तालुका समन्वय समिती जाहीर
By Admin | Updated: January 10, 2015 00:12 IST2015-01-09T21:48:13+5:302015-01-10T00:12:34+5:30
शिक्षण क्षेत्र संघटना : संप यशस्वीतेसाठी शाळांना भेट

तालुका समन्वय समिती जाहीर
टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंदोलनामध्ये रत्नागिरी तालुका शंभर टक्के सहभागी व्हावा, यासाठी तालुका समन्वय समिती जाहीर करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीमध्ये आयोजित सर्व संघटनांच्या संयुक्त सभेमध्ये तालुका समन्वय समितीची निर्मिती करण्यात आली.समितीमध्ये अध्यक्ष उदय फडके, सचिव प्रकाश मांडवकर, सी. एस. पाटील, सागर पाटील, आनंद शेलार, महेंद्र कुवळेकर, प्रदीप वाघोदे, अनंत जाधव, रामचंद्र केळकर, संतोष शिंदे यांचा समावेश आहे. शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सुरु केलेले राज्यस्तरीय आंदोलन तालुक्यात १०० टक्के यशस्वी व्हावे, यासाठी समन्वय समिती व सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत तालुक्यातील सर्व शाळांना भेट दिली जाणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये संपाची पार्श्वभूमी शिक्षक व कर्मचाऱ्यांना सांगितली जाणार आहे. दि. १३ च्या एकदिवसीय लाक्षणिक संपाचे नियोजन शाळांना सांगण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी दि. १३ रोजी सकाळी १० वाजता जयस्तंभ, रत्नागिरी येथे एकत्र यायचे आहे, असे आवाहन समन्वय समितीकडून करण्यात आले आहे. यावेळी जगन्नाथ वीरकर, दिलीप वासनिक, रामचंद्र गराटे, सदाशिव गावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
दि. १३चा एक दिवसाचा लाक्षणिक संप जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हा समन्वय समितीच्यावतीने मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पी. व्ही. पाटील व माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका संघटनांच्या माध्यमातून संपाचे नियोजन केले जात आहे. १३ रोजी प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. तसेच तहसीलदारांमार्फतमागण्यांचे निवेदन शासनाकडे पोहोचविले जाईल.
- भारत घुले