शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

तौक्ते वादळातील नुकसानाचे त्वरित पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या अनेक गावांमध्ये वादळी वारा व ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या अनेक गावांमध्ये वादळी वारा व पावसामुळे घरे, गोठ्यांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तर तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. या चक्रीवादळात तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे़ मात्र, कोठेही जीवितहानी झालेली नाही. तालुक्यातील नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.

राजापूर तालुक्यातील मंदरूळ येथील घराची भिंत कोसळून अनिल तुळाजी मासये (वय ४२), अस्मिल अनिल मासये (३६) व मुलगी श्रावणी अनिल मासये (१३) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लांजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चक्रीवादळात आंबोळगड येथील मठाचे, कशेळी येथील मनोज मेस्त्री यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. मिठगवाणे येथील भाई काजवे यांच्या घरावर झाड कोसळले. आडिवरे वेत्ये मार्गावर झाड पडून रस्ता बंद झाला होता. आंबोळगड येथील वाडेकर यांच्या गोठ्यावर झाड काेसळले. साखरीनाटे येथील शरफुद्दीन वाडकर यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत. कारिवणे येथील गणपत गोकुळ नाकटे यांच्या घराची एक बाजू कोसळली आहे. नाटे येथील संदेश पाथरे यांच्या जिमचे नुकसान झाले आहे. दळे येथे सुधाकर कृष्णा गिरकर यांच्या गोठ्यावर झाड पडले. जैतापूर सरपंच रेखा कोंडेकर यांच्या घरावरही झाड पडून नुकसान झाले आहे. सागवे हमदारेवाडी येथील पटेल बंधूच्या घराच्या छप्पराचे पत्रे उडाले. जैतापूर परिसरात माेठ्या प्रमाणात माड पडून काही ग्रामस्थांच्या घराचे नुकसान झाले आहे.

कारिवणे भागात घरावर झाडे पडून नुकसान झाले आहे. दळे, होळी, तुळसुंदे या भागातही घरांची पडझड होऊन ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे, तर जैतापूर, कुवेशी, होळी, माडबन, तुळसुंदे यांसह अन्य भागांत वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडले आहेत. कशेळी, वाडापेठ, नाटे, अणसुरे, जैतापूर व अन्य भागांत आमदार राजन साळवी यांनी भेट देऊन पाहणी केली.

महावितरणला तडाखा

चक्रीवादळामुळे तालुक्यात रविवारपासूनच वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी दुपारनंतर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत होता. उच्च दाब वाहिनेचे सुमारे ५० ते ६० वीजखांब पडले असून, लघु दाब वाहिनेचे सुमारे १०० पोल पडले आहेत. राजापूर, पडवे व धारतळे हे वीज ट्राॅन्सफार्मर बंदच ठेवण्यात आले होते. मात्र, पाचल, ओणी, हातिवले या भागातही वादळाचा फटका महावितरणला बसला असून संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे राजापूर कार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे यांच्यासह राजापूर ग्रामीणचे कुलदीप गायकवाड, आडिवरेचे शौन चांदोरकर, भूषण आघम आदींसह अधिकारी व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत होते.

या चक्रीवादळ काळात २४ तास नियंत्रण कक्षात तहसीलदार प्रतिभा वराळे कार्यरत हाेत्या़ प्रत्यक्षात फिल्डवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे धैर्य वाढवतानाच जनतेलाही विश्वास दिला. गटविकास अधिकारी सागर पाटील, राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्यासह सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वादळात चांगली कामगिरी बजावली आहे.