शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
2
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
3
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
4
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
5
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
7
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
8
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
9
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
10
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
11
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
12
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
13
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
14
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
15
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?
16
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
17
GSTच्या नव्या बदलांमुळे IPL 2026ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?
18
कोकणात भाजप-शिंदेसेनेत फोडाफोडी? कुडाळमध्ये नगराध्यक्षासह ६ नगरसेवकांचं भाजपामधून निलंबन 
19
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
20
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण

कोकणवासीयांचा परतीचा प्रवास होणार निर्विघ्न, रत्नागिरी जिल्ह्यातून किती जादा गाड्यांचे आरक्षण..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:06 IST

आजपासून परतीचा प्रवास सुरू

रत्नागिरी : जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असल्यामुळे २९३० जादा एसटी गाड्यातून कोकणवासीय जिल्ह्यात आले होते. सात दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करून मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) गाैरी-गणपतींचे विसर्जन केल्यानंतर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी निघणार आहेत. पहिल्याच दिवशी रत्नागिरी विभागातून २२१ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात एसटीच्या माध्यमातून कोकणवासीय मोठ्या संख्येने आले आहेत. गाैरी-गणपतीचे विसर्जन केल्यानंतर ते पुन्हा कामाच्या ठिकाणी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. रेल्वेसह, खासगी गाड्या उपलब्ध असल्या तरी एसटी गावामध्ये, वाडीपर्यंत येत असल्यामुळे, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या तिकीट दरातील सवलतीमुळे एसटीतील प्रवासाचा पर्याय निवडला जात आहे. त्यानुसार ग्रुप बुकिंगसाठी ७८४ व जनरल बुकिंगच्या १३५५ मिळून एकूण २,१३९ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, अद्याप आरक्षण सुरू आहे.अनंत चतुर्दशी दि. ६ रोजी असल्यामुळे दि. ७ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दि. २ ते दि. ७ सप्टेंबरपर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार असून, मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबईहून आलेल्या जादा गाड्या प्रत्येक आगारात थांबविण्यात आल्या असून, याच गाड्या परतीसाठी सोडण्यात येणार आहेत. मंगळवारपासून त्या मार्गस्थ होतील.निर्विघ्न प्रवासासाठी सज्जकशेडी ते खारेपाटण या मार्गावर रत्नागिरी विभागातर्फे फिरते दुरुस्ती पथक, यांत्रिक कर्मचारी, ब्रेकउाऊन व्हॅन, देखभाल पथक, अल्कोटेट चाचणी पथक, मार्ग तपासणी पथक/दक्षता पथक  कार्यरत राहणार आहे.दैनंदिन १५० बसेसरत्नागिरी विभागातून प्रवाशांच्या मागणीप्रमाणे नऊ आगारांतून जादा गाड्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. याशिवाय दैनंदिन १५० गाड्याही सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ऑनलाइन आरक्षण सुविधा व मागणीनुसार बसेसची उपलब्ध करण्यात येत आहे.२-७ सप्टेंबर कालावधीत आरक्षित बसेस संख्यादिनांक - बसेस संख्या२ - २२१३ - ११११४ - ५९२५ - १०४६ - ५७७ - ५४एकूण - २१३९

गावी आलेल्या गणेशभक्तांसाठी ग्रुप बुकिंगही करता येणार आहे. ग्रुप बुकिंगमुळे एसटी बस थेट त्यांच्या गावातून सुटणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेणे फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक आगारात प्रवासी वाहतूक केंद्र उभे करून बुकिंग सुविधा उपलब्ध केली आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक.