शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

‘त्या’ मुलीचा इतका लळा लागलाय आमचा पायच निघत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 12:59 IST

पांगरी येथील पऱ्याजवळील एका जंगलमय भागात चार दिवस थंडीत कुडकुडत निपचित पडलेली आढळली. तिची अवस्था पाहून साऱ्यांच्याच डाेळ्यात पाणी आले हाेते.

अरुण आडिवरेकररत्नागिरी : जंगलमय भागात चार दिवस थंडीत राहिलेल्या त्या मुलीकडे पाहिल्यानंतर मन सुन्न झाले. तिची ती अवस्था पाहून तिला उचलून घेण्याचेही धाडस हाेत नव्हते. आता तिची तब्बेतही सुधारली आहे. या मुलीचा आता इतका लळा लागला आहे की, तिच्या जवळून पायच निघत नाही, असे भावूक उद्गार रुग्णालयात तिची काळजी घेणारे पांगरी येथील ग्रामसेवक अखिलेश गमरे यांनी व्यक्त केले.संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील पऱ्याजवळील एका जंगलमय भागात २५ जानेवारी राेजी दीड वर्षाची मुलगी चार दिवस थंडीत कुडकुडत निपचित पडलेली आढळली. तिची अवस्था पाहून साऱ्यांच्याच डाेळ्यात पाणी आले हाेते.अखिलेश गमरे यांनी ग्रामस्थांसह खासगी वाहनाने तिला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. या मुलीचे नाव अनुश्री असून,  तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अखिलेश यांनी तिच्याजवळ थांबण्याची जबाबदारी स्वीकारली. रत्नागिरीतील कुवारबाव येथे अखिलेश हे पत्नी आणि आईसाेबत राहतात.मुलीला भेटण्यासाठी अनेकजण येत असल्याने तिला अजूनही अतिदक्षता विभागातच ठेवण्यात आले आहे. तिला उपचारासाठी दाखल केल्यापासून अखिलेश आणि त्यांची पत्नी इरा त्या मुलीजवळ सकाळपासून थांबलेले असतात. रात्री १२-१२.३० वाजता ती झाेपल्यानंतर दाेघे घरी जातात. तिला जेवण देणे, तिला जे हवे ते बघण्याचे काम दाेघे करतात. पाेटच्या मुलीसारखी ते दाेघे तिची काळजी घेतात.अखिलेश यांनी सांगितले की, माझ्या कार्यालयाने मला समजून घेतल्यानेच मुलीजवळ थांबणे शक्य झाले. आम्हाला आता तिचा इतका लळा लागला आहे की, तिच्याजवळून पायच निघत नाही. तिही आम्ही आल्याशिवाय जेवत नाही, असे अखिलेश यांनी सांगितले.

प्रेम मिळालेच नाहीया चिमुकलीला प्रेम कधी मिळालेच नाही. तिला घरात एकटीला ठेवून सगळे बाहेर जात हाेते. रुग्णालयातील साऱ्यांच्या प्रेमाने ती आनंदून गेली आहे. तिलाही सर्वांची आता सवय झाली आहे.

काेणताच त्रास नाहीया मुलीचा काेणताही त्रास नाही. अतिदक्षता विभागातील शांतता तिने कधीच भंग केली नाही. ती कधी रडली नाही. हाता-पायावर सलाईनच्या सुया टाेचल्या तरीही तिच्या ताेंडातून रडणे आलेले नाही. स्वत:च्या हाताने जेवते, रुमालाची घडीही अगदी व्यवस्थित करते.

मुलीला रुग्णालयात आणले त्यावेळी तिची प्रकृती चिंताजनक हाेती. ती बेशुद्ध हाेती, मानसिक धक्का बसला हाेता. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. बालराेगतज्ज्ञ डाॅ. राेहित पाटील यांच्यासह डाॅ. अभिषेक पाटील यांनी उपचार केले. ती बरी झाल्याचे पाहून खूप समाधान वाटते.  - डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी