शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील ही पाखरे देतात पावसाच्या आगमनाची चाहुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 15:48 IST

निसर्गातील बदलाची सर्वप्रथम चाहुल लागते ती पशु-पक्ष्यांना! पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली असते. त्यामुळे त्याच्या आगमनाचे ठोकताळेदेखील मांडले जातात. पाऊस येण्याचे संकेत काही वनस्पती आणि पक्षीदेखील देतात.

ठळक मुद्देकोकणातील ही पाखरे देतात पावसाच्या आगमनाची चाहुलनिसर्गाशी नाते, विणीच्या काळात पक्षी कोकणात येतात

अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : निसर्गातील बदलाची सर्वप्रथम चाहुल लागते ती पशु-पक्ष्यांना! पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली असते. त्यामुळे त्याच्या आगमनाचे ठोकताळेदेखील मांडले जातात. पाऊस येण्याचे संकेत काही वनस्पती आणि पक्षीदेखील देतात.

चातक (जाकोबीन कुकू)

पावसाच्या आधी नवरंग (इंडियन पिट्टा), तिबोटी खंड्या (ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर), चातक (जाकोबीन कुकू) आणि पावशा (कॉमन हॉक कुकू) हे पक्षी कोकणात दिसू लागले की, पाऊस जवळ आल्याचे मानले जाते, अशी माहिती रत्नागिरीतील पक्षीमित्र प्रसाद गोखले यांनी दिली.

पावशा (कॉमन हॉक कुकू)

पावसाळ्याच्या आधी एक ते दीड महिना नवरंग हा पक्षी दिसू लागतो. हा पक्षी कोकणात सर्वत्र दिसतो. गतवर्षी हाच पक्षी १५ एप्रिलनंतर दिसू लागला होता. मात्र, यावर्षी हा पक्षी २६ मेच्या दरम्याने दिसू लागला होता. नवरंगाच्या विणीचा काळ मे ते आॅगस्ट हा असतो. गवत, झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते.

तिबोटी खंड्या (ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर)तिबोटी खंड्या हादेखील पावसाच्या आगमनाची चाहुल देणारा पक्षी आहे. श्रीलंकेपासून भारतात सर्वच ठिकाणी हा पक्षी आढळतो. पाणथळीच्या जागेजवळ हा जास्त प्रमाणात दिसतो. मातीमध्ये बिळ तयार करून हा पक्षी राहतो.

नवरंग (इंडियन पिट्टा)

गतवर्षी २८ एप्रिलला दिसलेला पक्षी यावर्षी ७ मे रोजी दिसला होता. पावसाशी आपले घट्ट नाते सांगणारा पक्षी म्हणजे चातक पक्षी. हा पक्षीदेखील पाणथळीच्या जागी आढळतो. पावसाच्या एका थेंबावर आयुष्य काढणारा पक्षी अशीही त्याची ओळख आहे.

पावसाळ्याच्या काळात तो भारतात स्थलांतर करतो. पावसाशी आपले नाते सांगणारा दुसरा पक्षी म्हणजे पावशा. हा पक्षी ओरडताना पेरते व्हा पेरते व्हा असा आवाज येतो. त्यामुळे पाऊस जवळ आल्याचे जणू तो संकेतच देत असतो. त्याच्या आवाजाने सारेच पावसाकडे डोळे लावून बसतात.

साधारणत: मे ते ऑगस्ट महिन्याचा कालावधी हा पक्ष्यांचा विणीचा कालावधी असतो. त्यासाठी हे पक्षी कोकणात दाखल होत असतात. एकमेकांना आकृष्ट करण्यासाठी हे पक्षी ओरडत असतात. त्यातूनच ते पावसाचे संकेत देतात. निसर्गाची नाते जोडलेल्या या पक्ष्यांचे अस्तित्व माणसांमुळे आता धोक्यात आल्याची खंत आहे.- प्रसाद गोखलेपक्षीमित्र, रत्नागिरी.

टॅग्स :Rainपाऊसbirds sanctuaryपक्षी अभयारण्यRatnagiriरत्नागिरी