शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

आंब्यावर थ्रीप्सचे संकट, उत्पादन धोक्यात; संशोधन होत नसल्याने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 18:16 IST

बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या समस्या, कीडरोग याबाबत संशोधन होत नसल्याने नाराजी

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत असल्याने आंबा पीक उत्पादन खालावले आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा काहीच भागात आहे. अन्य भागात शेवटच्या टप्प्यातील आंबा आहे. मात्र, त्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव अधिक आहे. प्रतिबंधात्मक कीटकनाशक फवारणी करूनही थ्रीप्स आटोक्यात येत नसल्याने आंबा उत्पादन धोक्यात आले आहे.यावर्षी पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. त्यामुळे ८० टक्के झाडांना पालवी होती. दहा टक्के झाडांना मोहर होता तर दहा टक्के झाडे मोहोराशिवाय होती. दरवर्षीप्रमाणे थंडीचे प्रमाण कमी राहिले. अवकाळी पाऊस, तीव्र उष्मा यामुळे यावर्षी दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात मोहर झालाच नाही. पहिल्या टप्प्यातील मोहराचा आंबा सध्या बाजारात आहे. मात्र, हा आंबा जिल्ह्यातील काही भागांतीलच आहे, अन्यत्र झाडे रिकामी असलेली निदर्शनास येत आहेत. जानेवारी / फेब्रुवारीतील थंडीमुळे काही ठिकाणी मोहर प्रक्रिया झाली. मात्र, ढगाळ हवामान, तीव्र उष्मा एकूणच विचित्र हवामानामुळे मोहराला फळधारणा झाली; परंतु गळ अधिक झाली. त्यातच तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव अधिक राहिला. यासाठी बागायतदार वारंवार कीटकनाशक फवारणी करत असून, अद्याप थ्रीप्सचे संकट आटोक्यात येत नसल्याने पिकाचे नुकसान होत आहे.आंबा उत्पादन निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडले आहे. काही मोजक्याच बागायतदारांकडे आंबा असला तरी बहुतांश बागायदार मात्र, आंबा नसल्याने आर्थिक गणिते सुटणार कशी, या धास्तीत सापडली आहेत. थ्रीप्समुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा धोक्यात आला असून बागायतदार धास्तावले आहेत. याबाबत कृषी विभाग व शासकीय यंत्रणांकडून पंचनामे करून आंबा नुकसान जाहीर करण्याची मागणी जिल्ह्यातील बागायतदार व शेतकरी संघटनांद्वारे करण्यात आली आहे.

बागायतदारांची तक्रारअधिकृत विक्रेत्यांकडील महागडी कीटकनाशके फवारणीसाठी वापरली जात आहेत; परंतु थ्रीप्स आटोक्यात येत नसल्याने कीटकनाशके भेसळ आहेत, दर्जेदार नसल्याने फुलकिडे नियंत्रणासाठी अपयशी ठरत आहेत, अशी तक्रार बागायदार करीत आहेत.

संशाेधन नाहीचजिल्ह्यात कोकण कृषी विद्यापीठ आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या समस्या, कीडरोग याबाबत संशोधन होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान