शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पणदेरी धरणाची स्थिती धोकादायक, स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल; पुनर्बांधणीच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 14:20 IST

पणदेरी धरण हे पुनर्बांधणी करून नव्याने बांधावे लागणार

मंडणगड : तालुक्यातील पणदेरी धरण हे पुनर्बांधणी करून नव्याने बांधावे लागणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आल्याचे रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव जमीर माखजनकर यांनी सांगितले. ही अत्यंत गंभीर बाब यानिमित्ताने पुढे आली असून, यामुळे कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचे माखजनकर यांनी सांगितले.

याबाबत माखजनकर यांनी सांगितले की, आज हे धरण ७५ टक्के कोरडे झाले आहे. संपूर्ण धरणाची डागडुजी करण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आला आहे. एक महिन्याआधी परिसरातील जनतेला पाटबंधारे विभागाच्या व ग्रामपंचायतीमार्फत धरणातील पाणीसाठा खाली करण्याबाबत नाेटीस बजावण्यात आली हाेती. पण, डागडुजी सुरू करण्याआधी पाटबंधारे विभागाच्या नाशिक विभागीय कार्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या धरणाची पुन:पुन्हा डागडुजी करून काही उपयोग होणार नाही, असे सांगण्यात आले. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार संपूर्ण धरणाची स्थिती ही बाद व धोकादायक अवस्थेत झाल्यासारखी शासनाच्या व पाटबंधारे विभागाला दिसली. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या पंदेरी धरणाची खरी व सत्य माहिती समोर आल्याचे माखजनकर यांनी सांगितले. पंदेरी धरणाची पुढील वाटचाल म्हणून या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडून व रत्नागिरी जिल्हा पाटबंधारे विभागामार्फत विचार झाला आहे.

त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पाटबंधारे विभागातर्फे नवीन सर्वेक्षण करून त्याचा अहवाल व आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर धरणाचा नवीन आराखडा तयार करण्यात आला असून, या धरणाच्या नवीन पुनर्बांधकामासाठी नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

शासनाच्या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये या पंदेरी धरणाच्या नवीन बांधकाम प्रस्तावाला शासनाची मान्यता व मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा धोका निर्माण होऊ नये म्हणून धरण आहे त्याच स्थितीत ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर पावसाळा संपल्यानंतर धरणाच्या नवीन बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण