शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
8
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
9
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
10
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
11
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
12
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
13
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
14
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
15
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
20
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?

ज्यांनी सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिले; ठाणेतील प्रकारानंतर मंत्री उदय सामंत यांचा उद्धव सेनेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 14:13 IST

तिकीट देण्याचा अधिकार तीन नेत्यांना

रत्नागिरी : काेणत्याही नेत्यावर अशा पद्धतीने हल्ले करणे हे राजकारणात याेग्य नाही. राज ठाकरे यांच्या मराठवाडा दाैऱ्यात त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या टाकण्यात आल्या त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. ज्यांनी सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिले. आधी ज्यांनी केले त्याला धडा शिकविण्यासाठी दुसऱ्यांनी केले. सुरुवातीला ते झाले नसते तर त्याची प्रतिक्रिया उमटलीच नसती, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बाेलताना दिली.ठाणे येथील घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले असता ते बाेलत हाेते. ते म्हणाले की, राजकारणात आपण एकमेकांवर बाेलताे, बदनामी करताे ते आता क्रमप्राप्त झाले आहे. मात्र, अशा पद्धतीने हल्ला करणे याेग्य नाही. ही परिस्थिती सुरुवातीला काेणी निर्माण केली, याचाही महाराष्ट्राच्या जनतेने अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.त्यांनी सांगितले की, आपण आपल्या नेत्याच्या किती जवळ आहाेत ते दाखविण्याचा पहिल्यांदा मराठवाड्यात प्रयत्न झाला. आम्ही दाेन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. तेव्हापासून हीनदर्जाचे बाेलले जाते, घाणेरडे बाेलले जाते, वाटेल त्या पद्धतीने टीका केली जाते, बदनामी केली जाते, हे सर्व आम्ही सहन करत आहाेत; पण हे सहन करताना लाेकसभेला दाखवून दिले की, आम्ही सरस आहाेत.राजकारणात आम्ही टीकाटिपणी समजू शकताे; पण स्वत:च सुरुवात करायची आणि मग दुसऱ्याला दाेष द्यायचा ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. शाब्दिक हल्ले समजू शकताे तेही करताना त्यात महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. विकासाचे राजकारण झाले पाहिजे. जातीपातीचे राजकारण करायचे, जातीच्या, धर्माच्या भिंती निर्माण करायच्या हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

त्याच्याशी काडीमात्र संबंध नाहीमनसे किंवा मनसैनिक एवढे दुबळे नाहीत की, त्यांना शिवसेनेची साथ घेऊन त्यांनी प्रतिक्रिया द्यावी. कालची उत्स्फूर्त प्रतिक्रिया हाेती, त्याच्याशी शिवसेनेचा काडीमात्रही संबंध नाही; पण एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा काहींनी विडाच उचललेला आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

तिकीट देण्याचा अधिकार तीन नेत्यांनाराज्यात २० तारखेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दाैरा सुरू हाेत आहे. त्या दाैऱ्याच्या संदर्भात काेकणातील समन्वय समितीची बैठक आहे. यामध्ये काेणत्याही तिकिटावर चर्चा हाेणार नाही. तिकीट देण्याचा अधिकार हा तीन नेत्यांना आहे. महायुती भक्कम असावी, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे तिघांचेही स्वागत करावे त्याचे नियाेजन करण्यासाठी ही बैठक असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे