शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टाची अत्यंत विश्वसनीय असणारी 'ही' सेवा १७१ वर्षानंतर घेणार निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 18:16 IST

वेगवान सेवेसाठी स्पीड पोस्टचा ग्राहकांसाठी पर्याय

रत्नागिरी : पोस्ट खात्याची ब्रिटिश काळात म्हणजेच १७१ वर्षे सुरू असलेली रजिस्टर्ड एडी ही सेवा १ सप्टेंबरपासून बंद करण्याचे संकेत पोस्ट खात्याने दिले आहेत. याऐवजी आता स्पीड सेवा ही एकच सेवा राहणार असून तिच्या नवीन दराबाबत येत्या आठ दिवसांत वरिष्ठ स्तरावरून कळविले जाणार असल्याची माहिती रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक अनंत सरंगले यांनी दिली. अधिक कार्यक्षम सेवेसाठी हा निर्णय पोस्ट खात्याने घेतला असल्याचे सांगितले जात आहे.ब्रिटिश काळात पोस्टाची सेवा सुरू झाली. अगदी ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचलेल्या पोस्टाने ग्रामीण जनतेशी आपली नाळ आताही कायम ठेवली आहे. सोशल मीडियाचे प्रस्थ वाढल्याने पोस्टाच्या तारसेवा, आंतर्देशीय पत्रे, साधे पोस्टकार्ड या सेवा बंद पडल्या. त्यांचा वापर अत्यंत कमी झाला. रजिस्टर्ड एडी ही सेवा मात्र आजही लोकप्रियता टिकवून आहे. या सेवेत टपाल पोहोचल्यानंतर घेणाऱ्याच्या सहीसह पोहोचदेखील मिळते. त्यामुळे रजिस्टर्ड एडी ही सेवा अत्यंत विश्वसनीय मानली जाते. शासकीय कार्यालयांमध्ये अजूनही या सेवेचा वापर होत आहे.

बदलत्या काळानुसार आता पोस्टही हायटेक झाले आहे. आता तर बॅंकिग क्षेत्रातही पोस्टाने पदार्पण केले आहे. त्यामुळे वेगवान असलेल्या स्पीड पोस्टचा पर्याय स्वीकारून रजिस्टर्ड एडी ही सेवा दीर्घ काळानंतर पोस्टाने बंद करण्याच्या निर्णय घेतला असल्याचे डाकघर अधीक्षक सरंगले यांनी सांगितले.स्पीड पोस्ट सेवेत ३५ किलो वजनापर्यंतचे पार्सल पाठविण्याची सोय आहे. टपाल पोहोचल्यानंतर मिळणारी पोहोच ही रजिस्टर्ड टपालाची सुविधा आता स्पीड पोस्टलाही दिली जाणार आहे. रजिस्टर्ड एडीपेक्षाही स्पीड पोस्ट सेवा वेगवान असल्याने ही सेवा बंद करून स्पीड पाेस्ट सेवा सुरू ठेवली जाणार आहे. मात्र, १७१ वर्षांची ही सेवा लोकप्रिय असतानाच बंद होणार आहे.

ट्रॅकिंगसाठी स्पीड पोस्ट

अधिक कार्यक्षम सेवेसाठी रजिस्टर सेवा बंद करून स्पीड पोस्ट सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे पोस्टाकडून सांगितले जात आहे. स्पीड पोस्टद्वारे ग्राहकाला कमीत कमी वेळेत पार्सल पोहोचवता येणार आहे. टपाल पोहोचलेल्या ठिकाणाचे ‘ट्रॅकिंग’ही करता येणार आहे. रजिस्टर्ड टपाल सेवा ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने ही सेवा ३० ऑगस्टपासून १७१ वर्षानंतर ग्राहकांचा निरोप घेणार आहे.