शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

तिवरे धरण दुर्घटनेतील बाधित कुटुंबीय आजही घरांच्या प्रतीक्षेत, एसआयटीच्या चौकशी अहवालावर कारवाईच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 19:02 IST

तिवरे दुर्घटनेत आई-वडिलांसह आपल्या संपूर्ण कुटुंबाला मुकलेला रूद्र चव्हाण हा मावशीकडे पेठमाप येथे आल्यामुळे वाचला होता. तो तिवरे गावापासून अलिप्त राहत असला तरी आजही आई, वडील व बहिणीच्या आठवणीने त्याचे मन दाटून येते.

चिपळूण : तीन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलेल्या तिवरे धरण दुर्घटनेतील बाधित कुटुंबीयांपैकी निम्म्या कुटुंबीयांना हक्काची घरेच मिळालेली नाहीत. वर्षभरापूर्वी पाठवलेल्या प्रस्तावावरही कार्यवाही झालेली नाही. परिणामी मुंबई, पुण्यात राहणाऱ्या कुटुंबीयांना अलोरेतील प्रकल्पात मिळाली असली, तरी १८ स्थानिक कुटुंबीयांना अद्याप घर मिळालेले नाही. एसआयटीच्या चौकशी अहवालावर कोणतीही कारवाई न करता विभागीय चौकशीची मात्रा देण्यात आली. त्यातच धरण उभारणीलाही मुहूर्त सापडलेला नाही.

तिवरे ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार अ, ब, क, ड अशी वर्गवारी असलेली एकूण ४२ घरांची नोंद सापडली. त्यावरून ४२ कुटुंबांची पुनर्वसन यादी तयार करताना मूळ कुटुंब मालक जिवंत असतानाच यादीमध्ये मात्र ते मृत म्हणून नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आता ४२ पैकी २४ कुटुंबांना अलोरे येथे पुनर्वसन प्रकल्पात घरे बांधून देण्यात आली. परंतु, अजूनही १८ कुटुंबीयांना घरे मिळणे बाकी असून, ही घरे तिवरे गावातच प्रस्तावित आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून तो लालफितीत अडकल्याचे चित्र आहे.

रूद्रला येते आई, वडील, बहिणीची आठवण

तिवरे दुर्घटनेत आई-वडिलांसह आपल्या संपूर्ण कुटुंबाला मुकलेला रूद्र चव्हाण हा मावशीकडे पेठमाप येथे आल्यामुळे वाचला होता. सद्यस्थितीत तो शहरातील एका शाळेत दुसरीत शिकत आहे. तो तिवरे गावापासून अलिप्त राहत असला तरी आजही आई, वडील व बहिणीच्या आठवणीने त्याचे मन दाटून येते.

कंटेनर बनले निवारा केंद्र

तिवरे धरण दुर्घटनेत कंटेनरमध्ये धरणग्रस्तांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली होती. आता कंटेनरमधील धरणग्रस्तांचे अलोरे प्रकल्पात पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे सध्या येथील कंटेनर आपत्कालीन स्थितीत निवारा केंद्र म्हणून वापरण्याचे नियोजन आहे.

दुर्घटनेला आज तीन वर्ष झाली तरी स्थानिकांना न्याय मिळालेला नाही. अलोरेतील प्रकल्पात लॉटरी पद्धतीने दिलेल्या घरांमध्ये बहुतांशी मुंबई, पुण्यात राहणारेच अधिक आहे. त्यामध्ये गावातील कुटुंबीयांचा समावेश फार कमी आहे. आता उर्वरित पुनर्वसन प्रकल्प तातडीने मार्गी लावणे गरजेचे असताना त्याकडे शासन डोळेझाक करत आहे. - अजित चव्हाण, तिवरे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण