शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रत्नागिरी जिल्ह्याला गुवाहाटी दौऱ्याचे फलित लवकरच मिळेल : उदय सामंत

By संदीप बांद्रे | Updated: December 2, 2022 19:29 IST

जिल्ह्याबाहेरील लोकांकडून माथी भडकवण्याचे काम

चिपळूण : जिल्ह्याला साडेसात वर्षानंतर विद्यमान सरकारमुळे स्थानिक पालकमंत्री मिळाला. पालकमंत्री या नात्याने एका दिवसात ३०० कोटीची कामे मंजूर करू शकलाे. मुख्यमंत्री आल्यास ते ३ हजार कोटीचा निधी देतील. हे गुवाहाटी दौऱ्याचे फलित असून, त्याचे फळ लवकरच जिल्ह्याला मिळेल, असा विश्वास पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे व्यक्त केला.उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शहरातील विविध विकासकामांची भूमिपूजन व उद्घाटने शुक्रवारी पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यावेळी पालकमंत्री सामंत यांनी विविध विकास कामांसाठी सुमारे २०० कोटी निधीची घोषणा केली. चिपळुणात पूरपरिस्थिती न येण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लाल व निळ्या पूररेषेबाबत लवकरच मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल.नगर परिषदच्या बहाद्दूरशेख नाका येथील औद्योगिक वसाहतीत बचत गटाच्या इमारतीसाठी १ कोटी रुपये, गोवळकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची जागा संपादीत करण्यासाठी आवश्यक निधी, शहरातील रस्त्यासाठी नगरोत्थानमधून साडेचार कोटीचा निधी मंजूर केल्याचे सांगितले.तसेच शिंदे - फडणवीस सरकारच्या माध्यमातून चिपळूण शहराचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न केला जाईल. चिपळूणवर पुराचे पुन्हा गंभीर संकट येऊ नये, यासाठी सत्ताधारी राज्यसरकार कटीबद्ध असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याबाहेरील लोकांकडून माथी भडकवण्याचे कामनाणार प्रकल्पाविषयी सुरुवातीला आपली व इतरांचीही भूमिका विरोधी होती हे मान्य आहे, पण थेट कायम स्वरूपी ७ हजार नोकऱ्या देणाऱ्या या प्रकल्पाला आता विरोध करून चालणार नाही. जिल्ह्यातील तरूणांना नोकऱ्या हव्या असतील तर येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करून चालणार नाही. प्रकल्प येण्यासाठी आता समर्थन करणाऱ्या संघर्ष समित्या स्थापन व्हायला हव्यात. मात्र, दुर्दैवाने सध्या जिल्ह्याबाहेरील लोक स्थानिकांची माथी भडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. घरा-घरात भांडणे लावण्याचे प्रकार त्यांनी सुरू केलेत. जिल्ह्यात प्रकल्प आले तरच जिल्ह्याचा कायापालट होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतguwahati-pcगौहती