शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरण: उद्योगमंत्री उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 18:41 IST

जिथपर्यंत धागेदोरे आहेत, तिथपर्यंत पोलीस पोहोचतील,

चिपळूण : राज्यात जसा तेलगी स्टॅम्प घोटाळा झाला तसाच सध्या शंभर कोटींचा स्टॅम्प घोटाळा झाला आहे. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार जवळपास शंभर कोटींचे स्टॅम्प बनावट नावांनी विकत घेतले गेले आहेत. त्याची चौकशी आता राज्य सरकारने सुरू केली आहे, अशी खळबळजनक माहिती राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.मंत्री सामंत पुढे म्हणाले की, तेलगीइतका मोठा स्टॅम्प घोटाळा झाला नसला तरी यात खूप मोठी गडबड आहे. हे स्टॅम्प कोणी खरेदी केले, हेही चौकशीत पुढे येईल. मुंबईच्या निर्मलनगर पोलीस स्थानकात ४ हजार ६८३ बोगस प्रतिज्ञापत्र सापडली आहेत. पोलिसांनी प्रतिज्ञापत्र असणाऱ्या लोकांना दूरध्वनी केले व त्याची माहिती घेतली. मात्र त्या व्यक्तींनी आपण कोणतेही प्रतिज्ञापत्र दिलेले नाही, अशी माहिती दिली. हा स्टॅम्प घोटाळा फक्त मुंबईपुरता मर्यादित नसून, तो राज्यभर झाला असावा, अशी शंका आहे. त्यानुसार तपासही केला जात आहे.कोल्हापूरमध्ये क्राईम ब्रँच, सीबीआय चौकशीतून काम सुरू झाले आहेत. या प्रकरणातून अनेक गोष्टी पुढे येणार आहेत. हे स्टॅम्प पेपर कोणी खरेदी केले, याची माहिती आपल्याकडे असली तरी चौकशी सुरू असल्याने आपण सध्या त्यावर बोलणार नाही. जिथपर्यंत धागेदोरे आहेत, तिथपर्यंत पोलीस पोहोचतील, याची आम्हाला खात्री आहे, असे सामंत यांनी सांगितले.शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, ज्या महिलेने हिंदू देवतांवर अन्याय केले त्यांच्याविषयी आपण काय बोलणार? आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत प्रश्न करण्यात आला असता आज विकासकामांच्या निधीसाठी आलो आहे. त्यामुळे त्याचविषयी बोलूया, असे सांगून त्यांनी प्रश्न टाळला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना