शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

महिलांनी एकत्र येऊन सुरू केले रत्नागिरीत राज्यातील पहिलेच सुपर मार्केट, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 18:24 IST

राज्यात अन्यत्र ४०० ठिकाणी अशी सुपर मार्केट उभारण्यात येणार

रत्नागिरी : तब्बल १६०० महिलांनी एकत्र येऊन प्रत्येकी पाच हजारांची देणगी देत रत्नागिरीत ग्राहक बाजार सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले. बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेले हे राज्यातील पहिलेच सुपर मार्केट आहे. ही संकल्पना मुख्यमंत्र्यांना आवडली असून, राज्यात अन्यत्र ४०० ठिकाणी अशी सुपर मार्केट उभारण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली असल्याची माहिती उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.शुक्रवारी पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील निर्णयांची माहिती दिली. रत्नागिरीत सुरू झालेल्या बचत गटांच्या सुपर मार्केटला आता सरकारकडून आधार दिला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून महिला व बालकल्याण समितीसाठीच्या निधीतून दोन कोटी रुपये नगर परिषदेकडे वर्ग करत आहोत. नगर परिषद तीन कोटी रुपये देईल. या पाच कोटींमधून रत्नागिरीच्या आठवडा बाजारात एक संकुल उभे केले जाईल. जे सुपर मार्केट आता झाले आहे, त्याचे मॉलमध्ये रूपांतर करण्याचा हा प्रयत्न आहे. यात जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काची जागा मिळेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी १०० नवीन बसेस मंजूर केल्या आहेत. त्यातील ५० रत्नागिरीला तर, ५० रायगडला मिळतील. यातील रत्नागिरीला मिळालेल्या बसेसचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी केला. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता काही ठिकाणी मोठ्या गाड्या जात नाहीत. त्यामुळे ५० मिनी बसेस देण्यालाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्याही महिन्याभरातच मिळतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.गेल्या काही काळात रत्नागिरी जिल्हा म्हणून तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाला लोकनेते शामराव पेजे यांचे नाव दिले जाणार आहे. त्यांच्या नावाने राजकारण करणारे अनेक लोक आहेत. पण याबाबतचा निर्णय त्यांनी आतापर्यंत घेतला नव्हता. तो आता झाला आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे सामंत म्हणाले.

दापोली तालुक्यातील मुरूड येथे कुणबी समाजासाठी वसतिगृह उभारण्यासाठी सरकारने परतबोलीच्या अटीवर पाच कोटी रुपये दिले होते. वसतिगृहासाठी सात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे काम रखडले होते. मात्र शिंदे सरकारने त्यासाठी सात कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तेही परतबोलीची अट रद्द करून देण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले. पैसे परत देण्याच्या अटीवर देण्याच्या मागच्या सरकारच्या निर्णयामागचे कारण काय, हे मात्र आपल्याला समजले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथे माजी मंत्री बाळासाहेब सावंत यांचे स्मारक करण्याचा निर्णय २०१५ साली झाला. त्यासाठी ३५ लाख रुपयांची गरज होती. त्यांच्या हाताखाली तयार झालेले अनेक लोक मागच्या मंत्रिमंडळात होते. मात्र निधी मिळाला नाही. आता ते मंजूर झाले आहेत. महिन्याभरात त्याचा शुभारंभ होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

राऊत यांना महत्त्व देत नाहीवारिशे यांच्या हत्येचा कट रत्नागिरीत एका बंगल्यावर शिजल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला. याबाबत प्रश्न करण्यात आला असता, मंत्री सामंत यांनी राऊत यांना मी महत्त्व देत नाही, असे सांगून विषय बदलला.‘ते’ २५ लाख रुपये आलेपत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबाला सरकारने २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र त्यातील २५ पैसेही सरकार देणार नाही, अशी टीका काही ठराविक लोकांकडून सुरू झाली होती. हे २५ लाख रुपये शुक्रवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले आहेत. ते कसे अदा करावेत, याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्याला सांगितले आहे. मात्र पत्रकारांशीच चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेऊन ही मदत वारिशे कुटुंबाला लवकरच दिली जाईल, असे मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे