शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रत्नागिरी जिल्ह्याला गुवाहाटी दौऱ्याचे फलित लवकरच मिळेल : उदय सामंत

By संदीप बांद्रे | Updated: December 2, 2022 19:29 IST

जिल्ह्याबाहेरील लोकांकडून माथी भडकवण्याचे काम

चिपळूण : जिल्ह्याला साडेसात वर्षानंतर विद्यमान सरकारमुळे स्थानिक पालकमंत्री मिळाला. पालकमंत्री या नात्याने एका दिवसात ३०० कोटीची कामे मंजूर करू शकलाे. मुख्यमंत्री आल्यास ते ३ हजार कोटीचा निधी देतील. हे गुवाहाटी दौऱ्याचे फलित असून, त्याचे फळ लवकरच जिल्ह्याला मिळेल, असा विश्वास पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे व्यक्त केला.उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शहरातील विविध विकासकामांची भूमिपूजन व उद्घाटने शुक्रवारी पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यावेळी पालकमंत्री सामंत यांनी विविध विकास कामांसाठी सुमारे २०० कोटी निधीची घोषणा केली. चिपळुणात पूरपरिस्थिती न येण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लाल व निळ्या पूररेषेबाबत लवकरच मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल.नगर परिषदच्या बहाद्दूरशेख नाका येथील औद्योगिक वसाहतीत बचत गटाच्या इमारतीसाठी १ कोटी रुपये, गोवळकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची जागा संपादीत करण्यासाठी आवश्यक निधी, शहरातील रस्त्यासाठी नगरोत्थानमधून साडेचार कोटीचा निधी मंजूर केल्याचे सांगितले.तसेच शिंदे - फडणवीस सरकारच्या माध्यमातून चिपळूण शहराचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न केला जाईल. चिपळूणवर पुराचे पुन्हा गंभीर संकट येऊ नये, यासाठी सत्ताधारी राज्यसरकार कटीबद्ध असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याबाहेरील लोकांकडून माथी भडकवण्याचे कामनाणार प्रकल्पाविषयी सुरुवातीला आपली व इतरांचीही भूमिका विरोधी होती हे मान्य आहे, पण थेट कायम स्वरूपी ७ हजार नोकऱ्या देणाऱ्या या प्रकल्पाला आता विरोध करून चालणार नाही. जिल्ह्यातील तरूणांना नोकऱ्या हव्या असतील तर येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करून चालणार नाही. प्रकल्प येण्यासाठी आता समर्थन करणाऱ्या संघर्ष समित्या स्थापन व्हायला हव्यात. मात्र, दुर्दैवाने सध्या जिल्ह्याबाहेरील लोक स्थानिकांची माथी भडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. घरा-घरात भांडणे लावण्याचे प्रकार त्यांनी सुरू केलेत. जिल्ह्यात प्रकल्प आले तरच जिल्ह्याचा कायापालट होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतguwahati-pcगौहती