यावर थ्रीप्सचे संकट, उत्पादन धोक्यात; संशोधन होत नसल्याने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 18:16 IST

बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या समस्या, कीडरोग याबाबत संशोधन होत नसल्याने नाराजी

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत असल्याने आंबा पीक उत्पादन खालावले आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा काहीच भागात आहे. अन्य भागात शेवटच्या टप्प्यातील आंबा आहे. मात्र, त्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव अधिक आहे. प्रतिबंधात्मक कीटकनाशक फवारणी करूनही थ्रीप्स आटोक्यात येत नसल्याने आंबा उत्पादन धोक्यात आले आहे.यावर्षी पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. त्यामुळे ८० टक्के झाडांना पालवी होती. दहा टक्के झाडांना मोहर होता तर दहा टक्के झाडे मोहोराशिवाय होती. दरवर्षीप्रमाणे थंडीचे प्रमाण कमी राहिले. अवकाळी पाऊस, तीव्र उष्मा यामुळे यावर्षी दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात मोहर झालाच नाही. पहिल्या टप्प्यातील मोहराचा आंबा सध्या बाजारात आहे. मात्र, हा आंबा जिल्ह्यातील काही भागांतीलच आहे, अन्यत्र झाडे रिकामी असलेली निदर्शनास येत आहेत. जानेवारी / फेब्रुवारीतील थंडीमुळे काही ठिकाणी मोहर प्रक्रिया झाली. मात्र, ढगाळ हवामान, तीव्र उष्मा एकूणच विचित्र हवामानामुळे मोहराला फळधारणा झाली; परंतु गळ अधिक झाली. त्यातच तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव अधिक राहिला. यासाठी बागायतदार वारंवार कीटकनाशक फवारणी करत असून, अद्याप थ्रीप्सचे संकट आटोक्यात येत नसल्याने पिकाचे नुकसान होत आहे.आंबा उत्पादन निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडले आहे. काही मोजक्याच बागायतदारांकडे आंबा असला तरी बहुतांश बागायदार मात्र, आंबा नसल्याने आर्थिक गणिते सुटणार कशी, या धास्तीत सापडली आहेत. थ्रीप्समुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा धोक्यात आला असून बागायतदार धास्तावले आहेत. याबाबत कृषी विभाग व शासकीय यंत्रणांकडून पंचनामे करून आंबा नुकसान जाहीर करण्याची मागणी जिल्ह्यातील बागायतदार व शेतकरी संघटनांद्वारे करण्यात आली आहे.

बागायतदारांची तक्रारअधिकृत विक्रेत्यांकडील महागडी कीटकनाशके फवारणीसाठी वापरली जात आहेत; परंतु थ्रीप्स आटोक्यात येत नसल्याने कीटकनाशके भेसळ आहेत, दर्जेदार नसल्याने फुलकिडे नियंत्रणासाठी अपयशी ठरत आहेत, अशी तक्रार बागायदार करीत आहेत.

संशाेधन नाहीचजिल्ह्यात कोकण कृषी विद्यापीठ आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या समस्या, कीडरोग याबाबत संशोधन होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान