शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांनी सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिले; ठाणेतील प्रकारानंतर मंत्री उदय सामंत यांचा उद्धव सेनेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 14:13 IST

तिकीट देण्याचा अधिकार तीन नेत्यांना

रत्नागिरी : काेणत्याही नेत्यावर अशा पद्धतीने हल्ले करणे हे राजकारणात याेग्य नाही. राज ठाकरे यांच्या मराठवाडा दाैऱ्यात त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या टाकण्यात आल्या त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. ज्यांनी सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिले. आधी ज्यांनी केले त्याला धडा शिकविण्यासाठी दुसऱ्यांनी केले. सुरुवातीला ते झाले नसते तर त्याची प्रतिक्रिया उमटलीच नसती, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बाेलताना दिली.ठाणे येथील घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले असता ते बाेलत हाेते. ते म्हणाले की, राजकारणात आपण एकमेकांवर बाेलताे, बदनामी करताे ते आता क्रमप्राप्त झाले आहे. मात्र, अशा पद्धतीने हल्ला करणे याेग्य नाही. ही परिस्थिती सुरुवातीला काेणी निर्माण केली, याचाही महाराष्ट्राच्या जनतेने अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.त्यांनी सांगितले की, आपण आपल्या नेत्याच्या किती जवळ आहाेत ते दाखविण्याचा पहिल्यांदा मराठवाड्यात प्रयत्न झाला. आम्ही दाेन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. तेव्हापासून हीनदर्जाचे बाेलले जाते, घाणेरडे बाेलले जाते, वाटेल त्या पद्धतीने टीका केली जाते, बदनामी केली जाते, हे सर्व आम्ही सहन करत आहाेत; पण हे सहन करताना लाेकसभेला दाखवून दिले की, आम्ही सरस आहाेत.राजकारणात आम्ही टीकाटिपणी समजू शकताे; पण स्वत:च सुरुवात करायची आणि मग दुसऱ्याला दाेष द्यायचा ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. शाब्दिक हल्ले समजू शकताे तेही करताना त्यात महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. विकासाचे राजकारण झाले पाहिजे. जातीपातीचे राजकारण करायचे, जातीच्या, धर्माच्या भिंती निर्माण करायच्या हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

त्याच्याशी काडीमात्र संबंध नाहीमनसे किंवा मनसैनिक एवढे दुबळे नाहीत की, त्यांना शिवसेनेची साथ घेऊन त्यांनी प्रतिक्रिया द्यावी. कालची उत्स्फूर्त प्रतिक्रिया हाेती, त्याच्याशी शिवसेनेचा काडीमात्रही संबंध नाही; पण एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा काहींनी विडाच उचललेला आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

तिकीट देण्याचा अधिकार तीन नेत्यांनाराज्यात २० तारखेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दाैरा सुरू हाेत आहे. त्या दाैऱ्याच्या संदर्भात काेकणातील समन्वय समितीची बैठक आहे. यामध्ये काेणत्याही तिकिटावर चर्चा हाेणार नाही. तिकीट देण्याचा अधिकार हा तीन नेत्यांना आहे. महायुती भक्कम असावी, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे तिघांचेही स्वागत करावे त्याचे नियाेजन करण्यासाठी ही बैठक असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे