शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

तौक्ते वादळातील नुकसानाचे त्वरित पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या अनेक गावांमध्ये वादळी वारा व ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या अनेक गावांमध्ये वादळी वारा व पावसामुळे घरे, गोठ्यांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तर तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. या चक्रीवादळात तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे़ मात्र, कोठेही जीवितहानी झालेली नाही. तालुक्यातील नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.

राजापूर तालुक्यातील मंदरूळ येथील घराची भिंत कोसळून अनिल तुळाजी मासये (वय ४२), अस्मिल अनिल मासये (३६) व मुलगी श्रावणी अनिल मासये (१३) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लांजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चक्रीवादळात आंबोळगड येथील मठाचे, कशेळी येथील मनोज मेस्त्री यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. मिठगवाणे येथील भाई काजवे यांच्या घरावर झाड कोसळले. आडिवरे वेत्ये मार्गावर झाड पडून रस्ता बंद झाला होता. आंबोळगड येथील वाडेकर यांच्या गोठ्यावर झाड काेसळले. साखरीनाटे येथील शरफुद्दीन वाडकर यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत. कारिवणे येथील गणपत गोकुळ नाकटे यांच्या घराची एक बाजू कोसळली आहे. नाटे येथील संदेश पाथरे यांच्या जिमचे नुकसान झाले आहे. दळे येथे सुधाकर कृष्णा गिरकर यांच्या गोठ्यावर झाड पडले. जैतापूर सरपंच रेखा कोंडेकर यांच्या घरावरही झाड पडून नुकसान झाले आहे. सागवे हमदारेवाडी येथील पटेल बंधूच्या घराच्या छप्पराचे पत्रे उडाले. जैतापूर परिसरात माेठ्या प्रमाणात माड पडून काही ग्रामस्थांच्या घराचे नुकसान झाले आहे.

कारिवणे भागात घरावर झाडे पडून नुकसान झाले आहे. दळे, होळी, तुळसुंदे या भागातही घरांची पडझड होऊन ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे, तर जैतापूर, कुवेशी, होळी, माडबन, तुळसुंदे यांसह अन्य भागांत वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडले आहेत. कशेळी, वाडापेठ, नाटे, अणसुरे, जैतापूर व अन्य भागांत आमदार राजन साळवी यांनी भेट देऊन पाहणी केली.

महावितरणला तडाखा

चक्रीवादळामुळे तालुक्यात रविवारपासूनच वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी दुपारनंतर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत होता. उच्च दाब वाहिनेचे सुमारे ५० ते ६० वीजखांब पडले असून, लघु दाब वाहिनेचे सुमारे १०० पोल पडले आहेत. राजापूर, पडवे व धारतळे हे वीज ट्राॅन्सफार्मर बंदच ठेवण्यात आले होते. मात्र, पाचल, ओणी, हातिवले या भागातही वादळाचा फटका महावितरणला बसला असून संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे राजापूर कार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे यांच्यासह राजापूर ग्रामीणचे कुलदीप गायकवाड, आडिवरेचे शौन चांदोरकर, भूषण आघम आदींसह अधिकारी व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत होते.

या चक्रीवादळ काळात २४ तास नियंत्रण कक्षात तहसीलदार प्रतिभा वराळे कार्यरत हाेत्या़ प्रत्यक्षात फिल्डवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे धैर्य वाढवतानाच जनतेलाही विश्वास दिला. गटविकास अधिकारी सागर पाटील, राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्यासह सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वादळात चांगली कामगिरी बजावली आहे.