शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोल्हापूरच्या रिक्षांनी पटकाविला ‘रत्नागिरी रिक्षा सुंदरी’चा बहुमान, रोख २१ हजार व सन्मानचिन्ह देवून गौरव 

By मेहरून नाकाडे | Updated: May 2, 2023 19:07 IST

एकापेक्षा एक आकर्षक सजावट केलेल्या रिक्षा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची मोठी गर्दी

रत्नागिरी: श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे 'रत्नागिरी रिक्षा सुंदरी' या अनोखी रिक्षा सौंदर्य स्पर्धेत कोल्हापूरच्या रिक्षांनी दोन्ही गटात प्रथम क्रमांक मिळवित ‘रत्नागिरी रिक्षा सुंदरी’ होण्याचा बहुमान पटकाविला आहे. अविनाश दिंडे, संकेत पवार यांच्या रिक्षांना प्रथम क्रमांक मिळाला असून दोघांनाही रोख २१ हजार रूपये व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.व्यवसायासाठी वापरणाऱ्या रिक्षांची वेगवेगळ्या पध्दतीने कशी सजावट केली जाते. प्रवाशांना ते कोणकोणत्या अधिकच्या सुविधा देतात याची माहिती सर्वांना यासाठी तुषार साळवी यांनी श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘रत्नागिरी रिक्षा सुंदरी’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, निपाणी, मुंबई, पुणे, रायगड येथील पन्नास रिक्षा स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.सन २०१९ ते २०२३ वर्षातील गटात प्रथम क्रमांक अविनाश दिंडे (कोल्हापूर) यांनी मिळविला. दिंडे यांनी अनोख्या पध्दतीने रिक्षा सजवली होती. रिक्षामध्ये वायफायसह, वृत्तपत्र, पिण्याचे पाणी, फायरफायटर, आकर्षक सीट, अंतर्गत सजावटीवर भर दिला होता. रिक्षाच्या टपावर किल्ल्याची प्रतिकृती उभारली होती.रिक्षाव्दारे दिंड गरोदर माता, दिव्यांग, सैनिक यांच्यासाठी मोफत सेवा देत असून त्यांचे कार्य वैशिष्टयपूर्ण ठरले.सन २०१९ पूर्वीच्या रिक्षा या दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक संकेत पवार (कोल्हापूर) यांनी मिळविला पवार यांनीही दिंडेंप्रमाणेच सजावट रिक्षात केली होती. रिक्षाव्दारे सामाजिक कार्यावर संकेत पवार विशेष भर देत आहेत.सन २०१९ ते २३ वर्षातील गटात व्दितीय क्रमांक समीर बोले ( संगमेश्वर), तृतीय क्रमांक प्रसाद दुर्गवळी (दापोली) तर उत्तेजनार्थ क्रमांक अनिकेत पवार ( कोल्हापूर) यांनी मिळविला.सन २०१९ पूर्वीच्या रिक्षा या दुसऱ्या गटात शिवांग अडूरकर (कोल्हापूर), तृतीय क्रमांक रईस (बेळगाव), उत्तेजनार्थ क्रमांक आरव शिंदे (बेळगाव) यांनी मिळविला. सर्व विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे देत उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते गाैरविण्यात आले.एकापेक्षा एक आकर्षक सजावट केलेल्या रिक्षा स्टेजवर आलेल्या पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अभिनेता विनोदवीर अंशुमन विचारेसह, गायिका ईशानी पाटणकर यांच्या वाद्यवृंदाने कार्यक्रमात आणखी रंगत आणली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkolhapurकोल्हापूर