शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

कोकणातील ही पाखरे देतात पावसाच्या आगमनाची चाहुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 15:48 IST

निसर्गातील बदलाची सर्वप्रथम चाहुल लागते ती पशु-पक्ष्यांना! पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली असते. त्यामुळे त्याच्या आगमनाचे ठोकताळेदेखील मांडले जातात. पाऊस येण्याचे संकेत काही वनस्पती आणि पक्षीदेखील देतात.

ठळक मुद्देकोकणातील ही पाखरे देतात पावसाच्या आगमनाची चाहुलनिसर्गाशी नाते, विणीच्या काळात पक्षी कोकणात येतात

अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : निसर्गातील बदलाची सर्वप्रथम चाहुल लागते ती पशु-पक्ष्यांना! पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली असते. त्यामुळे त्याच्या आगमनाचे ठोकताळेदेखील मांडले जातात. पाऊस येण्याचे संकेत काही वनस्पती आणि पक्षीदेखील देतात.

चातक (जाकोबीन कुकू)

पावसाच्या आधी नवरंग (इंडियन पिट्टा), तिबोटी खंड्या (ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर), चातक (जाकोबीन कुकू) आणि पावशा (कॉमन हॉक कुकू) हे पक्षी कोकणात दिसू लागले की, पाऊस जवळ आल्याचे मानले जाते, अशी माहिती रत्नागिरीतील पक्षीमित्र प्रसाद गोखले यांनी दिली.

पावशा (कॉमन हॉक कुकू)

पावसाळ्याच्या आधी एक ते दीड महिना नवरंग हा पक्षी दिसू लागतो. हा पक्षी कोकणात सर्वत्र दिसतो. गतवर्षी हाच पक्षी १५ एप्रिलनंतर दिसू लागला होता. मात्र, यावर्षी हा पक्षी २६ मेच्या दरम्याने दिसू लागला होता. नवरंगाच्या विणीचा काळ मे ते आॅगस्ट हा असतो. गवत, झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते.

तिबोटी खंड्या (ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर)तिबोटी खंड्या हादेखील पावसाच्या आगमनाची चाहुल देणारा पक्षी आहे. श्रीलंकेपासून भारतात सर्वच ठिकाणी हा पक्षी आढळतो. पाणथळीच्या जागेजवळ हा जास्त प्रमाणात दिसतो. मातीमध्ये बिळ तयार करून हा पक्षी राहतो.

नवरंग (इंडियन पिट्टा)

गतवर्षी २८ एप्रिलला दिसलेला पक्षी यावर्षी ७ मे रोजी दिसला होता. पावसाशी आपले घट्ट नाते सांगणारा पक्षी म्हणजे चातक पक्षी. हा पक्षीदेखील पाणथळीच्या जागी आढळतो. पावसाच्या एका थेंबावर आयुष्य काढणारा पक्षी अशीही त्याची ओळख आहे.

पावसाळ्याच्या काळात तो भारतात स्थलांतर करतो. पावसाशी आपले नाते सांगणारा दुसरा पक्षी म्हणजे पावशा. हा पक्षी ओरडताना पेरते व्हा पेरते व्हा असा आवाज येतो. त्यामुळे पाऊस जवळ आल्याचे जणू तो संकेतच देत असतो. त्याच्या आवाजाने सारेच पावसाकडे डोळे लावून बसतात.

साधारणत: मे ते ऑगस्ट महिन्याचा कालावधी हा पक्ष्यांचा विणीचा कालावधी असतो. त्यासाठी हे पक्षी कोकणात दाखल होत असतात. एकमेकांना आकृष्ट करण्यासाठी हे पक्षी ओरडत असतात. त्यातूनच ते पावसाचे संकेत देतात. निसर्गाची नाते जोडलेल्या या पक्ष्यांचे अस्तित्व माणसांमुळे आता धोक्यात आल्याची खंत आहे.- प्रसाद गोखलेपक्षीमित्र, रत्नागिरी.

टॅग्स :Rainपाऊसbirds sanctuaryपक्षी अभयारण्यRatnagiriरत्नागिरी