शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तौक्ते वादळातील नुकसानाचे त्वरित पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या अनेक गावांमध्ये वादळी वारा व ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या अनेक गावांमध्ये वादळी वारा व पावसामुळे घरे, गोठ्यांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तर तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. या चक्रीवादळात तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे़ मात्र, कोठेही जीवितहानी झालेली नाही. तालुक्यातील नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.

राजापूर तालुक्यातील मंदरूळ येथील घराची भिंत कोसळून अनिल तुळाजी मासये (वय ४२), अस्मिल अनिल मासये (३६) व मुलगी श्रावणी अनिल मासये (१३) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लांजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चक्रीवादळात आंबोळगड येथील मठाचे, कशेळी येथील मनोज मेस्त्री यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. मिठगवाणे येथील भाई काजवे यांच्या घरावर झाड कोसळले. आडिवरे वेत्ये मार्गावर झाड पडून रस्ता बंद झाला होता. आंबोळगड येथील वाडेकर यांच्या गोठ्यावर झाड काेसळले. साखरीनाटे येथील शरफुद्दीन वाडकर यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत. कारिवणे येथील गणपत गोकुळ नाकटे यांच्या घराची एक बाजू कोसळली आहे. नाटे येथील संदेश पाथरे यांच्या जिमचे नुकसान झाले आहे. दळे येथे सुधाकर कृष्णा गिरकर यांच्या गोठ्यावर झाड पडले. जैतापूर सरपंच रेखा कोंडेकर यांच्या घरावरही झाड पडून नुकसान झाले आहे. सागवे हमदारेवाडी येथील पटेल बंधूच्या घराच्या छप्पराचे पत्रे उडाले. जैतापूर परिसरात माेठ्या प्रमाणात माड पडून काही ग्रामस्थांच्या घराचे नुकसान झाले आहे.

कारिवणे भागात घरावर झाडे पडून नुकसान झाले आहे. दळे, होळी, तुळसुंदे या भागातही घरांची पडझड होऊन ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे, तर जैतापूर, कुवेशी, होळी, माडबन, तुळसुंदे यांसह अन्य भागांत वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडले आहेत. कशेळी, वाडापेठ, नाटे, अणसुरे, जैतापूर व अन्य भागांत आमदार राजन साळवी यांनी भेट देऊन पाहणी केली.

महावितरणला तडाखा

चक्रीवादळामुळे तालुक्यात रविवारपासूनच वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी दुपारनंतर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत होता. उच्च दाब वाहिनेचे सुमारे ५० ते ६० वीजखांब पडले असून, लघु दाब वाहिनेचे सुमारे १०० पोल पडले आहेत. राजापूर, पडवे व धारतळे हे वीज ट्राॅन्सफार्मर बंदच ठेवण्यात आले होते. मात्र, पाचल, ओणी, हातिवले या भागातही वादळाचा फटका महावितरणला बसला असून संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे राजापूर कार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे यांच्यासह राजापूर ग्रामीणचे कुलदीप गायकवाड, आडिवरेचे शौन चांदोरकर, भूषण आघम आदींसह अधिकारी व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत होते.

या चक्रीवादळ काळात २४ तास नियंत्रण कक्षात तहसीलदार प्रतिभा वराळे कार्यरत हाेत्या़ प्रत्यक्षात फिल्डवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे धैर्य वाढवतानाच जनतेलाही विश्वास दिला. गटविकास अधिकारी सागर पाटील, राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्यासह सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वादळात चांगली कामगिरी बजावली आहे.