शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कोकणातील ही पाखरे देतात पावसाच्या आगमनाची चाहुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 15:48 IST

निसर्गातील बदलाची सर्वप्रथम चाहुल लागते ती पशु-पक्ष्यांना! पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली असते. त्यामुळे त्याच्या आगमनाचे ठोकताळेदेखील मांडले जातात. पाऊस येण्याचे संकेत काही वनस्पती आणि पक्षीदेखील देतात.

ठळक मुद्देकोकणातील ही पाखरे देतात पावसाच्या आगमनाची चाहुलनिसर्गाशी नाते, विणीच्या काळात पक्षी कोकणात येतात

अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : निसर्गातील बदलाची सर्वप्रथम चाहुल लागते ती पशु-पक्ष्यांना! पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली असते. त्यामुळे त्याच्या आगमनाचे ठोकताळेदेखील मांडले जातात. पाऊस येण्याचे संकेत काही वनस्पती आणि पक्षीदेखील देतात.

चातक (जाकोबीन कुकू)

पावसाच्या आधी नवरंग (इंडियन पिट्टा), तिबोटी खंड्या (ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर), चातक (जाकोबीन कुकू) आणि पावशा (कॉमन हॉक कुकू) हे पक्षी कोकणात दिसू लागले की, पाऊस जवळ आल्याचे मानले जाते, अशी माहिती रत्नागिरीतील पक्षीमित्र प्रसाद गोखले यांनी दिली.

पावशा (कॉमन हॉक कुकू)

पावसाळ्याच्या आधी एक ते दीड महिना नवरंग हा पक्षी दिसू लागतो. हा पक्षी कोकणात सर्वत्र दिसतो. गतवर्षी हाच पक्षी १५ एप्रिलनंतर दिसू लागला होता. मात्र, यावर्षी हा पक्षी २६ मेच्या दरम्याने दिसू लागला होता. नवरंगाच्या विणीचा काळ मे ते आॅगस्ट हा असतो. गवत, झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते.

तिबोटी खंड्या (ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर)तिबोटी खंड्या हादेखील पावसाच्या आगमनाची चाहुल देणारा पक्षी आहे. श्रीलंकेपासून भारतात सर्वच ठिकाणी हा पक्षी आढळतो. पाणथळीच्या जागेजवळ हा जास्त प्रमाणात दिसतो. मातीमध्ये बिळ तयार करून हा पक्षी राहतो.

नवरंग (इंडियन पिट्टा)

गतवर्षी २८ एप्रिलला दिसलेला पक्षी यावर्षी ७ मे रोजी दिसला होता. पावसाशी आपले घट्ट नाते सांगणारा पक्षी म्हणजे चातक पक्षी. हा पक्षीदेखील पाणथळीच्या जागी आढळतो. पावसाच्या एका थेंबावर आयुष्य काढणारा पक्षी अशीही त्याची ओळख आहे.

पावसाळ्याच्या काळात तो भारतात स्थलांतर करतो. पावसाशी आपले नाते सांगणारा दुसरा पक्षी म्हणजे पावशा. हा पक्षी ओरडताना पेरते व्हा पेरते व्हा असा आवाज येतो. त्यामुळे पाऊस जवळ आल्याचे जणू तो संकेतच देत असतो. त्याच्या आवाजाने सारेच पावसाकडे डोळे लावून बसतात.

साधारणत: मे ते ऑगस्ट महिन्याचा कालावधी हा पक्ष्यांचा विणीचा कालावधी असतो. त्यासाठी हे पक्षी कोकणात दाखल होत असतात. एकमेकांना आकृष्ट करण्यासाठी हे पक्षी ओरडत असतात. त्यातूनच ते पावसाचे संकेत देतात. निसर्गाची नाते जोडलेल्या या पक्ष्यांचे अस्तित्व माणसांमुळे आता धोक्यात आल्याची खंत आहे.- प्रसाद गोखलेपक्षीमित्र, रत्नागिरी.

टॅग्स :Rainपाऊसbirds sanctuaryपक्षी अभयारण्यRatnagiriरत्नागिरी