शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी कोकणातच होणार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 17:54 IST

कोकणातील लोकांनी ज्यांना भरभरुन दिले, अशा लोकांनीच कोकणावर अन्याय केला

रत्नागिरी : केवळ भावना भडकवण्याचे राजकारण करणाऱ्या काही लोकांमुळे कोकण मागे राहिला आहे. त्यांच्यापासून कोकणी लोकांनी सावध राहिले पाहिजे. रिफायनरी प्रकल्प कोकणचे भवितव्य बदलू शकणारा असल्याने रिफायनरी कोकणातच होणार असल्याचे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रिफायनरीमुळे कोकणाला कोणताही धोका नसून, हा प्रकल्प कोकणातच होणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.मंगळवारी मुंबईमध्ये आयोजित स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कार्यक्रमात राज्याच्या या दोन्ही प्रमुख नेत्यांनी रिफायनरी कोकणातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असलेल्या संभ्रमाला राज्य सरकारकडून पूर्णविरामच देण्यात आल्याचे मानले जात आहे.या कोकण महोत्सवाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकरही उपस्थित होते. निसर्गसंपन्नता असलेल्या काेकणाला आर्थिक संपन्नता आणण्यासाठी हा महोत्सव केला जात आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध आहे. आंबा, काजू आणि मत्स्य व्यवसाय यासह स्थानिक लोकांना रोजगार देअ शकतील, अशा उद्योगांना यापुढील काळात विशेष प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरीमुळे कोकणचे भवितव्य बदलून जाईल. मात्र या प्रकल्पाबाबत भाावनिक राजकारण केले जात आहे. त्यापासून कोकणी लोकांनी सावध राहायला हवे, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई सिंधुदुर्ग हा महामार्ग असेल आणि हे सरकार कोकण विकासाला प्राधान्य देईल, असेही ते म्हणाले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे ठाकरे शिवसेनेवर टीका केली. रिफायनरी प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही. नाणारला रिफायनरी करण्याचा विषय झाला, तेव्हा प्रकल्पाला काही अटी घालण्यात आल्या होत्या. कोकणी जनतेची काळजी घेऊनच हा प्रकल्प होणार आहे. मात्र काही लोकांनी मतांचे राजकारण करण्यासाठी या प्रकल्पाला विरोध केला. हा प्रकल्प कोकणासाठी महत्त्वाचाच असल्याने तो कोकणातच उभारला जाईल, असे ते ठामपणे म्हणाले.सरकार बळ देईलनिसर्गाच्या लहरीपणामुळे, हवामानातील सततच्या बदलांमुळे कोकणातील अनेक क्षेत्रांना सध्या नुकसान सोसावे लागत आहे. त्याची दखल घेऊन त्यांना सरकार बळ देईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.कोकणाने भरभरुन दिले त्यांनीच अन्याय केलाकोकणातील लोकांनी ज्यांना भरभरुन दिले, अशा लोकांनीच कोकणावर अन्याय केला आहे, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला आणि हा प्रकल्प कोकणातच उभारणार याचा पुनरुच्चार त्यांनी केला

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस