शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, साडेसहा तास पूल वाहतुकीसाठी होता बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:48 IST

वाहतूक बंद केल्याने रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पावसमार्गे तसेच कुरचुंब आसगे मार्गे वळविण्यात आली हाेती

लांजा : सलग चार दिवस मुसळधार काेसळणाऱ्या पावसामुळे लांजा तालुक्यातील काजळी नदीसह अन्य नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आंजणारी पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने साडेसहा तास पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला हाेता. सायंकाळी ४ नंतर या पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली.गेले चार दिवस तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे तालुक्यातील काजळी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पूल लांजा पाेलीस व हातखंबा येथील वाहतूक पाेलीस यांनी सकाळी १०.३० वाजता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला हाेता. दुपारी २.१५ वाजता छोटी वाहने तसेच सायंकाळी ४ वाजता पुराचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली.वाहतूक बंद केल्याने रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पावसमार्गे तसेच कुरचुंब आसगे मार्गे वळविण्यात आली हाेती. काजळी नदीला पूर आल्याने मठ येथील दत्त मंदिर पुराच्या पाण्याखाली गेले होते. तसेच बेनी नदीही पात्र सोडून वाहू लागल्याने साटवली - भंडारवाडी येथील घरांमध्ये हळूहळू पाणी भरण्याची शक्यता निर्माण झाली होती. साटवली येथील मोरीवर पुराचे पाणी आल्याने येथील वाहतूक पुराचे पाणी कमी होईपर्यंत थांबण्यात आली होती.दोन दिवस पडलेल्या पावसाने वाडीलिंबू येथील मनोहर काशिनाथ पाटणकर, वेरवली येथील रेश्मा रमेश गांगण आणि विवली येथील देऊ धाकू कोलापटे यांच्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तालुक्यातील मुचकुंदी, बेनी, नावेरी, काजळी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नद्यांनी पात्र सोडले हाेते. पुराचे पाणी नदीकाठावरील असलेल्या शेतामध्ये शिरल्याने शेती पाण्याखाली गेली हाेती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस