शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यातील ॲग्रिकल्चर झोनला तात्पुरती स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 13:49 IST

Uday samant Ratnagiri-रत्नागिरी जिल्हा ॲग्रिकल्चर झोनमध्ये आल्यामुळे जिल्ह्यातील नगर पंचायत व नगरपरिषद वगळून नवीन बांधकामाला निर्बंध घालण्यात आल्याने १,४०१ गावांचा विकास खुंटणार होता. रिझनल प्लॅन होत नाही, तोपर्यंत ॲग्रिकल्चर झोनला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे बिल्डर आणि लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील ॲग्रिकल्चर झोनला तात्पुरती स्थगिती मंत्री उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी : जिल्हा ॲग्रिकल्चर झोनमध्ये आल्यामुळे जिल्ह्यातील नगर पंचायत व नगरपरिषद वगळून नवीन बांधकामाला निर्बंध घालण्यात आल्याने १,४०१ गावांचा विकास खुंटणार होता. रिझनल प्लॅन होत नाही, तोपर्यंत ॲग्रिकल्चर झोनला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे बिल्डर आणि लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात ॲग्रिकल्चर झोनची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील ४ नगर परिषदा आणि ५ नगर पंचायती वगळून ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ग्रामीण भागात घरे आणि इतर इमारती बांधकामांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा संपूर्ण विकास खुंटणार होता. याला बहुतांश जिल्हावासीयांचा विरोध होता. याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा झाली होती.त्यानुसार जोपर्यंत रिझनल प्लॅन होत नाही, तोपर्यंत ॲग्रिकल्चर झोनची अंमलबजावणी थांबविण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने रिझनल प्लॅन होत नाही, तोपर्यंत या झोनला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली. लवकरच रिझनल प्लॅन पूर्ण होऊन त्यामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणी दूर होतील. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच तो प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.आरेवारे येथील जागा प्राणी संग्रहालयासाठी निश्चित करण्यात आली आहे. दोन महिन्यांत याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी