शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी कोकणातच होणार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 17:54 IST

कोकणातील लोकांनी ज्यांना भरभरुन दिले, अशा लोकांनीच कोकणावर अन्याय केला

रत्नागिरी : केवळ भावना भडकवण्याचे राजकारण करणाऱ्या काही लोकांमुळे कोकण मागे राहिला आहे. त्यांच्यापासून कोकणी लोकांनी सावध राहिले पाहिजे. रिफायनरी प्रकल्प कोकणचे भवितव्य बदलू शकणारा असल्याने रिफायनरी कोकणातच होणार असल्याचे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रिफायनरीमुळे कोकणाला कोणताही धोका नसून, हा प्रकल्प कोकणातच होणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.मंगळवारी मुंबईमध्ये आयोजित स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कार्यक्रमात राज्याच्या या दोन्ही प्रमुख नेत्यांनी रिफायनरी कोकणातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असलेल्या संभ्रमाला राज्य सरकारकडून पूर्णविरामच देण्यात आल्याचे मानले जात आहे.या कोकण महोत्सवाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकरही उपस्थित होते. निसर्गसंपन्नता असलेल्या काेकणाला आर्थिक संपन्नता आणण्यासाठी हा महोत्सव केला जात आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध आहे. आंबा, काजू आणि मत्स्य व्यवसाय यासह स्थानिक लोकांना रोजगार देअ शकतील, अशा उद्योगांना यापुढील काळात विशेष प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरीमुळे कोकणचे भवितव्य बदलून जाईल. मात्र या प्रकल्पाबाबत भाावनिक राजकारण केले जात आहे. त्यापासून कोकणी लोकांनी सावध राहायला हवे, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई सिंधुदुर्ग हा महामार्ग असेल आणि हे सरकार कोकण विकासाला प्राधान्य देईल, असेही ते म्हणाले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे ठाकरे शिवसेनेवर टीका केली. रिफायनरी प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही. नाणारला रिफायनरी करण्याचा विषय झाला, तेव्हा प्रकल्पाला काही अटी घालण्यात आल्या होत्या. कोकणी जनतेची काळजी घेऊनच हा प्रकल्प होणार आहे. मात्र काही लोकांनी मतांचे राजकारण करण्यासाठी या प्रकल्पाला विरोध केला. हा प्रकल्प कोकणासाठी महत्त्वाचाच असल्याने तो कोकणातच उभारला जाईल, असे ते ठामपणे म्हणाले.सरकार बळ देईलनिसर्गाच्या लहरीपणामुळे, हवामानातील सततच्या बदलांमुळे कोकणातील अनेक क्षेत्रांना सध्या नुकसान सोसावे लागत आहे. त्याची दखल घेऊन त्यांना सरकार बळ देईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.कोकणाने भरभरुन दिले त्यांनीच अन्याय केलाकोकणातील लोकांनी ज्यांना भरभरुन दिले, अशा लोकांनीच कोकणावर अन्याय केला आहे, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला आणि हा प्रकल्प कोकणातच उभारणार याचा पुनरुच्चार त्यांनी केला

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस