शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

तिवरे धरण दुर्घटनेतील बाधित कुटुंबीय आजही घरांच्या प्रतीक्षेत, एसआयटीच्या चौकशी अहवालावर कारवाईच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 19:02 IST

तिवरे दुर्घटनेत आई-वडिलांसह आपल्या संपूर्ण कुटुंबाला मुकलेला रूद्र चव्हाण हा मावशीकडे पेठमाप येथे आल्यामुळे वाचला होता. तो तिवरे गावापासून अलिप्त राहत असला तरी आजही आई, वडील व बहिणीच्या आठवणीने त्याचे मन दाटून येते.

चिपळूण : तीन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलेल्या तिवरे धरण दुर्घटनेतील बाधित कुटुंबीयांपैकी निम्म्या कुटुंबीयांना हक्काची घरेच मिळालेली नाहीत. वर्षभरापूर्वी पाठवलेल्या प्रस्तावावरही कार्यवाही झालेली नाही. परिणामी मुंबई, पुण्यात राहणाऱ्या कुटुंबीयांना अलोरेतील प्रकल्पात मिळाली असली, तरी १८ स्थानिक कुटुंबीयांना अद्याप घर मिळालेले नाही. एसआयटीच्या चौकशी अहवालावर कोणतीही कारवाई न करता विभागीय चौकशीची मात्रा देण्यात आली. त्यातच धरण उभारणीलाही मुहूर्त सापडलेला नाही.

तिवरे ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार अ, ब, क, ड अशी वर्गवारी असलेली एकूण ४२ घरांची नोंद सापडली. त्यावरून ४२ कुटुंबांची पुनर्वसन यादी तयार करताना मूळ कुटुंब मालक जिवंत असतानाच यादीमध्ये मात्र ते मृत म्हणून नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आता ४२ पैकी २४ कुटुंबांना अलोरे येथे पुनर्वसन प्रकल्पात घरे बांधून देण्यात आली. परंतु, अजूनही १८ कुटुंबीयांना घरे मिळणे बाकी असून, ही घरे तिवरे गावातच प्रस्तावित आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून तो लालफितीत अडकल्याचे चित्र आहे.

रूद्रला येते आई, वडील, बहिणीची आठवण

तिवरे दुर्घटनेत आई-वडिलांसह आपल्या संपूर्ण कुटुंबाला मुकलेला रूद्र चव्हाण हा मावशीकडे पेठमाप येथे आल्यामुळे वाचला होता. सद्यस्थितीत तो शहरातील एका शाळेत दुसरीत शिकत आहे. तो तिवरे गावापासून अलिप्त राहत असला तरी आजही आई, वडील व बहिणीच्या आठवणीने त्याचे मन दाटून येते.

कंटेनर बनले निवारा केंद्र

तिवरे धरण दुर्घटनेत कंटेनरमध्ये धरणग्रस्तांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली होती. आता कंटेनरमधील धरणग्रस्तांचे अलोरे प्रकल्पात पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे सध्या येथील कंटेनर आपत्कालीन स्थितीत निवारा केंद्र म्हणून वापरण्याचे नियोजन आहे.

दुर्घटनेला आज तीन वर्ष झाली तरी स्थानिकांना न्याय मिळालेला नाही. अलोरेतील प्रकल्पात लॉटरी पद्धतीने दिलेल्या घरांमध्ये बहुतांशी मुंबई, पुण्यात राहणारेच अधिक आहे. त्यामध्ये गावातील कुटुंबीयांचा समावेश फार कमी आहे. आता उर्वरित पुनर्वसन प्रकल्प तातडीने मार्गी लावणे गरजेचे असताना त्याकडे शासन डोळेझाक करत आहे. - अजित चव्हाण, तिवरे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण