शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही रत्नागिरीकर’ची सभा सामंत समर्थकांनी उधळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 13:16 IST

रत्नागिरी : शहरातील खड्ड्यांसह अन्य समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ‘आम्ही रत्नागिरीकर’ म्हणून रत्नागिरीकरांनी आयाेजित केलेल्या बैठकीचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या ...

रत्नागिरी : शहरातील खड्ड्यांसह अन्य समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ‘आम्ही रत्नागिरीकर’ म्हणून रत्नागिरीकरांनी आयाेजित केलेल्या बैठकीचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी ताबा घेत सभाच उधळून लावल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. मंत्री सामंत यांनी किती काेटींची विकासकामे केली, याचा पाढा वाचत यापुढे पालकमंत्र्यांच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशाराही दिला.रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. हे खड्डे बुजवावेत, यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आंदोलने करून नगर परिषद प्रशासनाला सुनावले होते. यानंतर ‘आम्ही रत्नागिरीकर’च्या माध्यमातून शहरातील सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काही नागरिकांनी रविवारी सायंकाळी एका हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मिलिंद कीर यांच्यासह विजय जैन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.ही सभा सुरू असतानाच सामंत समर्थक आणि शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन शेट्ये, सुदेश मयेकर, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा सुर्वे, माजी नगरसेविका स्मितल पावसकर, विजय खेडेकर, बंटी कीर, सुहेल मुकादम यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीच्या ठिकाणी आले. त्यांनी बैठकीचा ताबा घेत मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरात आणि तालुक्यात कोणत्या प्रकारची विकासकामे केली आहेत, याचा पाढाच वाचला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले हाेते. यावेळी पालकमंत्री सामंत यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी जोरदार घोषणाबाजीही केली.बैठकीत गाेंधळ हाेताच मिलिंद कीर व विजय जैन यांच्यासह काही नागरिक घटनास्थळावरुन निघून गेले. तसेच काही नागरिक बैठकीच्या ठिकाणी एका बाजूला शांतपणे उभे हाेते. सामंत समर्थकांनी ही बैठक उधळून लावल्याने रत्नागिरीत नवीन राजकीय वादाची ठिणगी पडल्याची चर्चा रंगू लागली आहे.जशाच तसे उत्तर देऊयापुढे विविध समाजमाध्यमांवर पालकमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात कोणी काही बोलल्यास आणि वारंवार बदनामी केल्यास सहन केले जाणार नाही तसेच यापुढे बदनामी करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत