शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

तौक्ते वादळातील नुकसानाचे त्वरित पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या अनेक गावांमध्ये वादळी वारा व ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या अनेक गावांमध्ये वादळी वारा व पावसामुळे घरे, गोठ्यांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तर तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. या चक्रीवादळात तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे़ मात्र, कोठेही जीवितहानी झालेली नाही. तालुक्यातील नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.

राजापूर तालुक्यातील मंदरूळ येथील घराची भिंत कोसळून अनिल तुळाजी मासये (वय ४२), अस्मिल अनिल मासये (३६) व मुलगी श्रावणी अनिल मासये (१३) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लांजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चक्रीवादळात आंबोळगड येथील मठाचे, कशेळी येथील मनोज मेस्त्री यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. मिठगवाणे येथील भाई काजवे यांच्या घरावर झाड कोसळले. आडिवरे वेत्ये मार्गावर झाड पडून रस्ता बंद झाला होता. आंबोळगड येथील वाडेकर यांच्या गोठ्यावर झाड काेसळले. साखरीनाटे येथील शरफुद्दीन वाडकर यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत. कारिवणे येथील गणपत गोकुळ नाकटे यांच्या घराची एक बाजू कोसळली आहे. नाटे येथील संदेश पाथरे यांच्या जिमचे नुकसान झाले आहे. दळे येथे सुधाकर कृष्णा गिरकर यांच्या गोठ्यावर झाड पडले. जैतापूर सरपंच रेखा कोंडेकर यांच्या घरावरही झाड पडून नुकसान झाले आहे. सागवे हमदारेवाडी येथील पटेल बंधूच्या घराच्या छप्पराचे पत्रे उडाले. जैतापूर परिसरात माेठ्या प्रमाणात माड पडून काही ग्रामस्थांच्या घराचे नुकसान झाले आहे.

कारिवणे भागात घरावर झाडे पडून नुकसान झाले आहे. दळे, होळी, तुळसुंदे या भागातही घरांची पडझड होऊन ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे, तर जैतापूर, कुवेशी, होळी, माडबन, तुळसुंदे यांसह अन्य भागांत वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडले आहेत. कशेळी, वाडापेठ, नाटे, अणसुरे, जैतापूर व अन्य भागांत आमदार राजन साळवी यांनी भेट देऊन पाहणी केली.

महावितरणला तडाखा

चक्रीवादळामुळे तालुक्यात रविवारपासूनच वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी दुपारनंतर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत होता. उच्च दाब वाहिनेचे सुमारे ५० ते ६० वीजखांब पडले असून, लघु दाब वाहिनेचे सुमारे १०० पोल पडले आहेत. राजापूर, पडवे व धारतळे हे वीज ट्राॅन्सफार्मर बंदच ठेवण्यात आले होते. मात्र, पाचल, ओणी, हातिवले या भागातही वादळाचा फटका महावितरणला बसला असून संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे राजापूर कार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे यांच्यासह राजापूर ग्रामीणचे कुलदीप गायकवाड, आडिवरेचे शौन चांदोरकर, भूषण आघम आदींसह अधिकारी व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत होते.

या चक्रीवादळ काळात २४ तास नियंत्रण कक्षात तहसीलदार प्रतिभा वराळे कार्यरत हाेत्या़ प्रत्यक्षात फिल्डवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे धैर्य वाढवतानाच जनतेलाही विश्वास दिला. गटविकास अधिकारी सागर पाटील, राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्यासह सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वादळात चांगली कामगिरी बजावली आहे.