शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

ज्यांनी सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिले; ठाणेतील प्रकारानंतर मंत्री उदय सामंत यांचा उद्धव सेनेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 14:13 IST

तिकीट देण्याचा अधिकार तीन नेत्यांना

रत्नागिरी : काेणत्याही नेत्यावर अशा पद्धतीने हल्ले करणे हे राजकारणात याेग्य नाही. राज ठाकरे यांच्या मराठवाडा दाैऱ्यात त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या टाकण्यात आल्या त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. ज्यांनी सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिले. आधी ज्यांनी केले त्याला धडा शिकविण्यासाठी दुसऱ्यांनी केले. सुरुवातीला ते झाले नसते तर त्याची प्रतिक्रिया उमटलीच नसती, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बाेलताना दिली.ठाणे येथील घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले असता ते बाेलत हाेते. ते म्हणाले की, राजकारणात आपण एकमेकांवर बाेलताे, बदनामी करताे ते आता क्रमप्राप्त झाले आहे. मात्र, अशा पद्धतीने हल्ला करणे याेग्य नाही. ही परिस्थिती सुरुवातीला काेणी निर्माण केली, याचाही महाराष्ट्राच्या जनतेने अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.त्यांनी सांगितले की, आपण आपल्या नेत्याच्या किती जवळ आहाेत ते दाखविण्याचा पहिल्यांदा मराठवाड्यात प्रयत्न झाला. आम्ही दाेन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. तेव्हापासून हीनदर्जाचे बाेलले जाते, घाणेरडे बाेलले जाते, वाटेल त्या पद्धतीने टीका केली जाते, बदनामी केली जाते, हे सर्व आम्ही सहन करत आहाेत; पण हे सहन करताना लाेकसभेला दाखवून दिले की, आम्ही सरस आहाेत.राजकारणात आम्ही टीकाटिपणी समजू शकताे; पण स्वत:च सुरुवात करायची आणि मग दुसऱ्याला दाेष द्यायचा ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. शाब्दिक हल्ले समजू शकताे तेही करताना त्यात महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. विकासाचे राजकारण झाले पाहिजे. जातीपातीचे राजकारण करायचे, जातीच्या, धर्माच्या भिंती निर्माण करायच्या हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

त्याच्याशी काडीमात्र संबंध नाहीमनसे किंवा मनसैनिक एवढे दुबळे नाहीत की, त्यांना शिवसेनेची साथ घेऊन त्यांनी प्रतिक्रिया द्यावी. कालची उत्स्फूर्त प्रतिक्रिया हाेती, त्याच्याशी शिवसेनेचा काडीमात्रही संबंध नाही; पण एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा काहींनी विडाच उचललेला आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

तिकीट देण्याचा अधिकार तीन नेत्यांनाराज्यात २० तारखेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दाैरा सुरू हाेत आहे. त्या दाैऱ्याच्या संदर्भात काेकणातील समन्वय समितीची बैठक आहे. यामध्ये काेणत्याही तिकिटावर चर्चा हाेणार नाही. तिकीट देण्याचा अधिकार हा तीन नेत्यांना आहे. महायुती भक्कम असावी, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे तिघांचेही स्वागत करावे त्याचे नियाेजन करण्यासाठी ही बैठक असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे