शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

कोकणवासीयांचा परतीचा प्रवास होणार निर्विघ्न, रत्नागिरी जिल्ह्यातून किती जादा गाड्यांचे आरक्षण..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:06 IST

आजपासून परतीचा प्रवास सुरू

रत्नागिरी : जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असल्यामुळे २९३० जादा एसटी गाड्यातून कोकणवासीय जिल्ह्यात आले होते. सात दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करून मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) गाैरी-गणपतींचे विसर्जन केल्यानंतर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी निघणार आहेत. पहिल्याच दिवशी रत्नागिरी विभागातून २२१ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात एसटीच्या माध्यमातून कोकणवासीय मोठ्या संख्येने आले आहेत. गाैरी-गणपतीचे विसर्जन केल्यानंतर ते पुन्हा कामाच्या ठिकाणी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. रेल्वेसह, खासगी गाड्या उपलब्ध असल्या तरी एसटी गावामध्ये, वाडीपर्यंत येत असल्यामुळे, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या तिकीट दरातील सवलतीमुळे एसटीतील प्रवासाचा पर्याय निवडला जात आहे. त्यानुसार ग्रुप बुकिंगसाठी ७८४ व जनरल बुकिंगच्या १३५५ मिळून एकूण २,१३९ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, अद्याप आरक्षण सुरू आहे.अनंत चतुर्दशी दि. ६ रोजी असल्यामुळे दि. ७ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दि. २ ते दि. ७ सप्टेंबरपर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार असून, मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबईहून आलेल्या जादा गाड्या प्रत्येक आगारात थांबविण्यात आल्या असून, याच गाड्या परतीसाठी सोडण्यात येणार आहेत. मंगळवारपासून त्या मार्गस्थ होतील.निर्विघ्न प्रवासासाठी सज्जकशेडी ते खारेपाटण या मार्गावर रत्नागिरी विभागातर्फे फिरते दुरुस्ती पथक, यांत्रिक कर्मचारी, ब्रेकउाऊन व्हॅन, देखभाल पथक, अल्कोटेट चाचणी पथक, मार्ग तपासणी पथक/दक्षता पथक  कार्यरत राहणार आहे.दैनंदिन १५० बसेसरत्नागिरी विभागातून प्रवाशांच्या मागणीप्रमाणे नऊ आगारांतून जादा गाड्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. याशिवाय दैनंदिन १५० गाड्याही सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ऑनलाइन आरक्षण सुविधा व मागणीनुसार बसेसची उपलब्ध करण्यात येत आहे.२-७ सप्टेंबर कालावधीत आरक्षित बसेस संख्यादिनांक - बसेस संख्या२ - २२१३ - ११११४ - ५९२५ - १०४६ - ५७७ - ५४एकूण - २१३९

गावी आलेल्या गणेशभक्तांसाठी ग्रुप बुकिंगही करता येणार आहे. ग्रुप बुकिंगमुळे एसटी बस थेट त्यांच्या गावातून सुटणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेणे फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक आगारात प्रवासी वाहतूक केंद्र उभे करून बुकिंग सुविधा उपलब्ध केली आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक.