शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

चिंताजनक!, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा पट दरवर्षी घसरतोय, तब्बल ८० शाळा झाल्या बंद

By मेहरून नाकाडे | Updated: July 19, 2025 19:40 IST

ग्रामीण भागातील शिक्षणाचे भवितव्य अधांतरी

मेहरून नाकाडेरत्नागिरी : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील शिक्षणाचा आधारस्तंभ असलेल्या जिल्हा परिषदशाळा आता संकटात सापडल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या तब्बल ८ हजार ४०७ ने घटली आहे. तसेच ८० शाळा बंद पडल्या आहेत. पटसंख्येतील घसरण अशीच सुरू राहिल्यास येत्या काही वर्षांत बहुतांश शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील कमी होणारी लोकसंख्या, खासगी शाळांचा वाढता प्रभाव, शहरांकडे होणारे स्थलांतर, गावातील सुविधांचा अभाव अशा विविध कारणामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घसरू लागली आहे. पूर्वी एका घरातून दोन किंवा तीन मुले शाळेत जाणारी होती; पण आता मात्र घरटी एकच मूल असते. त्याचा फटका ग्रामीण भागातील शाळांना बसला आहे. खेडेगावांमध्ये नोकरी, आरोग्य, वीज यांसारख्या सार्वजनिक सुविधांचा अभाव असल्याने स्थलांतराचे प्रमाणही अधिक आहे.सन - शाळा - पटसंख्या २०२२-२३ - २,४६४ -  ६८,५७०२०२३- २४ - २,४२५- ६३९१०२०२४-२५ - २,३८४ - ६०,१२३

पटसंख्या घसरण्याची कारणेगावांकडे दुर्लक्षग्रामीण भागात रोजगाराची समस्या प्रमुख आहे. गावात कामधंदा मिळत नाही, शिवाय गावात आरोग्याच्या सुविधाही नाहीत. त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे.खासगी शाळांचा प्रभाव :ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे मुलांना शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात येत आहे. पाच हजार ते एक लाखापर्यंत शुल्क आकारणाऱ्या शाळांच्या देखण्या इमारती, आधुनिक सुविधा पालकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घटत आहे.

शहराचे आकर्षण :अनेक पालक मुलांच्या शिक्षणासाठी शहरात स्थलांतरित होत आहेत. तर काही गावांतून व्हॅनद्वारे मुलांना शहरातील शाळेत पाठवीत आहेत.

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा बोजा :जणगणना, निवडणूक ड्युटी, विविध सर्वेक्षणांची कामे अशा अनेक अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा शिकवण्यावरचा वेळ व लक्ष कमी झाल्याची तक्रार पालक करत आहेत.

शासकीय अनास्था :शासकीय शाळांमध्ये चांगले शिक्षक असल्यास काही काळ चांगली सुधारणा होते. मात्र, त्यांची बदली झाल्यास परिस्थिती पूर्वपदावर येते. हीच अस्थिरता पालकांचा शासकीय शाळांवरील विश्वास कमी करीत आहे.

सार्वजनिक सुविधांचा अभाव :अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अपुऱ्या वर्गखोल्या, जुन्या इमारती या समस्या आहेत.